Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

केंद्र सरकारकडे महाराष्ट्राचे नेमके किती हजार कोटी थकित?

माहिती अधिकारात केंद्रानं दाखवला राज्यापेक्षा कमी आकडा...

April 29, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
GST Issuse

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळात असल्याचे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. यानंतर इंधनांवरील व्हॅट आकारणी व जीएसटीच्या थकबाकीवरून राज्य सरकार आणि भाजपामध्ये संघर्ष सुरु झाला. केंद्र सरकारकडे महाराष्ट्राचे नेमके किती हजार कोटी थकित आहे, याची माहिती पुणे येथील कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी माहिती अधिकाराखाली मागवली. मात्र, दोन्ही सरकारांकडून त्यांना आलेली माहिती तफावत दाखवणारी आहे. दोन्ही सरकारांच्या कालावधीत काहीसा फरक असला तरी तो मोठी तफावत दाखवणारा असू शकत नाही. त्यामुळे जीएसटीच्या थकबाकीविषयी संभ्रम वाढला आहे. तफावत असली तरी महाराष्ट्राची थकबाकी मोठी असल्याचने ती त्वरित देण्याची मागणी सारडा यांनी केली आहे.

माहिती अधिकारात केंद्र – राज्य आकडेवारीत फरक

  • माहिती अधिकार कायद्यानुसार प्रफुल्ल सारडा यांनी दोन्ही सरकारांकडून माहिती मागवली.
  • केंद्र शासनाने जी माहिती दिलेली आहे, त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की, ६ हजार ७२३ कोटी एवढी रक्कम बाकी आहे.
  • परंतु महाराष्ट्र सरकारकडून त्यांनी जी माहिती मागवली त्यामध्ये जो त्यांचा रिप्लाय आलेला आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे की जवळपास २५ हजार ४८१ कोटी ही एवढी मोठी रक्कम केंद्र सरकारकडे बाकी आहे.

केंद्र सरकारने अद्याप सन २०२०-२१ ची थकबाकीही राज्याला दिलेली नाही!

  • एप्रिल, २०२१ ते जानेवारी, २०२२ या कालावधीत ३२ हजार ७६० कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.
  • त्यापैकी उपकरापोटी कोणतीही रक्कम राज्य सरकारला प्राप्त झालेली नसून, कर्ज स्वरूपात १३ हजार ७८२ रुपये राज्य सरकारला देण्यात आले आहेत.
  • अद्याप एप्रिल, २०२१ ते जानेवारी, २०२२ या कालावधीचे १८ हजार ९७८ कोटी रुपये केंद्र सरकारकडून येणे बाकी असल्याचे समोर आले आहे.

निर्मला सीतारामण यांनी या प्रकरणाची दखल घेण्याची प्रफुल्ल सारडांची मागणी…

मी माहिती वितरण अर्ज करून राज्य शासनाकडे व केंद्र शासनाकडे जीएसटीसंदर्भातील माहिती मागितली होती. त्याबाबतीत जी माहिती मला देण्यात आली आहे ती खूपच धक्कादायक आहे आणि जे आकडे केंद्र आणि राज्य सरकारकडून देण्यात आलेले आहेत त्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सांगितले की, जवळपास २६,५०० कोटी एवढी मोठी जीएसटीची रक्कम जी आहे ती केंद्र सरकारकडे जमा आहे. आणि वारंवार पाठपुरावा करून देखील ते लोक देत नाही आहे.

केंद्राने महाराष्ट्राचे हक्काचे पैसे त्वरित देण्याची मागणी

  • वारंवार मागणी करून सुद्धा अजून त्याबद्दलची रक्कम देण्यात आलेली नाही आहे.
  • परंतु त्यामध्ये हे सांगण्यात आलेले आहे की, २०१७-१८ पासून ते ८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत जवळपास ८० हजार कोटी आहेत ते महाराष्ट्राला परत देण्यात आलेले आहेत.
  • परंतु २५ हजार ४८१ कोटी जी रक्कम आहे ती केंद्र सरकारकडे आजही जमा आहे.
  • तर मला असं वाटतं की कुठे ना कुठे जे आकडे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सांगितले आहेत त्यात खरोखर तथ्य आहे.
  • याआधीसुद्धा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी सुद्धा हा मुद्दा वांरवार उचलला होता की, महाराष्ट्राची खूप मोठी जीएसटीची रक्कम केंद्र सरकारकडे जमा आहे.
  • परंतु गेले एक-दीड वर्ष पाठपुरावा करून देखीलसुद्धा त्यांच्याकडून कोणतीच रक्कम देण्यात आलेली नाही आहे.
  • मला असं वाटतं की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी याची दखल घ्यावी व महाराष्ट्राचे त्याच्या हक्काचे जीएसटीचे पैसे त्वरित रिलिज करण्यात यावे.
  • जेणेकरून केंद्र आणि राज्य सरकार यादोघांच्या भांडणामध्ये जो सर्वसामान्य माणूस आहे त्याला याची जळ बसू नये एवढीच आमची इच्छा आहे.

Tags: central govtGSTMaharashtraMaharashtra govtNIRMALA SITARAMANPrafull Sardaअर्थमंत्री निर्मला सीतारामणकेंद्र सरकारजीएसटीप्रफुल्ल सारडामहाराष्ट्रमाहिती अधिकारात केंद्रराज्य सरकार
Previous Post

“युवा पिढीने देश रक्षणासाठी आघाडीवर येणे हीच जनरल बिपीन रावत यांना खरी श्रद्धांजली” – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Next Post

राज्यस्तरीय बँकर्स काँक्लेव मध्ये महाराष्ट्रातील उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँकर्स चा उमेद अभियानाकडून सन्मान

Next Post
Umeed Abhiyan honors bankers who achieved State Level Bankers Conclave

राज्यस्तरीय बँकर्स काँक्लेव मध्ये महाराष्ट्रातील उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या बँकर्स चा उमेद अभियानाकडून सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!