Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टाटा सन्स अध्यक्षांचे एअर इंडिया कर्मचाऱ्यांना स्वागताचे पत्र, “घरी परतली एअर इंडिया!”

January 28, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
tata sons

मुक्तपीठ टीम

टाटा समुहाकडे भारत सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तब्बल ६९ वर्षांनी एअर इंडिया घरी परतल्यावर लगेचच टाटा सन्सच्या अध्यक्षांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी एअर इंडिया घरी परतल्याचे म्हटले आहे.

 

एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे हार्दिक स्वागत

  • एन चंद्रशेखरन यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, ज्या दिवसापासून टाटा एअर इंडिया विकत घेणार असल्याची घोषणा झाली, तेव्हापासून लोक या विमान कंपनीच्या परतावाविषयी बोलू लागले.
  • त्यांनी पुढे लिहिले- एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आमच्या ग्रुपमध्ये मी मनापासून स्वागत करतो.
  • मी तुम्हा सर्वांसोबत एकत्र काम करण्यास उत्सुक आहे.
  • टाटा कुटुंबात एअर इंडियाचे स्वागत करताना आम्हाला अभिमान वाटतो.
  • चंद्रशेखरन यांनी डिसेंबर १९८६ मध्ये त्यांच्या पहिल्या एअर इंडिया भेटीचा अनुभवही सांगितला आहे.

 

एअर इंडियाचे हस्तांतरण पूर्ण झाले

  • टाटा सन्सच्या अध्यक्षांनी एअर इंडियाच्या सर्व कर्मचाऱ्यांना पत्र लिहिले आहे.
  • त्यात त्यांनी एअर इंडियाच्या हस्तांतरणाचे काम गुरुवारी (२७ जानेवारी २०२२) पूर्ण झाल्याचे सांगितले आहे.
  • आता एअर इंडिया टाटा समूहाची आहे.
  • चंद्रशेखरन म्हणाले की, आज एक नवीन अध्याय सुरू होत आहे.
  • आपण पुढे कसे जातो आणि लोकांच्या गरजा कशा पूर्ण करतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

 

६९ वर्षांपूर्वी सरकारने एअर इंडियाचे अधिग्रहण केले

  • टाटा समूहाने गुरुवारी सार्वजनिक क्षेत्रातील एअर इंडियाची मालकी घेतली आहे.
  • ही विमानसेवा सरकारने सुमारे ६९ वर्षांपूर्वी अधिग्रहित केली होती.
  • टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले की, समूह एअर इंडिया परत मिळाल्याने उत्साहित आहे आणि ती जागतिक दर्जाची विमान कंपनी बनवण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

 

एअर इंडियाची सुरुवात टाटा समूहाने १९३२ मध्ये केली…

  • टाटा समूहाने १९३२ मध्ये एअर इंडिया सुरू केली.
  • मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६ वर्षांनी १९५३ मध्ये तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी विमान कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले.
  • टाटा समूहाने असेही म्हटले आहे की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमान वाहतूक क्षेत्राला परवडणारे बनविण्याच्या आणि नागरिकांसाठी “जीवन सुलभ” करण्यासाठी योगदान सुनिश्चित करण्याच्या दृष्टिकोनाशी सहमत आहे.

Tags: Air indiaN.Chandrashekharantata sonsएअर इंडियाएन. चंद्रशेखरटाटा सन्स
Previous Post

“बदलत्या काळासोबत नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बालभारतीही बदलत आहे” – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

Next Post

सोमय्यांच्या हिटलिस्टवर आता जय अजित पवार! अजित पवार म्हणतात, महत्व नको!

Next Post
Ajit Pawar

सोमय्यांच्या हिटलिस्टवर आता जय अजित पवार! अजित पवार म्हणतात, महत्व नको!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!