Friday, June 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिंदे गटाच्या केसरकरांनी का केलं भाजपाला नेत्यांना आवरण्याचं आवाहन?

June 30, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
why ss rebel deepak kesarkar appeal bjp

मुक्तपीठ टीम

दहा दिवसांच्या महाराष्ट्रातील सत्तेच्या महासंघर्षानंतर उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री आपल्या मुख्यमंत्री आणि आमदार पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाच्या गोट्यात जल्लोष दिसून आला. या जल्लोषावर शिवसेनेचे बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी आक्षेप घेतला आहे. भाजपाचा असा जल्लोष योग्य नसल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. आमचं बंड हे आमच्या नेत्याविरोधातील नाही. भाजपाने आमच्यासारखंच पथ्य पाळावं, असं आवाहन त्यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे.

दीपक केसरकरांनी भाजपाला केलेलं आवाहन…

शिवसेना हा विचार आहे. शिवसेना हा विचार हिंदुत्वाचा विचार आहे. मराठी माणसांचा विचार आहे. तो विचार टिकला पाहिजे. सरकार येतं सरकार जातात. विचार बदलत नाही. हा विचार तसाच राहतो. आणि तो विचार कसा टिकवायचा हा सुद्धा एक विचार मंथनाचा भाग आहे.

भाजपाने पथ्य पाळावं!

उद्धव साहेब कुठेतरी दुखावले जाऊ नये हा सुद्धा भाग आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाचे अनेक लोक बोलत होती. असं जेव्हा दहा-दहा जण एकावेळी बोलतात, तेव्हा एखादा मनुष्य जरी चुकीचा बोलला तरी त्याच्याकडून अपमान होऊ शकतो. शेवटी स्वाभिमान आहे. तो दुखावला जाऊ शकतो. म्हणून जशी शिंदे गटाकडून जी काळजी घेतली जाते तशीच ती भाजपाने ही घेतली पाहिजे, अशी माझी कळकळची विनंती आहे. कुणाचं मन दुखवायचं नसतं. आम्ही आमच्या नेत्यांशी केला ना संघर्ष. कशासाठी केला तत्वासाठी केला. मग ते पथ्य आम्ही जसं पाळतो तसं भाजपाने ही पाळलं पाहिजे. जसं की, एखादा आमदार, खासदार चुकीचा बोलत होता, तर संघर्षाच्यावेळी ते ठीक आहे. आता तुम्ही जर सत्तेवर येत असाल तर त्या लोकांना असं थांबवलं सुद्धा पाहिजे. ही काळाची गरज आहे असं मला वाटतं.

बोलण्यावर मर्यादा पाहिजे!

काल आम्ही टिव्हीवर जे बघितलं जे काही चालू होतं, ते योग्य नाही. परंतु मोठे नेते आहेत, त्यांनी बोलताना किंवा किती लोकांनी बोलावं याला सुद्धा मर्यादा असते ना. जो नेता ज्याला माहिती असेल आपल्याला काय बोलायचं आहे. शेवटी आपल्याला महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे. सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला महाराष्ट्र पुढे घेऊन जायचा आहे. त्यावरून आपण एक मर्यादा आणली पाहिजे. मर्यादा अशी आणली पाहिजे की, किती लोकं ठराविक बोलतील.आणि मग ते बोलताना त्यांच्या बोलण्यामध्ये संयम पाहिजे. त्यांनी ते पथ्य पाळलचं पाहिजे

आमचं बंड आमच्या नेत्याविरोधात नाही!

कालच्या भाजपाच्या जल्लोषामुळे दुखावले जाणार. कारण आम्ही आमच्या नेत्याच्याविरोधात बंड नाही केला. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात केलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांना दुखावणारी कोणती वक्तव्य आली तर आमच्या लोकांना वाईट वाटणार ना. आणि त्यासाठी पथ्य पाळले गेले पाहिजे. फडणवीस हे मोठे नेते आमच्या संकटकाळात ते होते. पण कुठेतरी हे थांबलं पाहिजे. अशा प्रकारची वक्तव्य थांबली पाहिजे.

आमचं सत्तेसाठी केलेलं बंड नाही!

हे केवळ जर बंड असतं तर सहा सहा मंत्री यांच्यामध्ये सामील का होतात. यांच्याकडे मंत्री पदं होतीच ना. ती मंत्रीपद यांच्याकडे जर होती तर मग ते का आले? हा एक वेगळा भाग असतो आणि म्हणून केवळ याच्याकडे बंड म्हणून बघू नका. हे सत्तेसाठी केलेलं बंड नाही. हे विचारांसाठी केलेलं बंड आहे. आणि ते जर बंड असेल तर पक्षामध्ये काही तरी घडलं असेल म्हणून ते घडलं आहे. तो एक वेगळा विचार आहे. हा एक वैचारिक संघर्ष आहे.


Tags: BJPDipak KesarkarMaharashtraShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेदीपक केसरकरभाजपामहाराष्ट्रमहाविकास आघाडीशिवसेना
Previous Post

प्राथमिक टप्प्यात चित्रपट निर्मितीसाठी २७ चित्रपटांना ८ कोटी ६५ लाख रुपये

Next Post

फडणवीसांचं जुनं भाषण व्हायरल…”मैं समुंदर हूं, लौटकर वापस आऊंगा!”

Next Post
Devendra Fadnavis Viral Speech

फडणवीसांचं जुनं भाषण व्हायरल..."मैं समुंदर हूं, लौटकर वापस आऊंगा!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!