Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चंद्रपूरमधील दारुबंदी उठवण्याला उच्च न्यायालयात आव्हान!

आघाडी सरकारच्या व्यसनाभिमुख धोरणाविरोधात वाढता संताप

December 21, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Chandrapur liquor ban

मुक्तपीठ टीम

राज्यातील आघाडी सरकारचे काही निर्णय हे व्यसनाभिमुख धोरण दाखवणारे असल्याची टीका होत आहे. या धोरणानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांनी परिश्रमानं संघर्षातून मिळवलेली दारुबंदी उठवण्याचा निर्णय़ घेण्यात आला. त्या निर्णयाचा पुनर्विचार करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, शेतकरी नेते ॲड. वामनराव चटप यांचा याचिकाकर्त्यांमध्ये समावेश आहे.

 

महिलांची आंदोलनं, देवतळे समितीच्या शिफारशी आणि जनआंदोलनाचा रोष यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री विजय वडे्डटीवार यांनी जिल्ह्यातली दारूबंदी उठवण्यासाठी पुढाकार घेतला होता.

 

मे महिन्यात दारुबंदी उठवण्याचा निर्णय

मे महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दारूबंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसंच जलदगतीने ८ जून रोजी शासनाने जिल्ह्यातली दारूची दुकानं सुरू करण्याचा आदेश काढला. एकंदरीत दारूबंदी उठवण्याच्या निर्णयाचे पडसाद उमटू लागले आहेत. सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग, देवाजी तोफा, शेतकरी संघटना नेते ॲड. वामनराव चटप आणि महिला संघटनांचे दोन प्रतिनिधी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली तेव्हा दारूबंदीच्या निर्णयाविरोधात लिकर असोसिएशनने न्यायालयात धाव घेतली. राज्य सरकारने घेतलेला चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचा निर्णय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवला होता.

 

रमानाथ झा समितीच्या अहवालाचा आधार घेत दारु दुकानं उघडली!

राज्य सरकारने रमानाथ झा समितीचा आधार घेत पुन्हा दारू दुकानं सुरू केल्याने केवळ चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर शेजारच्या गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातल्या नागरिकांमध्येही रोष निर्माण झाला आहे. दारूबंदी उठवल्यानंतरही झा समितीचा अहवाल अनेक दिवस गोपनीय ठेवण्यात आला. या अहवालावर कोणतीही चर्चा राज्य सरकारकडून झाली नाही. शासनाचा निर्णय संदिग्धता निर्माण करणारा असून या निर्णयाचे अवलोकन आवश्यक झाले आहे. चंद्रपूरमधली दारूबंदी उठवण्याचा सरकारचा निर्णय अन्यायकारक आणि जनहित विरोधी असल्याचं सांगत पुनर्विचार करण्याचे आवाहन अनेक सामाजिक संस्था, संघटना आणि महिलांनी केलं होतं. मात्र राज्य सरकारचा कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप केला जात आहे.

 

डॉ.अभय बंग, ॲड. वामनराव चटप यांच्यासह मान्यवरांची याचिका

सामाजिक संस्था आणि चळवळीतल्या नेत्यांनी आता न्यायालयाचा मार्ग अवलंबला आहे. डॉ. अभय बंग, ॲड. वामनराव चटप, देवाजी तोफा, पोर्णिमा निरंजने, तेजस्विनी कावळे यांनी दारुबंदी उठवण्याच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली आहे. पालकमंत्री विजय वडे्डटीवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अवर सचिव, गृह विभाग, जिल्हाधिकारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

 

याचिकेत दारूबंदी कायद्यातील तरतुदींआधारेच आव्हान

महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या दारू बंदी उठविण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळावी आणि महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या व्यसनमुक्ती धोरण २०११ ची प्रभावी अंमलबजावणी केली जावी, यासह महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातल्या अनेक बाबी अधोरेखित करत ही याचिका दाखल करण्यात आली आहे. दारूबंदी उठवण्याचा निर्णय अन्यायकारक असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. या जनहित याचिकेच्या माध्यमातून दारूबंदी कायद्याचे आणि व्यापक जनहिताचे मुद्दे मांडले आहेत.


Tags: Chandrapur liquor banVijay Waddatiwarचंद्रपूरमहाराष्ट्र सरकारमुंबई उच्च न्यायालयविजय वडे्डटीवार
Previous Post

गुणवंतांना डावललं, बेरोजगारांना लुटलं! सुपेनं गडगंज कमवलं! कोट्यवधीचं घबाड जप्त!!

Next Post

शिवद्रोह्यांना कोल्हापुरात उत्तर! ४०० चौ. फुटांचा भव्य शिवफलक! शिवगर्जनांनी आसमंत दणाणला!!

Next Post
shivaji maharaj poster in kolhapur

शिवद्रोह्यांना कोल्हापुरात उत्तर! ४०० चौ. फुटांचा भव्य शिवफलक! शिवगर्जनांनी आसमंत दणाणला!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!