Thursday, May 22, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री बनण्यासाठी १०० कोटी, आमदाराशी फाइव्ह स्टार हॉटेलात सौदेबाजी!! भामट्यांची कमाल!!!

July 20, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
BJP Rahul Kul

मुक्तपीठ टीम

शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मात्र या सत्ताबदलानंतर अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्याचवेळी मंत्रीपदाची इच्छा असणाऱ्यांची मोठी गर्दी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळावे यासाठी आमदार प्रयत्न करत आहेत. अशातच महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री मिळवून देण्यासाठी दोन आमदारांना आमिष दाखवत १०० कोटींची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी ४ भामट्यांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांनी आणखीही काही आमदारांना गंडा घातल्याची शक्यता आहे.

या चार जणांच्या टोळीकडून १०० कोटींच्या बदल्यात मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती. भाजपाचे आमदार राहुल कुल यांनी यासंदर्भात मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना माहिती दिली होती. त्याआधारे खंडणीविरोधी पथकाने ओबेरॉय हॉटेलमध्ये कुल आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यासमोरच सापळा लावून ही कारवाई केली. राहुल कुल यांच्या स्वीय सचिवाच्या तक्रारीवरून मुंबई गुन्हे शाखेने रियाझ शेख, योगेश कुलकर्णी, सागर संगवई आणि जाफर उस्मानी या चार आरोपींना अटक केली आहे. अधिवक्ता अजय उमापती दुबे यांनी सांगितले की, किल्ला न्यायालयाने सर्व आरोपींना २६ जुलैपर्यंत गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले आहे. तक्रारीनुसार आमदाराला कॅबिनेट मंत्री बनवण्यासाठी १०० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती.

१७ जुलै रोजी रियाज शेख याने राहुल कुल यांच्या स्वीय सचिवाला अनेकवेळा फोन केला असून आमदारसाहेबांशी बोलणे झाले असून, खास त्यांच्या कामासाठी दिल्लीहून मुंबईत आलो आहे, असे त्याने सांगितले. स्वीय सचिवांनी हा निरोप कुल यांना दिला. त्यावर चार दिवसांपूर्वी आपणासही या व्यक्तीचा फोन आला होता व मंत्रीपदासाठी १०० कोटी रुपये मागत होता, असे ते म्हणाले. कुल यांनी स्वीय सचिवाला या व्यक्तीला भेटण्यासाठी बोलाविण्यास सांगितले. या दिवशी कुल यांनी रियाजसोबत जवळपास दीड तास चर्चा करून ही रक्कम १००वरून ९० कोटी रुपयांवर आणली. त्यावर २० टक्के म्हणजे १८ कोटी रुपये काम होण्याआधी द्यावे लागतील, अशी अट रियाज याने ठेवली. कुल यांनी ती मान्य करून दुसऱ्या दिवशी पैसे घेण्यासाठी बोलावले. रियाजला १८ जुलै रोजी दुपारी १.१५ वाजता नरिमन पॉइंट येथे बोलावण्यात आले आणि मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षाला माहिती देण्यात आली. रियाझ तिथे पोहोचल्यावर कुल यांनी त्याला त्याच हॉटेलमध्ये घेऊन गेले. साध्या गणवेशातील गुन्हे शाखेचे पथक तेथे पोहोचले आणि रियाजला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली असता उर्वरित आरोपींची नावे पुढे आली.

रियाजने गुन्हे शाखेला सांगितले की, योगेशने त्याची सागरशी ओळख करून दिली होती.एका आमदाराला मंत्री बनवण्याचा दर दिल्लीत ५० ते ६० कोटी आहे, असे संगवई म्हणाले होते. योगेशने रियाजकडून आमदाराचा बायोडाटा मागून सागरला व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केले होते. सागरने चौकशीत जाफर उस्मानी हा सूत्रधार असल्याचे सांगितले. गुन्हे शाखेने त्याला अटकही केली. सर्व आरोपींकडून मोबाईल आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले असून, त्यांच्याकडून पुरावे गोळा करण्यात येत आहेत.


Tags: Bjp Rahul kulCabinet MinisterMaharashtraकॅबिनेट मंत्रीभाजपा आमदार राहुल कुलमहाराष्ट्र
Previous Post

भात लावणी करताना महिलांचं भक्तीसंगीत…कामामधे काम, मुखी सदा हरिनाम!

Next Post

“मागितलं तर काहीही देऊ, हिसकावू पाहिलंत तर जागा दाखवू!” – उद्धव ठाकरे

Next Post
Uddhav Thackeray And Ramdas Kadam

"मागितलं तर काहीही देऊ, हिसकावू पाहिलंत तर जागा दाखवू!" - उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!