Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

बंडखोरीनंतर राजकीय पक्ष कुणाचा होतो? वाचा गेल्या ६ वर्षातील २ फुटीच्या गोष्टी…

June 24, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Chirag Paswan Uddhav Thackeray And Akhilesh yadav

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंकडून केवळ तेवढ्यावरच थांबतील असे मानले जात नाही. ते शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या ताब्यावरच न थांबता मुख्य शिवसेना पक्षावरही ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतील, असे मानले जाते. मुळात देशात असं पहिल्यांदाच घडत आहे, असं नाही. गेल्या सहा वर्षात देशात तशा दोन घटना घडल्या. त्यावेळी नेमकं काय घडलं, ते जाणून घेणं महत्वाचं आहे.

समाजवादी पार्टी

२०१६ मध्ये उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी काही महिने उरले असताना राज्यात समाजवादी पक्षाची सत्ता होती. पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे पुत्र अखिलेश यादव हे राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या सरकारमध्ये मंत्री आणि काका शिवपाल यादव यांनी अखिलेश यांच्याविरोधात आघाडी तयार केली.

गायत्री प्रजापती यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी केल्यानंतर वाद आणखी वाढला. प्रजापतींना हटवण्याचा अखिलेश यांचा निर्णय मुलायम आणि शिवपाल यांना पटला नाही. मुलायम यांनी प्रजापतींना पुन्हा मंत्री करण्यास सांगितले, पण अखिलेश यांनी तसे करण्यास नकार दिला. अखिलेश यांच्या निर्णयानंतर मुलायम यांनी त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून शिवपाल यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली.

त्यामुळे सत्ता आणि संघटनेतील वाद आणखी चिघळला आणि अखिलेश यांनी शिवपाल यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. प्रत्युत्तर म्हणून अखिलेशनयांच्या अनेक सहकाऱ्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली. पक्षाचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांनाही पक्षातून हाकलण्यात आले. यामुळे संतापलेल्या अखिलेश यांनी या संपूर्ण वादामागे अमर सिंह यांचा हात असल्याचे सांगितले.

हा वाद इतका वाढला की मुलायम सिंह यादव यांनी राम गोपाल यादव आणि त्यांचे पुत्र अखिलेश यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली. यानंतर राम गोपाल यादव आणि अखिलेश यादव यांनी पक्षाचे अधिवेशन बोलावले, त्यात पक्षाचे बहुतांश दिग्गज आले. बंडखोर गटाच्या या अधिवेशनात मुलायमसिंह यादव यांच्याऐवजी अखिलेश यादव यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. शिवपाल यांच्या जागी नरेश उत्तम यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. हे प्रकरण निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले. पक्षाचे बहुतांश लोकप्रतिनिधी अखिलेश यांच्या बाजूने होते. शिवपाल छावणीत फक्त डझनभर नेते राहिले. निवडणूक आयोगाने अखिलेश यांच्या बाजूने समाजवादी पक्षावरील अधिकाराचा निर्णय घेतला. यानंतर शिवपाल यांनी स्वत:चा वेगळा पक्ष प्रगतीशील समाजवादी पक्ष स्थापन केला.

चिराग पासवान

रामविलास केंद्रीय राजकारणात सक्रिय होते. त्याचवेळी पशुपती पारस प्रदेशाध्यक्ष होते. रामविलास आजारी पडल्यावर चिराग यांनी पक्षाची कमान हाती घेतली. चिराग यांनी काका पशुपती पारस यांच्या हातून बिहारची सत्ता हिसकावून घेतली. यानंतर दोघांमधील दरी वाढू लागली. ऑक्टोबर रामविलास यांच्या मृत्यूनंतर वर्चस्वाची लढाई तीव्र झाली. बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिराग यांनी निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला. याला पशुपती पारस यांनी विरोध केला.चिराग निवडणुकीच्या निकालात सपशेल अपयशी झाले. यानंतर बंडखोरी आणखी वाढली. जून २०२१ पर्यंत, पशुपती पारस यांनी पक्षाच्या सहा खासदारांपैकी पाच खासदारांसह चिराग यांच्याकडून संसदीय पक्ष आणि पक्षाची कमान दोन्ही पदे हिसकावून घेतली. पशुपती पारस आता केंद्रात मंत्री आहेत. पशुपती पारस गटातून लोपाजाचे नाव मिळाले. त्याच वेळी, चिराग आता लोपाजाचे (रामविलास) नेता आहेत.


Tags: akhilesh yadavChirag PaswanEknath ShindeLok Janta Partysamajwadi partyShivsenaएकनाथ शिंदेबंडखोरीशिवसेना
Previous Post

मविआचं सरकार पडतंय त्याचं दु:ख नाही! पण भाजपावरही अशीच वेळ येईल!! – राजू शेट्टी

Next Post

शिवसेना पक्ष ताब्यात घेणं एकनाथ शिंदेंसाठी अशक्यच! ऐका शिवसेनेची घटना काय सांगते…

Next Post
शिवसेना पक्ष ताब्यात घेणं एकनाथ शिंदेंसाठी अशक्यच! ऐका शिवसेनेची घटना काय सांगते…

शिवसेना पक्ष ताब्यात घेणं एकनाथ शिंदेंसाठी अशक्यच! ऐका शिवसेनेची घटना काय सांगते...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!