Monday, May 26, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एमएसपी हमी कायद्यावरून दिल्लीच्या जंतरमंतरवर शेतकऱ्यांची निदर्शने, मोदी सरकार शेतकरी विरोधी?

December 10, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
AIKC

मुक्तपीठ टीम

केंद्राच्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी दिल्लीत वर्षभर आंदोलन राबवले. या एका वर्षात शेतकरी चळवळीने अनेक चढउतार पाहिले. अनेक शेतकऱ्यांनी यात आपला जीवही गमावला. यासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतींसाठी म्हणजेच एमएसपी हमी कायद्याबाबत आणि गेल्या वर्षीच्या आंदोलनात जीव गमावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई मिळावी या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. या दोन्ही मुद्यांवर शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा दिल्लीला घेराव घालण्याची तयारी सुरू केली आहे. यावेळी अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर जमून निदर्शने केली आहेत.

भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार शेतकर्‍यांना सहकार्य करत नाही आणि त्यांना दिलेल्या आश्वासनांवर मागे जात असल्याचा आरोपही काँग्रेसच्या शेतकरी संघटनेने केला आहे. सरकारने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वादग्रस्त कृषी कायदे रद्द केले होते.

एआयकेसीचे संयुक्त समन्वयक हरगोविंद सिंह तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “केंद्र सरकार शेतकऱ्यांना सहकार्य करत नाही किंवा त्यांचे प्रश्न सोडवत नाही. कृषी विरोधी कायद्यांविरोधातील आंदोलन संपून एक वर्षाहून अधिक काळ झाला असला तरी, शेतकऱ्यांना एमएसपी देण्याचे सरकारचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही.”

सरकार आश्वासन देऊनही पूर्ण करत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला!

  • केंद्रातील मोदी सरकारचे कृषीविषयक तीन कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील हजारो शेतकऱ्यांनी राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सीमेवर वर्षभराहून अधिक काळ निदर्शने केली.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हे तिन्ही कायदे रद्द करण्याची घोषणा केली होती.
  • भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार शेतकऱ्यांना सहकार्य करत नाही आणि त्यांना दिलेली आश्वासने पाळत नाही, असा आरोपही काँग्रेसच्या शेतकरी संघटनेने केला.

“एमएसपी लागू करण्यात सरकारला अडचणी येतात” अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी केली

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी गेल्या वर्षी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याची टीका केली.
  • नरेंद्र मोदी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. . मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी दृष्टिकोनामुळेच हा प्रकार घडल्याचे ते म्हणाले.
  • एमएसपी लागू करण्यात त्यांना अडचणी येत असल्याचे हे एक कारण आहे. हे आंदोलन फक्त जंतरमंतरपुरते मर्यादित राहू नये, असे ते म्हणाले.
  • ते पुढे घेऊन देशाचे पोट भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढले पाहिजे.

Tags: AIKCAll India Kisan CongressdelhiFarmers' Protestsjantar mantarMSP Guarantee Actmuktpeethअखिल भारतीय किसान काँग्रेसएआयकेसीएमएसपी हमी कायदाघडलं-बिघडलंजंतरमंतरदिल्लीमुक्तपीठशेतकरी निदर्शने
Previous Post

गुगल सर्च मूव्हिज २०२२: सर्वाधिक सर्च होणाऱ्या चित्रपटांची यादी जाहीर!!

Next Post

सायबर सिकनेस…एक नवा आजार? कशी घ्याल काळजी?

Next Post
Cyber sickness

सायबर सिकनेस...एक नवा आजार? कशी घ्याल काळजी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra
featured

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

by Tulsidas Bhoite
May 24, 2025
0

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

April 8, 2025
जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!