Wednesday, May 14, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

परमबीर, शुक्ला आणि फडणवीस…

March 27, 2021
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
Parambir Fadnavis Rashmi shukla

डॉ. अजित जोशी

 

महाराष्ट्रात पोलिस अधिकारी, केंद्रीय यंत्रणा, सरकार आणि अर्थात विरोधी पक्षनेते, यांनी मिळून जो गोंधळ चालवलेला आहे, त्याची मुळं २०१४ ते २०१९ च्या फडणवीस कारभारात आहेत, हे समजून घ्यायला हवं.

फडणवीस मुख्यमंत्री झाले, ते स्वतःच्या नव्हे, तर दिल्लीच्या पुण्याईने. महाराष्ट्रात गेल्या 20 वर्षात झालेल्या प्रत्येक मुख्यमंत्र्याला काहीतरी जनाधार होता.गट होता. कधी 10, तर कधी 20 असे।आमदार होते, जे व्यक्तिशः नेत्याशी निष्ठावान होते. 2 ते 3 जिल्ह्यात तरी प्रभाव होता. फडनवीसांकडे यातलं काहीच नव्हतं. दिल्लीचा आशीर्वाद ही त्यांची एकमेव कमाई होती. सत्तेत आल्यावर पृथ्वीराज बाबांसारखा स्वतःचा पाया निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्नही केला नाही. उलट पद मिळाल्यावर त्यांनी पद्धतशीरपणे पक्षांतर्गत विरोधकांना संपवलं. ज्यांनी अनेक दशकं विरोधी पक्षात असताना भाजप वाढवली, त्यांच्या जागी बाहेरच्या पक्षातून आलेले दलाल किंवा जनाधार नसलेले नेते मोठे व्हायला लागले. दुसरीकडे मोदींप्रमाणेच त्यांनी मंत्र्यांना निष्प्रभ करून अधिकाऱ्यांची ताकद वाढवली. मुख्यमंत्री कार्यालयातले विशेष अधिकारी सत्ता गाजवायला लागले. तिसरं म्हणजे माध्यमांमध्ये आपली आरती ओवाळली जाईल, अशी एक लॉबी उभी केली (ज्याला चेष्टेने ‘लष्कर-ए-देवेंद्र’ असं नाव मिळालं.) खुद्द मुख्यमंत्री आणि त्यांच्या आजूबाजूला जमलेली प्रवीण दरेकर, राम कदम, प्रसाद लाड, चंपा असे नेते; सीएमो कार्यालयातले ज्यादा शहाणे तरुण, शुक्लानसारख्या अधिकारी; ठराविक पत्रकार (आणि अर्थात वहिनी!) अशी एक मोठी गॅंग ५ वर्षं राज्य चालवत होती. यातल्या कोणाचाच जनतेशी कनेक्ट नव्हता, हे महत्त्वाचं!

२०१९ ची निवडणूक मोडींप्रमाणेच फडणवीसांनी स्वतःच्या जीवावरही लढली. एकत्र लढून, लोकसभेतल्या भव्य विजयाची पार्श्वभूमी असून, विरोधक घायाळ आणि निष्प्रभ असून जागा कमी झाल्या. फडणवीसांचा कच्चा जनाधार उघडा पडला. मोदींचा आशीर्वाद, यापलीकडे त्यांचं राजकीय कर्तृत्व काही नाही, हे सिद्ध झालं. यातून त्यांची भाजपमधली आणि मोदींच्या नजरेतली ताकद कमी झाली. महाविकास सरकार जितकं स्थिर होत जाईल, फडणवीस तेव्हढे कच्चे पडत जातील. सध्याचं वादळ उठायच्या आधीही भाजपात थोडीशी गळती लागलेली होतीच. मविआ सरकार स्थिर आहे, अशी भावना राजकीय वर्गात जितकी बळावेल, तेवढी ही गळती वाढेल. सामान्य लोकांत जेव्हढी वाढेल, तेवढे फडणवीस विस्मृतीत जातील. त्यांच्यासोबतच त्यांची पक्षातली चौकडी, अधिकारी, पत्रकार (आणि अर्थात वहिनी!) यांचेही दिवस फिरतील, कारण त्यांना स्वतंत्र अस्तित्त्व शून्य आहे! थोडक्यात हे सरकार सतत अस्थिर राहावं, हे नुसतं फडणवीसांच्या हिताचंच नाही, तर जीवनमरणाचा प्रश्न आहे. हे सरकार पडलं नाही तरी चालेल, पण स्थिरावायला द्यायचंच नाही, हेच त्यांचं ध्येय आहे.

सुशांतसिंगची आत्महत्या खून सिद्ध होत नाही, पालघरच्या साधूंच्या हत्येमागे कोणतेही धार्मिक धागेदोरे मिळत नाहीत. कोरोना हातळणीबद्दल दूषणं देता येत नाही. राज्यपाल गाठीशी बांधूनही आमदार फुटत नाहीत. 6.5 जीबीच्या रेकॉर्डिंगमध्ये एकही गुन्हा सिद्ध होत नाही. अंबानींच्या बाहेर सापडलेल्या गाडीने पान टपरीलाही धोका नाही, परमबीर सिंगचे आरोप एकतर अतिशयोक्त आहेत किंवा सोयीच्या उशिराने केलेले… गेल्या वर्षभरात इतकी आकांडतांडवं करूनही निवडणुकीत 144 जागा मिळवायचा आत्मविश्वास अजूनही भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाला आलेला नाही. पण हे सगळं फडणवीस आणि कंपूच्या राजकीय अस्तित्त्वासाठी आवश्यक आहे आणि म्हणून येत्या 3 वर्षातही असे प्रयत्न होतच राहणार आहेत…!!

Dr Ajit Joshi

(डॉ. अजित जोशी हे राजकीय विश्लेषक असून चालू सामाजिक राजकीय घडामोडींवर नियमित परखड भाष्य करण्यासाठी ओळखले जातात.)


Tags: devendra fadanvisdr ajit joshiparambir singhRashmi ShuklaVha Abhivyaktडॉ. अजित जोशीदेवेंद्र फडणवीसपरमबीर सिंगरश्मी शुक्लाव्हा अभिव्यक्त
Previous Post

“मोदी सरकार शेतकरी आणि कामगार विरोधी”  – नसीम खान

Next Post

सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

Next Post
sachin

सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!