Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

#व्हाअभिव्यक्त “आघाडी सरकार आरक्षितांच्या आरक्षणाचे मारेकरी!”

March 7, 2021
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
obc reservation

राजेंद्र पातोडे

आरक्षित घटकांच्या संरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक’ असल्याचा हास्यास्पद दावा राज्य सरकारने केला आहे.मात्र पदोन्नतीच्या आरक्षण नाकारून आणि आताच सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेल्या ओबीसी आरक्षण, सरपंच पदाचे आरक्षण घालविणे ह्यास राज्य सरकार दोषी आहे.अनुसूचित जाती जमाती व ओबीसी च्या घटनादत्त अधिकाराचे रक्षण करण्याचा दावा सरकार करीत असले तरी आघाडी सरकार अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी आरक्षणाचे मारेकरी असल्याचा आरोप वंचित बहूजन आघाडी राज्य प्रवक्ता आणि युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी केला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील आरक्षण ५० टक्क्यांच्या वर जायला नको निवडणुकांतील आरक्षण ५० टक्क्यांच्या आत बसवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी दिले. या निर्णयामुळं धुळे, नंदुरबार, नागपूर, अकोला, वाशिम, भंडारा, गोदिया येथील जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकांमध्ये नव्यानं आरक्षण निश्चित करावं लागणार आहे.त्यातून ओबीसी सदस्य संख्येवर गंडांतर आले आहे.५२% असलेल्या ओबीसी च्या २७% जागा देखील काढून घेण्यासाठी सरकारने ‘सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी मध्ये वेळ काढुपणा केल्याने ओबीसींना आपल्या हक्काच्या जागा गमवावे लागत आहे.ह्या निर्णयामुळे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था मधील जागा कमी होणार आहेत.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आव्हान देण्यासाठी राज्याचे महाधिवक्ता, दिल्लीतील वरिष्ठ वकिलांशी चर्चा करण्यात येईल. विरोधी पक्षनेते आणि दोन्ही बाजूच्या नेत्यांशी बैठक आयोजित करून पुढील कायदेशीर व्यूहरचना निश्चित करण्यात येईल,’ असं अजित पवार ह्यांनी अधिवेशनात सांगितले.मात्र ओबीसी आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयात राज्याचे महाधिवक्ता आणि विधी व न्याय खाते काय दिवे लावत होते, त्यांनी सरकारची बाजू मांडताना अत्यंत बेजबाबदारपणे सरकारची बाजू मांडली आहे.हे निकालाचे वाचन केल्यास लक्षात येते.

नुकताच राज्य सरकारने मागासवर्गीयांच्या बढतीमधील आरक्षणाबाबत अद्यादेश काढून बढत्यांमधील आरक्षण बंद केले आहे. १८ फेब्रुवारी रोजी अद्यादेश जारी केला आहे.महाविकास आघाडी सरकारने पदोन्नतीच्या १००% जागा भरताना अनुसूचित जाती जमाती ओबीसी आरक्षण रद्द केले. राखीव असलेल्या ३३ टक्के जागां खुल्या प्रवर्गातून भरती करण्याचे आदेश दिले आहेत.विशेष म्हणजे मागासवर्गीय मंत्र्यांचा मंत्रिगट स्थापन करुन हा बढत्यांमधील आरक्षण संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत निवडणूक मध्ये देखील आरक्षित जागांचे आरक्षण बदलण्यात आले होते.निवडणूक पूर्व आरक्षण रद्द करून सरकारने आरक्षित सदस्य नसलेल्या जगावर खुल्या प्रवर्गातील सरपंच बनविले आहेत.राज्यात ग्रामपंचायत मध्ये ही बदमाशी केली गेली आहे.

ही उदाहरणे सरकारचा अनुसूचित जाती, जमाती तसेच ओबीसी आरक्षण विषयावर आघाडी सरकार या राखीव प्रवर्गातील घटकांचा किती प्रचंड द्वेष करते हे सिद्ध करणारे आहे.सबब भाजप सोबतच आघाडी तिन्ही पक्ष हे आरक्षण विरोधी असल्याचे सिद्ध होते, राज्य सरकार हे अनुसूचित जाती जमाती ओबीसींच्या आरक्षणाचे मारेकरी असल्याचा आरोप देखील राजेंद्र पातोडे ह्यांनी केला आहे.

 

VBA Rajendra Patode

(राजेंद्र पातोडे हे वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते आहेत)


Tags: Rajendra PatodeSupreme CourtVha Abhivyaktओबीसी आरक्षणराजेंद्र पातोडेसर्वोच्च न्यायालय
Previous Post

गुन्हे महत्त्वाचे- 1) मुंबईत एका अभिनेत्रीने तिच्यावर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.टीव्ही अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी फआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. 2) रचिपळूण तालुक्यातील सावर्डे आबीट गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका आईनेच आपल्या नवजात एक महिन्याच्या बाळाचा जीव घेतला आहे. दुसऱ्यांदा सुद्धा मुलगी झाली या रागातून एका महिन्याच्या मुलीला पाण्याच्या बादलीमध्ये बुडवून या निर्दयी आईने तिची हत्या केली. 3)कोचींग क्लासेसहून आपल्या घरी चाललेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तीन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली.मुलीने आरडाओरड केल्यानंतर त्या मुलीचे वडील व मामा धावून आले. त्यावेळी पालोदकरने चाकूचा धाक दाखवून पळ काढला होता. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी खुलताबाद येथून तिघांना अटक केली. 4)सेल्फी फोटो व्हायरल करण्याची आणि आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार करण्यात आला. जुने नाशिक परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल केला आहे. संशयित १७ वर्षीय मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 5)मुंबईतून गेल्या दोन वर्षांत जवळपास पाच हजार वाहने बेपत्ता झाली असून त्यातील तीन हजार वाहनांचा अद्यापही शोध लागलेला नाही. देशभरात घडलेल्या अतिरेकी हल्ल्यापासून अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये चोरीच्या वाहनांचा वापर झाला आहे.

Next Post

राज ठाकरेंचे नाणार प्रकल्पाला पाठिंब्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

Next Post
राज ठाकरेंचे नाणार प्रकल्पाला पाठिंब्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

राज ठाकरेंचे नाणार प्रकल्पाला पाठिंब्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!