Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

धर्मांतरविरोधी कायदा देशभर लागू करुन त्याची कठोर अंमलबजावणी करा! – प्रबल प्रतापसिंह जुदेव

August 26, 2022
in घडलं-बिघडलं
0
Prabal Pratap Singh Judev

मुक्तपीठ टीम

‘ख्रिस्ती मिशनर्‍यांनी मानवतेसाठी शाळा, रुग्णालये अवश्य उघडावीत; मात्र या सोयीसुविधांच्या नावाखाली ख्रिस्ती बनण्यासाठी हिंदूंचे धर्मांतर का ? शिक्षण आणि अन्य सेवांच्या नावाखाली व्यापार केला जात आहे. आपली संस्कृती ही भारताची जमेची बाजू आहे, त्यामुळे आपल्या संस्कृतीवर आघात करुन नियोजनबद्ध रितीने हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. धर्मांतर हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. जिथे जिथे हिंदूंचे धर्मांतर झाले, तो भाग अस्थिर झाला, याला इतिहास साक्षी आहे. आज देशातील अनेक राज्यांत धर्मांतरविरोधी कायदा लागू केला असला, तरी हा कायदा देशभर लागू करुन त्याची कठोर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. यासाठी देशभरातील हिंदूंनी प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ असे आवाहन भाजपाचे छत्तीसगड प्रदेशमंत्री आणि अखिल भारतीय घरवापसी प्रमुख प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर !’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात बोलत होते.

विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता विनोद बन्सल म्हणाले की, ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर’ याविषयी कुठलीही शंका असता कामा नये. अखंड भारतापासून अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश हे धर्माच्या आधारावरच वेगळे झाले. जिथे जिथे हिंदूंची लोकसंख्या घटली, तिथे हिंदू बाटला गेला. काश्मीर, बंगाल, केरळ, ईशान्य भारतातील राज्ये ही याची उदाहरणे असून तिथे आतंकवादी कारवाया, जिहादी आक्रमणांत वाढ झाली आणि तेथील हिंदू अल्पसंख्य झाले. धर्मांतर रोखण्यासाठी अनेक साधू-संतांनी बलीदान दिले आहे. ओडिशा येथील स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांनी धर्मांतर रोखण्यासाठी आणि हिंदूंच्या घरवापसीसाठी महान कार्य करत आपल्या प्राणांचे बलीदान दिले. धर्मांतर थांबवणे खूप आवश्यक आहे.’

हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राज्यस्थान समन्वयक आनंद जाखोटिया म्हणाले की, ‘जेव्हा एका व्यक्तीचे धर्मपरिवर्तन होते, तेव्हा फक्त त्याचे धर्मपरिवर्तन होत नसून आपल्या धर्माच्या विरोधात एक शत्रू म्हणून तो उभा राहतो’, असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते. पूर्वी अखंड असलेला भारत आता विभागला गेला आहे. देशातील ९ राज्यांत हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. धर्मांतराच्या समस्येने आता व्यापक रूप धारण केले आहे. हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी विदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा पुरवला जात आहे. देशभर धर्मांतरविरोधी कायदा अशा कठोर पद्धतीने लागू करायला हवा की, धर्मांतर करण्याची कोणाची हिंमत होणार नाही. धर्मांतरविरोधी कायदा ही काळाची आवश्यकता आहे.’

 


Tags: Anti Conversion LawHindu Janjagruti SamitiPrabal Pratap Singh Judevधर्मांतर हेच राष्ट्रांतरधर्मांतरविरोधी कायदाप्रबल प्रतापसिंह जुदेवहिंदु जनजागृती समिती
Previous Post

बैलपोळ्याचा सण…शेतकऱ्यांच्या उत्साहाला उधाण, बाजारही सजला!

Next Post

“न्यायाला विलंब होऊ नये, ही जनतेची अपेक्षा! नाहीतर जनतेलाच नरसिंहाचा अवतार घ्यावा लागेल!” सामनाचा अलर्ट!!

Next Post
Uddhav Thackeray And Supreme Court

"न्यायाला विलंब होऊ नये, ही जनतेची अपेक्षा! नाहीतर जनतेलाच नरसिंहाचा अवतार घ्यावा लागेल!" सामनाचा अलर्ट!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!