Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“राज्यघटनेच्या मसुद्यात ‘आदिवासी’ शब्दाच्या समावेशासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार!”

January 5, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Parliament Constituent Assembly

मुक्तपीठ टीम

संसदेच्या संविधान सभेमध्ये ‘आदिवासी’ हा शब्द भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यासाठी जयपाल सिंग मुंडा यांनी विशेष संघर्ष केला. परंतु, राज्यघटनेच्या मसुद्यामध्ये ‘आदिवासी’ हा शब्द समाविष्ट होऊ शकला नाही. आदिवासी संवर्धन परिषदेच्या माध्यमातून शासन यासाठी प्रयत्न करणार असून राज्यघटनेतील १९७६ च्या घटनात्मक दुरुस्ती Area Remove Act, 1976  यातील अडचणी लक्षात घेता अनेक बाबींवर अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत मंत्री आदिवासी विकास मंत्री ॲड.पाडवी  यांनी व्यक्त केले.

 

आदिवासी बांधवांच्या अधिकार व  हक्कासाठी कार्य करणाऱ्या जयपाल सिंग मुंडा यांनी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात सामावून घेण्यासाठी दिलेला लढा अविस्मरणीय आहे. त्यांनी आदिवासी समाजाची बाजू संसदेच्या संविधान सभेत भक्कमपणे मांडून आदिवासींना न्याय मिळवून दिला. जयपाल सिंग मुंडा यांच्या जयंतीनिमित्त स्थापन केलेली ‘आदिवासी संवर्धन परिषद’ आदिवासी संस्कृती संवर्धनासाठी काम करेल, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.

 

मानव शास्त्रज्ञ डॉ. आर. के. मुटाटकर यांच्या अध्यक्षतेखाली जयपाल सिंग मुंडा यांच्या ११८ व्या जयंतीनिमित्त ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या परिसंवादास जयपाल सिंग मुंडा यांचे सुपुत्र जयंत जयपाल सिंग मुंडा यांची विशेष उपस्थिती होती. साहित्य समिक्षक व भाषाशास्त्रज्ञ डॉ. गणेश देवी, आमदार कपिल पाटील, विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, आदिवासी विकास आयुक्त हिरालाल सोनवणे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त राजेंद्र भारुड तसेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश, झारखंड, आसाम, उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान, जम्मू व काश्मिर या राज्यांतील राजकीय क्षेत्रातील आदिवासी समाजातील खासदार, आमदार व मान्यवर उपस्थित होते.

            

या परिसंवाद प्रसंगी जयपाल सिंग मुंडा यांच्या जीवनदर्शिकेचे प्रकाशन व रेखाचित्राचे अनावरण आमदार कपिल पाटील व गणेश देवी यांच्या हस्ते करण्यात आले. संविधान सभेत आदिवासींच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम जयपाल सिंग मुंडा यांनी केले होते. या महान अष्टपैलू व्यक्तिमत्वास त्यांच्या कार्यासाठी भारतरत्न मिळावा, त्यांच्या संसदेतील कार्याची ओळख भारतीय समाजाला व्हावी या दृष्टीकोनातून त्यांचा पुतळा संसदेच्या आवारात उभारण्यात यावा त्याचप्रमाणे राष्ट्रपुरूषांच्या यादीमध्ये जयपाल सिंग मुंडा यांचा समावेश करण्यात यावा यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करणार आहे. तसेच त्यांचे तैलचित्र महाराष्ट्राच्या विधीमंडळ परिसरात लावण्यात येवुन आदिवासी विकासाच्या विविध योजनांना त्यांचे नाव देण्यात यावे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करण्यात येईल, अशी माहिती ॲड.पाडवी यांनी यावेळी दिली.

           बिरसा मुंडा, ख्वाजा नाईक, उमाजी नाईक, तंट्या भिल्ल, राणी दुर्गावती, राघोजी भांगरे इ.  क्रांतिकारकांनी आदिवासी समाजासाठी कार्य केले. त्यांचे नाव इतिहासात पाहायला मिळते. जयपाल सिंग मुंडा यांच्यावर बिहार, झारखंड या राज्यांत अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत, पुस्तकांच्या माध्यमातून अनेक लेखकांनी जयपाल सिंग मुंडा यांचे कार्य भारतीय समाजामध्ये विशेषत: आदिवासी समाजामध्ये पोहचविण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातही या पुस्तकांचे अनुवाद करून त्याद्वारे त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहचविण्याचा मानस ॲड. पाडवी यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

 

आमदार श्री.पाटील म्हणाले, जयपाल सिंग मुंडा हे उत्कृष्ट संसदपटू, हॉकीपटू होते. ते भारतीय हॉकी संघाचे कर्णधार असताना त्यांच्याच नेतृत्वाखाली ऑलिम्पिकमध्ये भारतास पहिले सुवर्ण पदक सन १२८ ला मिळाल्याची माहिती देवून जयपाल सिंग मुंडा यांच्या नावे राज्यात विद्यापीठ असले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 

जयंत जयपाल सिंग मुंडा म्हणाले, आदिवासी समाजाची एक स्वतंत्र जीवनशैली आहे तसेच रुढी, प्रथा, परंपरा आहेत त्यांची जपणूक केली पाहिजे. आदिवासी हे मूळ निवासी आहेत. आदिवासींची जमीन हीच त्यांची ओळख आहे. आदिवासींना त्यांचे हक्क मिळाले पाहिजेत. त्यांनी आपल्या परंपरा जपल्या पाहिजेत. परिसंवादाचे अध्यक्ष डॉ.आर.के. मुटाटकर म्हणाले, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंची आदिवासी विकासाबाबतची पंचशील तत्वे आदिवासी समाजाने  स्वीकारुन आपला शाश्वत विकास करावा.

 

जयपाल सिंग मुंडा यांच्या भाषणात ‘आदिवासी हे प्रथम श्रेणीचे भारतीय नागरिक आहेत’, असा उल्लेख करीत असल्याचे सांगून जयपाल सिंग मुंडा हे संपादक, खेळाडू, शिक्षण तज्ज्ञ होते. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले होते. ते खासदार होते. तसेच भारतीय सिव्हील सर्व्हिस (ICS) परीक्षा उत्तीर्ण होते, अशी माहिती डॉ.गणेश देवी यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अनुप कुमार यादव यांनी केले तर आयुक्त राजेंद्र भारुड यांनी आभार मानले. या परिसंवादांस देशभरातून पाच हजार लोकांनी ऑनलाईन पद्धतीने उपस्थिती लावली. 


Tags: Draft ConstitutionICSIndian Civil ServicemuktpeethParliament Constituent Assemblystate governmenttribalआदिवासीभारतीय सिव्हील सर्व्हिसमुक्तपीठराज्य सरकारराज्यघटना मसुदासंसद संविधान सभा
Previous Post

महिला बदनामीच्या बुल्लीबाई अ‍ॅपची महिलाच सूत्रधार की प्यादी?

Next Post

राज्यात ‘लॉकडाऊन’ नाही, तर टास्क फोर्सनं सुचवला ‘ऑगमेंटेड रिस्ट्रीक्शन्स’चा उपाय! काय आहे ते समजून घ्या…

Next Post
rajesh tope 2

राज्यात 'लॉकडाऊन' नाही, तर टास्क फोर्सनं सुचवला 'ऑगमेंटेड रिस्ट्रीक्शन्स'चा उपाय! काय आहे ते समजून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!