Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डॉ.बाबासाहेब आंबेडकर: चाळीतून सुरुवात, आभाळ घेतलं कवेत!

चाळीतले टॉवर - भाग १

September 18, 2021
in featured, प्रेरणा
0
डॉ.बाबासाहेब आंबेडकर: चाळीतून सुरुवात, आभाळ घेतलं कवेत!

डॉ.जितेंद्र आव्हाड

परिस्थिती कितीही खडतर असो, काळ कितीही प्रतिकूल असो; जिद्द, अभ्यास आणि संघर्षाची तयारी असली, की अडचणी आणि समस्याही शरण येतात, यशाचे आभाळ कवेत येते. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याखेरीज याचे अन्य सर्वोत्तम उदाहरण कोणते असु शकेल?

 

न्याय, समानता, बंधुता , शांतता यांसारख्या मुलभूत मूल्यांच्या स्थापनेसाठी आयुष्यभर बाबासाहेबांनी लढा दिला. समाजातील शूद्रातिशूद्रांना सन्मानाने जगण्याचे धडे दिले. भारतीय राज्यघटनेसारखी अलौकिक भेट देशाला दिली,असा हा प्रज्ञावंत महामानव. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ असा मूलमंत्र देणारा असामान्य नेता. त्यांनी दिलेल्या या ध्येयवाक्याचा पहिला यशस्वी महाप्रयोग पहावयास मिळतो तो त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातच. मुंबईतील एका चाळीत राहून ते शिकले. तेथूनच त्यांनी संघटन केले आणि संघर्षाच्या रणभेरी फुंकल्या. तमाम चाळकऱ्यांसाठी केवळ अभिमानाचीच नव्हे, तर आदर्शवत अशी ही गोष्ट. महामानवांना आपल्या अंगाखांद्यावर मिरवण्याचे भाग्य सगळ्याच वास्तुंना लाभत नसते. परळची बीआयटी (बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट) ही चाळ मात्र भाग्यवान. कारण म्हणजे ती भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पुनित झाली आहे. काहीसे असेच भाग्य लाभले होते ते एल्फिन्स्टनच्या डबक चाळीलाही.

 

१९०१ मध्ये आंबेडकर कुटुंबीय साताऱ्याहून मुंबईत स्थलांतरित झाले, तेव्हा ते अगोदर डबक चाळीत राहात असत. तेथे असतानाच बाबासाहेबांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. पुढे १९१२ साली बाबासाहेब महाविद्यालयात असताना त्यांचे कुटुंबीय परळमधील दामोदर नाट्यगृहानजीक असलेल्या बीआयटी चाळीत राहण्यास आले. बाबासाहेबांचे वडील लष्कारातील निवृत्त सुभेदार होते. ब्रिटिश सरकारने बॉम्बे सिटी ईम्प्रूवमेन्ट ट्रस्टच्या माध्यमातून परळमध्ये उभारलेल्या बीआयटी चाळीतील खोल्या लष्करातील जवानांना प्राधान्याने देण्यात येत असत. बाबासाहेबांच्या वडिलांनी केलेल्या अर्जानुसार त्यांना चाळ क्रमांक एक मधील ५० आणि ५१ क्रमांकाच्या दोन खोल्या मिळाल्या. तब्बल २२ वर्षे म्हणजे १९१२ ते १९३४ या काळात बाबासाहेब या चाळीत वास्तव्यास होते. येथेच राहून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. बि.ए. ची पदवी मिळवली. येथुनच बाबासाहेब अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी गेले. येथे असतानाच ते सिडनहॅम कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. येथे राहात असतानाच त्यांनी सार्वजनिक कार्यास सुरुवात केली. या चाळीतील वास्तव्याच्या काळातच बाबासाहेबांच्या आयुष्यातील महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृती दहन, काळाराम मंदिर सत्याग्रह, पुणे करार अशा महत्त्वाच्या, भारतीय इतिहासाला वेगळे वळण लावणाऱ्या घटना घडल्या. याच खोलीत वास्तव्यास असताना बाबासाहेबांनी ‘जनता’ आणि ‘बहिष्कृत भारत’ या साप्ताहिकांची सुरुवात केली. तसेच परळमधील या बीआयटी चाळीत आणखी एक ऐतिहासिक घटना घडली ती म्हणजे राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट.

 

महाराष्ट्रातील चाळ संस्कृती मध्ये जन्म होऊन पुढील आयुष्यात ती मूल्ये जपत शुद्रातिशुद्रांना सामाजिक लढ्यांच्या माध्यमातून हक्क मिळवून देत भारतीय जनमानसावर प्रभाव टाकणाऱ्या महामानवांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

 

jitendra awahd

(लेखक डॉ. जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री आहेत.)

 


Tags: Chalitale Towerdr. babasaheb ambedkarHousing Minister Jitendra Awhadचाळीतले टॉवरडॉ. जितेंद्र आव्हाड
Previous Post

वेतन संहिता, सामाजिक सुरक्षा प्रारुपांबाबत सूचना किंवा आक्षेप नोंदविण्याचे कामगार आयुक्तांचे आवाहन

Next Post

नांदेड जिल्हा रुग्णालयात १०० खाटांऐवजी ३०० खाटांना मान्यता!

Next Post
ashok chavan

नांदेड जिल्हा रुग्णालयात १०० खाटांऐवजी ३०० खाटांना मान्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!