Wednesday, May 14, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांना नेमकं किती महत्व?

गेले गेले म्हणता म्हणता दानवेंची झाली बढती!

July 8, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
modi cabinet

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी पार पडला. या मंत्रिमंडळात एकूण ४३ नव्या मंत्र्यांचा समावेश करून केंद्रातील मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातून नव्यानं समावेश झालेल्या चार मंत्र्यांपैकी कोणाला कोणती जबाबदारी आणि किती महत्वाची मिळाली आहे, त्याचा आढावा.

 

बुधवारी संध्याकाळी शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर रात्री खातेवाटप जाहीर करण्यात आलं. मोदी मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, भागवत कराड आणि भारती पवार यांच्याकडे महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर नवीन खातेवाटपानुसार रावसाहेब दानवे यांना बढती मिळाली आहे. नारायण राणे यांना मिळालेलं खातं हे अतिरिक्त जबबादारी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे होतं.

हेही वाचा: मोदी सरकारचं सातवं वर्ष पूर्ण होणार, रिकाम्या जागा भरण्यासह फेरबदलांचीही शक्यता

 

कोणाला कोणती जबाबदारी मिळाली?

नारायण राणे

  • भाजपा नेते नारायण राणे यांना सर्वप्रथम मंत्रिपदाच्या शपथेचा मान मिळाला.
  • राणे यांच्याकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
  • गडकरींकडील हे अतिरिक्त खातं काढून नारायण राणेंना ही जबाबदारी देण्यात आलीय.

 

रावसाहेब दानवे

  • रावसाहेब दानवे यांचं मंत्रिपद जाणार अशा अफवा काल पसरवल्या गेल्या होत्या.
  • पण झालं उलटंच, नवीन खातेवाटपात रावसाहेब दानवे यांना बढती मिळाली.
  • दानवे यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्री, कोळसा राज्यमंत्री आणि खाणकाम राज्यमंत्री अशा तीन खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

 

हेही वाचा:ज्योतिरादित्य शिंदे मोदी सरकारमध्ये मंत्री बनण्याची शक्यता!

 

डॉ. भागवत कराड

  • डॉ. भागवत कराड यांच्याकडे महत्वाचा पदभार सोपवण्यात आलाय.
  • कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.
  • वैद्यकीय क्षेत्रातील उच्चशिक्षित आणि खासगी रुग्णालय चालवणाऱ्या डॉ. कराड यांना महत्वाचं खातं मिळालं आहे.

 

कपिल पाटील

  • भिवंडीतील भाजपाचे खासदार कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास सरपंच ते केंद्रीय राज्यमंत्री व्हाया जिल्हा परिषद अध्यक्ष झाला आहे.
  • खातेवाटपात पाटील यांच्याकडे पंचायतराज राज्य मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सोपण्यात आली आहे.
  • ग्रामीण राजकारणात महत्वाच्या असणाऱ्या ग्राम पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या माध्यमातून काम करण्याची संधी पाटील यांना मिळणार आहे.

 

डॉ. भारती पवार 

  • दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असलेल्या भारती पवार यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथही देण्यात आली.
  • भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याचे पदभार सोपवण्यात आला आहे.
  • एमबीबीएसची पदवी असलेल्या डॉ.भारती पवार या वैद्यकीय व्यावसायिक असल्यानं त्यांच्या शिक्षणाचा, व्यावसायिक अनुभवांचा लाभ खात्याचे काम करताना होणार आहे.

 

हेही वाचा: भाजपा बाहेरच्यांना संधी…कुंपणावरच्यांना संदेश! ‘कारभार-जात-उपरे आमचेच’ त्रिसुत्रीचा निवडीवर पगडा!

भाजपा बाहेरच्यांना संधी…कुंपणावरच्यांना संदेश! ‘कारभार-जात-उपरे आमचेच’ त्रिसुत्रीचा निवडीवर पगडा!


Tags: bhagwat karadbharti pawarMaharashtramla kapil patilNarayan ranePM Narendra modiकपिल पाटीलनारायण राणेपंतप्रधान नरेंद्र मोदीभागवत कराडभारती पवार
Previous Post

“काँग्रेस पक्ष माथाडी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल!”: नाना पटोले

Next Post

मोदी मंत्रिमंडळात शैक्षणिक गुणवत्तेचं प्रमाण वाढलं!

Next Post
cabinet

मोदी मंत्रिमंडळात शैक्षणिक गुणवत्तेचं प्रमाण वाढलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!