Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“दहावीच्या परिक्षांबाबत निर्णय घेताना सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय द्या”

भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचे प्रतिपादन

May 22, 2021
in घडलं-बिघडलं
0
ashish shelar

मुक्तपीठ टीम

 

दहावीच्या परिक्षांबाबत निर्णय घेताना अन्य बोर्डांचा विचार करुन एसएससी बोर्डाच्या मुलांवर अन्याय होणार नाही. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका राज्य शासनाने घ्यावी, असे मत भाजपा नेते माजी शिक्षणमंत्री आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे व्यक्त केले.

 

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले की, न्यायालयाच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. किंबहुना परिक्षा घेण्यात विद्यार्थ्यांचे हितच आहे, अशी भूमिका गतवर्षी अंतिम वर्षे परिक्षांबाबत भाजपाने मांडली होती. आजही तीच भूमिका आहे.

 

गतवर्षी अंतिम वर्षे परीक्षा नको अशी मागणी युवा सेनेने केली. त्यानंतर उच्च. शिक्षण मत्र्यांनी तो आदेशच असल्याचे मानून कुलपती, कुलगुरू, विद्यापीठ, सीनेट, तज्ञ यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता एकतर्फी निर्णय घेतला होता. त्यावेळी आम्ही सर्वोच्च न्यायालया पर्यंत लढलो व राज्य सरकारला चपराक मिळाली. त्यानंतर सरकारने शिकणे अपेक्षित होते, पण तसे झाले नाही. यावर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांवरुन मुंबई उच्च न्यायालयाने पुन्हा चपराक लगावली आहे.

 

एका पिढीचे भवितव्य दावणीला टांगण्याचे पाप राज्य सरकार करते आहे. सर्व बाबतीत राजकारण केले जात आहे. सुरुवातीला शिक्षक, मग विद्यार्थी यांची मते घेऊन परिक्षाच नको असे वातावरण तयार केले गेले.

 

दहावीच्या परिक्षांवर भवितव्यच अवलंबून असते त्याचा साधा विचार केला नाही. न्यायालयाने लक्षात आणून दिले आहे की, सीबीएसई आणि अन्य केंद्रीय बोर्डांकडे सतत मुल्यमापन करण्याची प्रक्रिया आहे. तशी पध्दत आपल्या एस एस सी बोर्डाकडे नाही. मग मूल्यमापन कसे करणार यावरून पालक आणि विद्यार्थी त्रस्त आहेत. विद्यार्थ्यांसमोर अंधार आहे. दोन दिवसात शासन निर्णय घेणार आहे.

 

जर परीक्षा घेणार असतील तर काठीण्य पातळीचा विचार करण्यात यावा, परिक्षांसाठी आवश्यक पायाभूत सेवा सुविधा आहेत की नाही हे पहावे. सर्वांचे मुल्यमापन एकत्र करणार असाल तर सर्व बोर्डाचे विद्यार्थी एकाच समान पातळीवर कसे येतील याचा विचार करावा, अन्य बोर्डाच्या तुलनेत एस एस सी बोर्डाचे विद्यार्थी मागे पडणार नाहीत याची खबरदारी शासनाने घ्यावी, या मुद्द्यांकडे आमदार अँड आशिष शेलार यांनी लक्ष वेधले.


Tags: BJPbjp ashish shelarअँड आशिष शेलारएस एस सी बोर्डा
Previous Post

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते श्रमजीवी रुग्णालयाचे भूमिपूजन

Next Post

कोकणातील २ जिल्ह्यांमध्ये नवे रुग्ण वाढले, पुणे शहरातील नवे रुग्ण हजाराखाली! ४० हजार बरे झाले!

Next Post
MCR 1-5-21

कोकणातील २ जिल्ह्यांमध्ये नवे रुग्ण वाढले, पुणे शहरातील नवे रुग्ण हजाराखाली! ४० हजार बरे झाले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!