Monday, June 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

छत्रपती शिवाजी महाराज…गुण असे जगात एकमेवाद्वितीयच ठरवणारे!

साम्राज्य नाही स्वराज्य स्थापणारे, काळाच्या पुढची कृती करणारे रयतेचे राजे!

February 19, 2022
in featured, घडलं-बिघडलं, सरळस्पष्ट
0
chhatrapati shivaji maharaj incredible values in the world

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट

छत्रपती शिवाजी महाराज.
जीवन जगावं तर कसं जगावं, त्याची प्रेरणा ज्यांच्या जीवनातून लाभते ते छत्रपती शिवाजी महाराज!

 

केवळ पोकळ अभिमान बाळगायचा नाही, तर सार्थ स्वाभिमान जागवत, नव्या विचारांची पेरणी करत ताठ मानेनं, स्वाभिमानी बाण्याची आपल्या जगण्यातून प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराज!

 

पराक्रम असा की युगे युगे स्फुर्ती लाभेल. पहाडासारख्या दुष्मनाच्या सामर्थ्याला न बिचकता हिंमतीनं पण गनिमी काव्याच्या साथीनं त्याच्या छाताडावर पाय देऊन उभे ठाकणारे छत्रपती शिवाजी महाराज!

 

लोकशाही म्हटलं की पाश्चात्यांकडेच पाहण्याची आपली सवय आहे. पण जगातील इतर राजे, सम्राट, बादशहांप्रमाणे स्वत:च्या साम्राज्याची नाही तर रयतेच्या राज्याची, स्वराज्याची प्रत्यक्षात आणणारे छत्रपती शिवाजी महाराज!

 

हा राजा काळाचा पुढचा होता. समाजसुधारक होता. जिजाऊ मांसाहेब सती कुप्रथेपासून दूर राहिल्या. हुंडा शापालाही विरोधच राहिला. मोगल सरदाराच्या सुनेला जसं सन्मानानं सुरक्षित धाडलं, तसंच स्त्रीयांवर अत्याचार करणाऱ्यांचा चौरंग करण्याची न्याय निष्ठुरही. हे सारं करणारे स्त्री समानतेचे, स्त्री हक्कांचे खरे रक्षणकर्ते छत्रपती शिवाजी महाराज!

 

सर्वात महत्वाचा गुण. राजानं…नेतृत्वानं कसं असावं ते सांगणारा. काहीही झालं तरी गाफिल राहायचं नाही. अखंड सावधान राहत अष्टावधान बाळगायचं. अष्टावधानी छत्रपती शिवाजी महाराज!

 

शेवटी जाता जाता. आजच्या सदा अस्वस्थ युगातील आपल्या प्रत्येकानं नक्कीच आठवावा असा, पण फारशी चर्चा न झालेला गुण. जो अनेक कठिण प्रसंगामध्ये तारणारा ठरला. महाराजांकडे स्वाभिमान होता. महाराजांकडे शौर्य होते. महाराजांकडे सामर्थ्यही होते. तेही असं की त्यांच्यासाठी प्राणांचे बलिदान करण्यासाठी मावळे सदैव आतुर असत. पण तरीही महाराजांनी जोपासलेला सर्वात मोठा गुण म्हणजे संयम! संयमाच्या बळावर अनेक आव्हानं महाराजांनी लिलया पेलली आणि अधळून लावली!

 

खरंतर महाराजांविषयी कितीही मांडलं तरी कमीच. थांबावंच वाटत नाही. जाता जाता महाराजांविषयी मनातील काही ओळी…

 

वारसा आम्हाला कुणाचा…

वारसा आपला पारतंत्र्य संपवत स्वराज्य स्थापणाऱ्या शिवबांचा

कधी काढला कोथळा, कधी छाटली बोटं, पण होताच सोबत गनिमी कावा

नाहीच तुकवली लाचारीनं मान, पण परिस्थितीनुसार मागेही आले दोन पावलं

पराक्रमानं बदलली परिस्थिती, तीन दशकं ओलांडली, तेव्हा झाले राजे छत्रपती!
तेव्हा झाले राजे छत्रपती!

 

सरळस्पष्ट

(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)

संपर्क – 9833794961
ट्विटर @TulsidasBhoite @Muktpeeth


Tags: Chhatrapati Shivaji MaharajMaharashtraSaralSpasthatulsidas bhoiteछत्रपती शिवाजी महाराजतुळशीदास भोईटेसरळस्पष्ट
Previous Post

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात २५४ जागांसाठी भरती

Next Post

पंजाबचाच न्याय महाराष्ट्राला लावत राहुल गांधी यांनी उर्जामंत्री नितीन राउत यांचा राजीनामा घ्यावा: आप

Next Post
Ranga Rachure on resignation of Nitin Raut

पंजाबचाच न्याय महाराष्ट्राला लावत राहुल गांधी यांनी उर्जामंत्री नितीन राउत यांचा राजीनामा घ्यावा: आप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!