Friday, May 23, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

भाजपा सरकारची शेतकरीविरोधी अमानुषता! राज्यपालांनीच व्यक्त केला संताप!!

“मला पदाची पर्वा नाही, परत शेतकऱ्यांमध्ये जावेसं वाटतंय” – राज्यपाल सत्यपाल मलिक

August 30, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Farmers Protest

मुक्तपीठ टीम

हरियाणामध्ये नव्या कृषी कायद्यांचा विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची डोके फोडणारी अमानुषता दाखवणाऱ्या पोलीस कारवाईविरोधात संतापाचा भडका उडत आहे. शेतकऱ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारात जखमी झालेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि विरोधकही आक्रमक झाले आहेत. आता त्यात भाजपामधूनही साथ मिळत आहे. मेघालयचे राज्यपाल आणि पूर्वाश्रमीचे भाजपा नेते सत्यपाल मलिक यांनी देखील या कारवाईविरोधात संताप व्यक्त केला आहे. माझं राज्यपाल पद गेलं तरी चालेल, पण भाजपाने शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

पोलीस लाठीमारात शेतकरी हुतात्मा

  • या लाठीमारामध्ये शेतकरी सुशील काजल शनिवारी बसताडा टोल प्लाजा येथे गंभीर जखमी झाले होते.
  • त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती.
  • रात्री उशिरा ते उपचार सुरु असताना हुतात्मा झाले.
  • किसान एकता मोर्चानं त्यांच्या हौतात्म्यासाठी सरकारला जबाबदार ठरवलं आहे.

 

मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी- राज्यपाल मलिक

  • “मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे.
  • हरियाणाचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांवर लाठीचा उपयोग करत आहेत.
  • मी वरिष्ठ नेत्यांना शेतकऱ्यांवर बळाचा वापर न करण्यास सांगितलं.
  • केंद्र सरकारने बळाचा उपयोग नाही केला.
  • एसडीएम आयुष सिन्हा यांना तात्काळ बरखास्त करायला हवं.
  • ते एसडीएम पदासाठी लायक नाहीत.
  • मात्र, सरकार त्यांचं समर्थन करीत आहे.

 

मी सरकारला घाबरत नाही

  • राज्यपाल मलिक यांनी आंदोलनात मृत्यू झालेल्या कुटुंबांविषयी सरकारने संवेदना व्यक्त न केल्यानं नाराजी व्यक्त केली.
  • “शेतकरी आंदोलन सुरू होऊन १ वर्षे पूर्ण झाला आहे.
  • आतापर्यंत ६०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
  • मात्र, सरकारमधील कुणाकडूनही शेतकऱ्यांचं सांत्वन करण्यात आलं नाही.
  • हरियाणातील एका एसडीएमचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
  • या व्हिडीओमध्ये बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना आंदोलकांची डोकी फोडण्याचा आदेश हे एसडीएम देताना दिसत आहेत.
  • माझ्या वक्तव्यांसाठी मी सरकारला घाबरत नाही.
  • मला राज्यपाल पदावर प्रेम नाही.
  • मी जे बोलतोय ते मनापासून बोलतोय.
  • मला शेतकऱ्यांकडे परत जावं लागेल असं वाटतंय.

 

नेमकं व्हिडीओमध्ये काय आहे?

  • करनालमध्ये पोलिसांनी जागोजागी बॅरिकेट्स लावून, दांड्या बांधून रस्ते अडवले होते.
  • तेथे उपस्थित सरकारी अधिकारी एसडीएम आयुष सिन्हा पोलिसांना आदेशाऐवजी चिथावणीखोर भाषा वापरताना दिसत आहेत.
  • ‘ही नाकाबंदी तोडून कुणीही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मी सांगतो सरळ त्यांची डोकी फोडा.
  • मी स्पष्ट सांगतो, डोकं फोडा. मी डेप्युटी मॅजिस्ट्रेट आहे.
  • लिखित देतो.
  • सरळ लाठीचार्ज करा, काही शंका? सरळ उचलून उचलून मारा.
  • कोणतीही शंका नाही, कुठल्याजी आदेशाची गरज नाही.
  • क्लिअर आहात तुम्ही.
  • हा नाका कुठल्याही परिस्थितीत आम्ही तुटू देणार नाही.
  • आपल्याकडे पुरेसं बळ आहे. १०० जवानांची फौज आहे.
  • इथं तुम्हाला सुरुवातीच्या बंदोबस्तासाठी उभं केलं आहे.
  • कोणतीही शंका नाही. करणार ना लाठीचार्ज?
  • इथून एकही माणूस गेला नाही पाहीजे.

Tags: BJPFarmers protestGovernor Satyapal malikmanoharlal khattarnarendra tomarprime minister narendra modiएसडीएम आयुष सिन्हाकरनालकिसान एकता मोर्चामुख्यमंत्री मनोहर लाल खट्टरराज्यपाल सत्यपाल मलिकहरियाणा
Previous Post

टोमॅटो उत्पादकांच्या प्रश्नांबाबत समशेरपूर बाजार समितीत आंदोलन

Next Post

“अफगाणिस्तान, इस्लाम, भारत व भारतीय मुस्लीम”

Next Post
taliban

"अफगाणिस्तान, इस्लाम, भारत व भारतीय मुस्लीम"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!