Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंच्या लाइव्हला शिंदेंचं आमदाराच्या पत्रानं उत्तर! पण लिहिलं कुणी?

June 23, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
उद्धव ठाकरेंच्या लाइव्हला शिंदेंचं आमदाराच्या पत्रानं उत्तर! पण लिहिलं कुणी?

मुक्तपीठ टीम

शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भावनिक संवाद साधला. त्यात ठाकरेंचा उद्देश हा आमदारांपेक्षा शिवसैनिक आणि शिवसेनेच्या मतदारांशी भावनात्मक नातं कायम राखण्याचा दिसला. नेमकं तेच हेरून एकनाथ शिंदे यांनी बंडखोर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांचं एक पत्र ट्वीट केलं आहे. या पत्रात शिरसाट यांनी आमदारांच्या भावना मांडल्या आहेत. हे पत्र म्हणजे शिवसेना आमदारांच्या भावना असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. पण त्याचवेळी पत्रातील मुद्दे लक्षपूर्वक पाहिले तर ते पत्र आमदार संजय शिरसाट यांच्यापेक्षा या बंडामागे असलेल्या भाजपा थिंकटँकच्या डोक्यातून आल्याचा संशय शिवसेनेतून व्यक्त केला जात आहे.

 

ही आहे आमदारांची भावना… pic.twitter.com/U6FxBzp1QG

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 23, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासमोर जाऊन एकाही शिवसेना आमदाराने ते मुख्यमंत्रीपदी नकोत, असं म्हटलं तर राजीनाम्याची तयारी दाखवली होती. आमदार शिरसाट हे काही थेट भेटलेले नाहीत. पण या पत्रात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या सक्रियतेवरच टीका करण्यात आली आहे. हा आक्षेप भाजपाच्या गोटातून सातत्यानं घेतला जातो.

मुख्यमंत्री म्हणून काम करताना उद्धव ठाकरे निधीचा आदेश देणारे पत्र राष्ट्रवादीच्या आमदारांना देत असल्याचे फोटो ते आमदार व्हायरल करत, आणि शिवसेना आमदारांना निधी मिळत नसल्याने त्यांचे शिवसैनिक त्यांना भंडावून सोडत, असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे.

हा आक्षेप शिवसेनेच्या अनेक आमदारांचा आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी तसा टोमणाही मारला होता. दादा, तुम्ही तुमच्या पक्षाला जास्त निधी, नंतर काँग्रेस आणि उरला सुरला शिवसेनेला, असे ते म्हणाले होते.

शिरसाट यांनी अयोध्येला आम्हालाही हिंदुत्ववादी असतानाही जाऊ दिले नाही, रोखले, असं म्हटलं आहे. पण आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी ५ जूनला अयोध्येला संजय राऊतच नाही तर एकनाथ शिंदेही गेले होते. त्यानंतर १० जूनला राज्यसभा निवडणूक होती. तसेच लगेच नंतर २० जूनला विधानपरिषद होती. त्यामुळे शिवसेनेने सर्व आमदारांना जाऊ दिले नाही, असे शिवसेनेच्या सध्या ठाकरेंसोबत असलेल्या आमदाराने सांगितले.

संजय शिरसाट यांनी मांडलेला शिवसेनेतील बडव्यांबद्दलचा मुद्दा हा नेहमीचा आहे. तसं आहेही, असं स्वत: आजही शिवसेनेसोबत असलेले नेतेही मान्य करतात. पण या पत्रात नावाचा उल्लेख न करता संजय राऊत यांच्यावर चाणक्य असा शब्द वापरत टीका करण्यात आली आहे. भाजपाचे नेते शिवसेनेला भाजपापासून तोडण्यासाठी संजय राऊतांनाच खलनायक मानतात. त्यामुळे ते कायम त्यांना लक्ष्य करत असतात. त्यात संजय शिरसाट यांचा आणि राऊतांचा काही थेट वाद नसतानाही त्यांनी त्यांच्यावर टीका करणं संशयास्पद असल्याचं शिवसेना समर्थकांचं म्हणणं आहे.

त्यामुळेच आमदार संजय शिरसाट यांनी लिहिलेलं पत्र हे गौहाटीतून ट्वीट झालं असलं तरी प्रत्यक्षात ते मुंबईतून भाजपा थिंकटँकच्या मुद्द्यांसह लिहिलं गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे.

वाचा आमदार संजय शिरसाट यांचं पत्र जसं आहे तसं..

प्रती,
श्री. उद्धवजी ठाकरे,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र

आमचा विठ्ठल हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन करून हे पत्र लिहितोय

पत्रास कारण की…

काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधून निवडून न येणाऱ्या विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.

मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप वडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर वडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो.

तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे? हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूचे बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथजी साहेब यांचा दरवाजा उघडा होता. आणि मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती , मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान..आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना, आम्ही हा निर्णय घेण्यास घ्यायला लावला.

हिंदुत्व, अयोध्या, राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं? तुम्ही स्वत: फोन करून अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वतः परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की सीएम साहेबांचा फोन आला होता आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपले घर गाठले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिले नाही?

साहेब, जेंव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेंव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते, मतदारसंघातली कामं करत होते. निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते. भुमीपुजन आणि उद्घाटनं करत होते, तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो? त्यांची कामं कशी होतात? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर काय द्यायचं या विचाराने जीव कासावीस व्हायचा.

या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं , माननीय बाळासाहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हिदुत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठिण प्रसगांत त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते, आजही आहेत आणि उद्याची राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत. काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं.

कळावे, लोभ असावा..

आपलाच,
संजय शिरसाट

MLAS Letter to Cm Uddhav Thackeray

MLAS Letter to Cm Uddhav Thackeray

MLAS Letter to Cm Uddhav Thackeray


Tags: Eknath ShindeSanjay ShirshatShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेनाशिवसेना आमदार संजय शिरसाट
Previous Post

ममतांच्या तृणमूल काँग्रेसची एकनाथ शिंदे गटाच्या हॉटेलबाहेर निदर्शने

Next Post

मराठी चित्रपट महामंडळात सत्तापालट, मेघराज राजे भोसलेंना हटवून सुशांत शेलार अध्यक्ष

Next Post
Sushant Shelar appointed as new chairman of Marathi Film Corporation

मराठी चित्रपट महामंडळात सत्तापालट, मेघराज राजे भोसलेंना हटवून सुशांत शेलार अध्यक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!