भारतीय रेल्वे म्हणजे जगातील एक अवाढव्य असं रेल्वे जाळं मानलं जातं. स्वाभाविकच या अजस्त्र यंत्रणेत इंधनाचा वापरही तसाच होतो आणि त्यामुळे प्रदूषणही. आता मात्र रेल्वे प्रदूषणमुक्त रेल्वे वाहतुकीचं लक्ष्य समोर ठेवून काम करत आहे. त्यातीलच एक पाऊल म्हणजे सौर ऊर्जा निर्मिती. या आर्थिक वर्षातील पहिल्या तीन महिन्यांमध्ये रेल्वेने सौर उर्जेपासून ३८ लाख युनिट वीज निर्मिती केली आहे.