Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एकरकमी एफआरपीच्या आदेशाबद्दल भाजपा प्रदेश किसान मोर्चातर्फे मोदी सरकारचे अभिनंदन

October 14, 2021
in घडलं-बिघडलं
0
bjp

मुक्तपीठ टीम

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. ही मागणी मान्य करून शेतकऱ्यांना न्याय दिल्याबद्दल भाजपा प्रदेश किसान मोर्चाने मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. एफआरपी चे तुकडे पाडण्याची शिफारस करणाऱ्या आघाडी सरकारचा ऊस उत्पादक विरोधी चेहरा यानिमित्ताने उघड झाला आहे , अशी टीका भाजपा प्रदेश किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेवनाना काळे यांनी बुधवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर, आ. रमेश पाटील, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते.

 

काळे यांनी सांगितले की, नीती आयोगाने एफआरपी बाबत राज्य सरकारांच्या शिफारशी मागविल्या होत्या. ठाकरे सरकारने साखर सम्राटांच्या हितासाठी एक वर्षाच्या कालावधीत तीन टप्प्यात एफआरपी देण्याची शिफारस नीती आयोगाकडे केली होती. एकीकडे शेतकरी हिताच्या गप्पा मारायच्या प्रत्यक्षात शेतकऱ्यांचे नुकसान करण्याचे काम महाविकास आघाडीचे सरकार करीत आहे. भाजपा किसान मोर्चाने पुणे येथे २९ सप्टेंबर रोजी साखर आयुक्त कार्यालयासमोर एकरकमी ‘एफआरपी’साठी आंदोलन केले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकरकमी एफआरपी साठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्र पाठविले होते. गोयल यांनी ही मागणी मान्य करत असल्याचे मा. फडणवीस यांना कळविले होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या मागणीसंदर्भात गोयल यांच्याशी संपर्क साधला होता.

 

एकरकमी एफआरपीच्या मागणीसाठी माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. उन्मेष पाटील यांच्यासमवेत आपण गोयल यांची भेट घेतली होती. यावेळी गोयल यांनी एकरकमी एफआरपी ची मागणी मान्य केल्याचे आम्हाला सांगितले होते.ही मागणी मान्य केल्याबद्दल राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांतर्फे किसान मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी , वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले आहेत, असेही काळे यांनी सांगितले.

 

शेतकरी कल्याणाच्या गप्पा मारणाऱ्या आघाडी सरकारने अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रती गुंठा १३५ रु. मदत देऊन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. अन्नत्याग आंदोलन करूनही आघाडी सरकारने त्याची दखल घेतलेली नाही. फडणवीस सरकारने २०१९ मध्ये दिलेल्या मदतीप्रमाणे शेतकऱ्यांना मदत द्यावी , अशी मागणीही श्री. काळे यांनी केली.

 


Tags: BJPchandrakant patilchief minister uddhav thackeraydevendra fadanvispiyush goyalएफआरपीनीती आयोगपंतप्रधान नरेंद्र मोदीप्रवीण दरेकरभाजपा प्रदेश किसान मोर्चावाणिज्य मंत्री पीयूष गोयलसदाभाऊ खोत
Previous Post

अणु खनिज संचालनालयात अन्वेषण आणि संशोधनाच्या १२४ जागांसाठी भरती

Next Post

राजर्षी शाहू महाराज तसेच माता रमाबाई यांचे स्मारक प्रेरणादायी व्हावे

Next Post
Rajashri Shahu maharaj and mata rama bai smarak

राजर्षी शाहू महाराज तसेच माता रमाबाई यांचे स्मारक प्रेरणादायी व्हावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!