Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

उत्तरप्रदेश निवडणूक २०२२: निकाल बदलू शकणारे दलित मतदार यावेळी काय करणार?

February 5, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
UP Election (2)

मुक्तपीठ टीम

येत्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी संपूर्ण जोर लावल्याचं दिसत आहे. त्यातही सर्वात जास्त खासदार निवडून देणाऱ्या उत्तरप्रदेशावर सर्वच प्रमुख पक्षांचं खास लक्ष दिसत आहे. त्या राज्यावर सत्ता असली तर २०२४च्या लोकसभेसाठी बळ वाढेल, असं समीकरण आहे. पण राज्यातील मतदारांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त असणारा दलित मतदार नेमकी काय भूमिका घेतो, त्यावरही निकालाचा कल ठरणार आपे. पण अद्याप दलित मतदारांच्या मनात काय ते स्पष्ट झालेलं नाही.

 

उत्तरप्रदेश निवडणुकीत सत्ताबदल होतं का? की पुन्हा भाजपाचे सरकार येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासाठी मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत. यावेळीही सर्वच पक्ष दलितांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांनी पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पूर्ण जोर लावला आहे. समाजवादी गठबंधन आणि भाजपा आघाडी या दोघांचे लक्ष्य हे दलित मतदार आहेत.

 

दलित मतदारांचा कल बसपाकडे, आता?

दलित मतदारांना त्यांची ताकद चांगलीच समजली आहे.याच ताकदीच्या जोरावर त्यांनी बसपाला सत्तेच्या शिखरावर नेले आहे. १९९३ मध्ये बसपा पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती.या निवडणुकीत त्यांची मते ११.१२ टक्के होती. बसपाने ६७ जागा जिंकल्या होत्या. १९९६ च्या निवडणुकीत मतांची टक्केवारी १९.६४ टक्क्यांपर्यंत वाढली. २००२ मध्ये मतांची टक्केवारी २३.०६ टक्क्यांवर पोहोचली आणि ९८ जागा जिंकल्या. २००७ साली बसपाला ३०.४३ टक्के मते मिळाली आणि २०६ जागांसह पूर्ण बहुमताने सत्ता मिळवली. मात्र, यात बसपा सुप्रीमो मायावती यांचे दलित ब्राह्मण मतांच्या एकत्रीकरणाचे सोशल इंजिनिअरिंग होते. २०१२ च्या निवडणुकीत बसपाचा आलेख घसरला आणि २५.९५ टक्के मतांसह बसपा ८० जागांवर घसरली. २०१७ च्या निवडणुकीत बसपाला केवळ २२.२४ टक्के मतं मिळाली. त्यामुळे बसपाच्या १९ जागा कमी झाल्या.

सर्व पक्षांचा दलित मतदारांना पटवण्याचा प्रयत्न!

  • पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये जाटव, खटिक, भुईयार, पासी, वाल्मिकी असे अनुसूचित जातीचे मतदार आहेत.
  • त्यातील पन्नास टक्क्यांहून अधिक मतदार हे जाटव मानले जातात.
  • वाल्मिकी, भुईयार हे भाजपाचे मतदार मानले आहेत.
  • त्यामुळे यावेळी जाटव सर्वांचे लक्ष्य आहे.
  • यावेळीही बहुसंख्य दलित बसपासोबत असण्याची शक्यता असली, तरी भाजपा आणि युतीच्या बाजूने जाणाऱ्यांची संख्याही कमी नसणार.
    दलितांचा एक वर्ग असाही आहे जो पर्यायांचा विचार करत आहे.
  • अशा स्थितीत दलितांना कोणताही एकच पक्ष बांधून ठेवू शकेल, असे नाही.

 

येथील दलितांचा प्रभाव

  • पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तरप्रदेशात आग्रा येथे निवडणूक होत आहे.
  • येथे विधानसभेच्या एकूण ९ जागा आहेत.
  • गेल्या निवडणुकीत भाजपाने येथील सर्व जागा जिंकल्या होत्या.
  • गेल्या निवडणुकीतच दलितांनी भाजपाकडे झुकल्याचे बोलले जात आहे.
  • हा ट्रेंड कायम ठेवण्यासाठी भाजपा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
  • मात्र, बसपला हे चांगलेच ठाऊक आहे.
  • त्यामुळेच मायावतींनी यावेळी आग्रा येथून निवडणुकीचा हंगाम सुरू केला.
  • सहारनपूर, बुलंदशहर, गाझियाबाद, मेरठ, मुझफ्फरनगर या जिल्ह्यांमध्येही दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे.

Tags: akhilesh yadavBJPsamajwadi partyUPUP Election 2022अखिलेश यादवउत्तर प्रदेशउत्तर प्रदेश निवडणूकबसपाभाजपामाावती
Previous Post

सिडकोच्या ५,७३० घरांच्या गृहनिर्माण योजनेला उत्तम प्रतिसाद; आतापर्यंत १० हजार नागरिकांनी केली अर्ज नोंदणी

Next Post

‘मावज’च्या सोशल मीडिया मोहीमेमुळे महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती”

Next Post
Maharashtra's Biodiversity Standards painting

‘मावज’च्या सोशल मीडिया मोहीमेमुळे महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!