Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

खैरे म्हणतात तसं खरंच घडणार…शिंदे जाणार, फडणवीस काँग्रेस फोडून सरकार वाचवणार?

November 5, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Khaire on Devendra Fadanvis

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केली. एकीकडे या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एक मोठा दावा केला आहे. न्यायालयात शिंदेंसह १६ आमदार अपात्र ठरतील. शिंदे-फडणवीस सरकार धोक्यात येणार म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, असं खैरे यांनी म्हटलं आहे. खैरे यांच्या या दाव्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

काय म्हणाले चंद्रकांत खैरे?

  • सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत शिंदे गटातील १६ आमदार हे अपात्र ठरू शकतात.
  • हे आमदार अपात्र ठरल्यास राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडू शकते.
  • हे १६ आमदार अपात्र ठरल्यानंतर आपला मुख्यमंत्री कसा करायचा याचा प्लॅनही देवेंद्र फडणवीस यांनी तयार ठेवला आहे.
  • फडणवीस हुशार माणूस आहे.
  • त्यांनी दुसरीकडे काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत.
  • राज्यातील २२ नाराज आमदार हे भाजपच्या संपर्कात आहेत.
  • पण काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे.
  • त्यामुळे ते सध्या शांत आहेत.

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी!!

  • चंद्रकांत खैरे यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे.
  • बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली आहे.
  • यामुळे ठाण्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
  • म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पराभव होईल.
  • छगन भुजबळ, नारायण राणे पडले. मग एकनाथ शिंदेही निवडणुकीत पडणार.
  • फक्त एकनाथ शिंदेच नाही, तर शिंदे गटातील सर्वचे सर्व ४० आमदारांचा पराभव होईल.

खैरे म्हणतात तसंच होईल?

दावा -१

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पहिल्या फेरीतील १६ सेना बंडखोर आमदार अपात्र ठरतील, असा दावा केला आहे. तो संविधानातील तरतुदी लक्षात घेता, अशक्य नाही. तसं घडू शकतं.

दावा -२

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काँग्रेसचे २२ आमदार फोडतील, असा दावाही खैरे यांनी केला आहे. पण पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदी लक्षात घेता ४४ सदस्यसंख्या असलेल्या काँग्रेसमध्ये कारवाई टाळण्यासाठी किमान ३३ आमदार फुटणे आवश्यक आहे. पदाचा राजीनामा देऊन लढण्याची सध्या तरी कुणाची तयारी नसणार. त्यामुळे २२ आमदार तसं करतील, अशी शक्यता कमी आहे. तरीही इर काही खोकेकारणामुळे तसं घडवलं गेलं तर ती खूपच दूरची शक्यता असली, तरी नाकारता येत नाही.

दावा – ३

एकनाथ शिंदे पराभूत होतील!
शिवसेनेतून फुटणारे नेते पराभूत होतात हा इतिहास आहे. खरं आहे. पण खैरे यांनी नाव घेतलेले नारायण राणे हे पहिल्या निवडणुकीत पराभूत झाले नव्हते. उलट सत्तेची दहशत माजवत त्यांनी शिवसेना नेत्यांना कोकणात फिरणं अशक्य केलं होतं. ते शक्य झालं कारण प्रशासनाच्या साथीनं स्थानिक पातळीवरील राणेंची बांधणी मजबूत होती. पुढे उद्धव ठाकरेंच्या सतत प्रयत्नांमधील सातत्य आणि संघटनाबांधणीत ते कमी पडले.
शिंदेंचंही तसंच आहे. त्यांना न्यायालयाने लढण्यास मनाई केली तर भाग वेगळा. पण जर आज निवडणूक झाली तर ते पराभूतच होतील, असं समजणं जरा जास्त होईल. ते विजयी होण्याची शक्यता, आजच्या परिस्थितीत जास्त आहे.


Tags: Chandrakant KhaireCongressdevendra fadanvisShivsenaकाँग्रेसचंद्रकांत खैरेंदेवेंद्र फडणवीसशिवसेना
Previous Post

हिवाळा आला तब्येत बनवा! अक्रोड खा भिजवून, जास्तच लाभ!

Next Post

सरन्यायाधीश उदय लळित यांचा महाराष्ट्राच्यावतीने सत्कार

Next Post
Chief Justice Uday Lalit felicitated on behalf of Maharashtra

सरन्यायाधीश उदय लळित यांचा महाराष्ट्राच्यावतीने सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!