Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देशात गेल्या तीन वर्षात बेरोजगारीमुळे ९ हजार आत्महत्या! तर कर्जामुळे १६ हजारांनी जीवन संपवलं!

केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती

February 10, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
unemployment

मुक्तपीठ टीम

एकीकडे देश विकासाच्या मार्गावर भरधाव जात असल्याचा दावा केला जात असतानाच बेरोजगारी आणि कर्जबाजारीचे प्रमाणही वाढत आहे. कोरोना, बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे अनेकांनी आपलं जीवन गमावलं आहे. गेल्या तीन वर्षात २५ हजारांहून अधिक जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती सरकारने राज्यसभेत दिली आहे. केंद्र सरकारने बुधवारी संसदेत आत्महत्यासंदर्भातील आकडेवारी सादर केली. यावेळी सरकारने सांगितले की, २०१८ पासून ते २०२० दरम्यान १६ हजारांहून अधिक लोकांनी कर्जामुळे आत्महत्या केली आहे. तर ९ हजार १४० लोकांनी बेरोजगारीमुळे आपले जीवन संपवले आहे.

 

केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात आत्महत्यासंदर्भातील आकडेवारी सादर केली. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने (एनसीआरबी) दिलेल्या आकडेवारीच्या आधारे केंद्राने आत्महत्यांसंदर्भातील माहिती वरिष्ठ सभागृहात मांडली. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, कर्जबाजारीपणा वा दिवाळखोरीमुळे २०१८ मध्ये ४ हजार ९७०, २०१९ मध्ये ५ हजार ९०८ जणांनी आत्महत्या केली. २०२०मध्ये ही संख्या ६०० ने कमी झाली. या काळात ५ हजार २१३ जणांनी आत्महत्या केल्या.

 

बेरोजगारीमुळे २०२० मध्ये एकूण ३ हजार ५४८, २०१९ मध्ये २ हजार ८५१ आणि २०१८ मध्ये २ हजार ७४१ जणांनी आत्महत्या केल्या. २०१७ मध्ये २ हजार ४०४, २०१६ मध्ये २ हजार २९८, २०१५ मध्ये २ हजार ७२३ आणि २०१४ मध्ये २ हजार २०७.

 

केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात (२०१४-२०२०) बेरोजगारांमधील आत्महत्यांची एकूण संख्या १८ हजार ७७२ होती, दरवर्षी सरासरी २ हजार ६८१ जमांनी आत्महत्या केल्या आहेत. कोरोना काळात अनेकांचे जॉब्स गेल्याने बेरोजगारी वाढली. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले. त्यामुळे या काळात २०२० मध्ये ते सर्वाधिक म्हणजे ३ हजार ५४८ इतकी आत्महत्येची संख्या होती.

 

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये बेरोजगारीमध्ये सर्वाधिक आत्महत्या कर्नाटक ७२०, त्यानंतर महाराष्ट्र ६२५, तामिळनाडू ३३६, आसाम २३४ आणि उत्तर प्रदेश २२७ मध्ये झाल्या.


Tags: IndiaNCRBunemploymentएनसीआरबीकर्जबाजारीकोरोनाबेरोजगारीभारतराज्यसभा
Previous Post

“माफी मागा अन्यथा राज्यातील भाजपा नेत्यांच्या घरासमोर ‘महाराष्ट्रद्रोही’ म्हणून आंदोलन करु!”: नाना पटोले

Next Post

“चित्ररथातून झळकते महाराष्ट्राची अस्मिता”

Next Post
Mahaashtra Received 12 Awards for chitrarath presentation on republic day

"चित्ररथातून झळकते महाराष्ट्राची अस्मिता"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!