Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

महाराष्ट्रातील पाच मुलांची प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड

 व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी मुलांशी साधला संवाद

January 26, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
balapuraskar

महाराष्ट्राचे गुणवान बालक कामेश्वर वाघमारे, काम्या कार्तिकेयन, अर्चित पाटील, सोनित सिसोलेकर आणि श्रीनभ अग्रवाल यांना विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार जाहीर झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुलांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केले.

 

केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्यावतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी  देशातील  ३२ बालकांची   ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार  २०२१’ साठी निवड केली. यात महाराष्ट्रातील नांदेड येथील कामेश्वर वाघमारे (१४), मुंबई येथील काम्या कार्तिकेयन (१३), जळगाव येथील अर्चित पाटील(१४), पुणे येथील सोनित सिसोलेकर (१३) आणि नागपूर येथील श्रीनभ अग्रवाल (१६) या मुलांचा समावेश आहे.  पदक, १ लाख रूपये  आणि  प्रमाणपत्र  असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

 

नांदेड येथील कामेश्वर  वाघमारे याची शौर्य श्रेणीत या मानाच्या पुरस्कारासाठी निवड झाली. मनार नदित पोहायला गेले असता बुडणाऱ्या दोन मुलांना स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांचा जीव वाचविला होता.

 

मुंबई येथील काम्या कार्तिकेयन हिची क्रीडा श्रेणीत निवड झाली आहे. १३ वर्षीय पर्वतारोही काम्या  कार्तिकेयन ही  मिशन साहस  या विशेष मोहिमेंतर्गत काश्मिरमध्ये विशेष प्रशिक्षण घेत असून तिला एक्सप्लूरस ग्रँडस्लॅम सर करून जगातील सर्वात कमी वयाची पर्वतारोही म्हणून देशाचे नाव उंचवायचे आहे.

 

अर्चित पाटील याची नव संशोधन श्रेणीत निवड झाली आहे. साधारण यंत्रांचा उपयोग करून अर्चित याने तयार केलेल्या उपकरणाद्वारे बाळंतपणात होणाऱ्या रक्तस्त्रावाची अचूक माहिती जाणून घेता येते.

 

पुणे येथील सोनित सिसोलेकर याची ज्ञानार्जन श्रेणीत निवड झाली असून  त्याने रेडिओलॉजीच्या प्रभावी परिणामावर संशोधनात्मक अभ्यास केला आहे. नासा या आंतरराष्ट्रीय संघटनेनेही त्याच्या कार्याचा  गौरव केला आहे. नागपूर येथील श्रीनभ अग्रवाल याची नवसंशोधन श्रेणीत निवड झाली आहे. श्रीनभ याने‍ पिकांवर येणा-या यलो मोझॅक विषाणुला नष्ट करण्यासाठी कंबरमोडी या वनस्पतीच्या पानांपासून प्रभावी औषध तयार केली आहे.

 

पंतप्रधानांचे मार्गदर्शन      

    

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) प्राप्त मुलांशी संवाद साधला. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणी देखील यावेळी उपस्थित होत्या.

 

पुरस्कार विजेत्यांनी कोरोनाच्या कठीण काळात हे पुरस्कार मिळविल्याने यावर्षीचे पुरस्कार विशेष आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. संवादादरम्यान पंतप्रधानांनी, वागणुकीत मोठा बदल घडवून आणणाऱ्या स्वच्छता अभियानासारख्या मोहिमेतील मुलांच्या भूमिकेचे कौतुक केले. कोरोना काळात जेव्हा मुले हात धुण्यासारख्या मोहिमांमध्ये सामील झाली तेव्हा याचा सकारात्मक परिणाम लोकांवर झाला आणि या मोहिमेला यश मिळाले असे पंतप्रधान म्हणाले. यावर्षी ज्या क्षेत्रांमध्ये पुरस्कार देण्यात आले आहेत त्यातील विविधताही पंतप्रधानांनी नमूद केली.


Tags: Archit Patilcoronakameshwar waghmareKamya KarthikeyannandedPM Narendra modiPMOUnion Minister for Women and Child Development Smriti Zubin Iraniकेंद्रीय महिला व बाल विकास मंत्री स्मृती झुबिन इराणीकोरोनानांदेडपंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

तिरंग्यासह ‘जन-गण’ रस्त्यावर! दिल्लीत लाखो शेतकऱ्यांचं ट्रॅक्टर संचलन!

Next Post

“रुग्णालयांच्या ऑडिटसाठी खास इंजिनियर्सच्या नियुक्तीची मागणी”

Next Post
vishwas patil

"रुग्णालयांच्या ऑडिटसाठी खास इंजिनियर्सच्या नियुक्तीची मागणी"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!