Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मुंबईच्या आयआयटीतील एम.टेक.च्या गरजू विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक मदत

सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रकल्पांवर काम करणाऱ्यांसाठी ‘अॅन्सिस’चा मदतीचा हात

July 4, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
IIT

मुक्तपीठ टीम

अॅन्सिस या जागतिक पातळीवरील आघाडीच्या आणि अभियांत्रिकी सिम्युलेशन सॉफ्टवेअरचा शोध लावणाऱ्या संस्थेने आज मुंबई येथील आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेशी भागीदारी जाहीर केली आहे. ही भागीदारी सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर संशोधन प्रकल्पांचे काम करणाऱ्या एम टेक च्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी आहे. शिक्षण, आरोग्यसेवा, पर्यावरणाशी संबंधित विषयांना मदत आणि तंत्रज्ञानाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदतीतून साकारणारे इतर सामाजिक विषयांशी संबंधित दृष्टीकोनातून समाजाशी संबंधित तंत्रज्ञानविषयक सखोल संशोधनाला वेग देण्यासाठी अॅन्सीसचा हा सामाजिक दायित्व निधीतून आकारास येणारा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. उच्च गुणवत्ता धारण करणाऱ्या पण वंचित पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांना किंवा महिला विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने या शिष्यवृत्त्यांची आखणी करण्यात आली आहे.

 

२०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून अॅन्सीस संस्था येणाऱ्या तीन वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी दोन वर्षांचा एम.टेक.अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च उचलेल. आयआयटी- मुंबई येथे एम.टेक. चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ होणार आहे.

 

या उपक्रमाविषयी बोलताना, अॅन्सीसचे भारत -दक्षिण आशिया प्रशांत महासागर क्षेत्राचे उपाध्यक्ष रफिक सोमाणी म्हणाले, “अॅन्सीस संस्थेचे आयआयटी संस्थेशी खूप वर्षांचे संबंध असून तंत्रज्ञान आणि शिक्षण यांच्या एकत्रित सामर्थ्यावर आमचा नेहमीच विश्वास ठेवला असून आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत. कोणत्याही उद्योगाचे भविष्य नि:संशयपणे तंत्रज्ञानावर अवलंबून असते आणि म्हणून संशोधन अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडते. या शिष्यवृत्यांच्या रूपाने भारतातील महान बुद्धीवंताना अत्यंत आवश्यक असलेला आणि आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण यांच्यावर केंद्रीभूत असलेले संशोधन करण्यासाठी गती प्राप्त होईल अशी आशा अॅन्सीस संस्थेतील आम्ही सर्वजण व्यक्त करीत आहोत. सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या क्षेत्रात निश्चितपणे काही अत्यंत मुलभूत पर्याय देणाऱ्या संशोधनाच्या निष्कर्षांची आम्ही उत्सुकतेने वाट पहात आहोत.”

आयआयटी मुंबई येथे कार्यरत प्राध्यापक आणि संस्थाप्रमुख, माजी विद्यार्थी आणि कॉर्पोरेट संबंध या विषयाचे प्राध्यापक डॉ.सुहास जोशी म्हणाले की, “गेल्या काही वर्षांत, विद्यार्थी परिवारात वैविध्य आणण्यासाठी आयआयटी मुंबईने गांभीर्याने प्रयत्न केले आहेत. २०१९ मध्ये अॅन्सीस संस्थेने डॉक्टरेट मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सुरुवात केल्यानंतर, आता एम. टेक.चे शिक्षण घेणाऱ्या आणि वंचित पार्श्वभूमीतून आलेल्या तसेच महिला विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुन्हा एकत्र येत असल्याबद्दल आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. डॉक्टरेटच्या विद्यार्थ्यांच्या जीवनात या शिष्यवृत्त्यांमुळे जसा मोठा बदल घडून आला तसाच बदल या एम.टेक. च्या पात्र विद्यार्थ्यांमध्ये देखील घडून येईल. अॅन्सीस संस्थेशी अधिक दृढ संबंध विकसित करण्यासाठी आणि समाजाचे देणे अधिक जास्त आणि अधिक उत्तम प्रकारे फेडण्यासाठी यापुढेही एकत्र येऊन काम करण्यासाठी आम्ही आशावादी आहोत.”

अॅन्सीस संस्थेने २०१९ मध्ये आयआयटी मुंबई मध्ये डॉक्टरेट मिळविण्यासाठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन शिष्यवृत्ती जाहीर केल्यानंतर आता अॅन्सीसने तशाच प्रकारची संशोधन शिष्यवृत्ती एम.टेक.च्या विद्यार्थ्यांसाठी सुरु केली आहे. समाजावर उत्तम परिणाम करणाऱ्या आणि शिक्षण, आरोग्य, पर्यावरणीय शाश्वतता, स्त्रोतांचे जतन आणि तंत्रज्ञान या संबंधीच्या संशोधनाला वेग देण्याच्या उद्देशाने महिला संशोधक आणि वंचित समाजाची पार्श्वभूमी असणारे संशोधक यांना या शिष्यवृत्त्या प्रदान करण्यात येणार आहेत.


Tags: IIT mumbaiआयआयटी मुंबईडॉ.सुहास जोशी
Previous Post

पुराणकाळात लुप्त झालेली सरस्वती नदी भारतात पुन्हा वाहणार

Next Post

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियात २६ जागांसाठी भरती

Next Post
npcil

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियात २६ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!