Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

विमा कंपन्यांकडून शेतकरी व व्यावसायिकांची अडवणूक थांबवा – नाना पटोले

August 8, 2021
in featured, सरकारी बातम्या
0
nana patole

मुक्तपीठ टीम

कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात २२ ते २५ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने तळयेसह इतर गावात दरडी कोसळून मोठी जीवीत व वित्तहानी झाली आहे. शेतकरी, व्यावसायीक, दुकानदार, सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. राज्य शासनाने मदत जाहीर केलेली असली तरी झालेले नुकसान पाहता वाढीव मदत देण्याची गरज आहे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

 

नाना पटोले यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले असून या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ३ ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत मदत जाहीर केलेली आहे.या मदतीचा शासन आदेश अद्याप निर्गमित झाला नसल्याची आपली माहिती आहे. मी स्वतः महाड, चिपळूण या अतिवृष्टीग्रस्त भागाचा ४ व ५ ऑगस्ट रोजी पाहणी दौरा करून स्थानिकांशी संवादही साधला आहे.अतिवृष्टीमुळे शेती, मच्छीमार व्यावसायीक, दुकानदार, घरांची मोठी हानी झालेली आहे. सरकारने मदत जाहीर केली असली तरी त्यात वाढ करण्याची गरज आहे.पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास दिरंगाई केली जात आहे,यासंदर्भात विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तातडीने विना विलंब नुकसान भरपाई मिळावी यासाठी निर्देश द्यावेत. पशुधन, शेती अवजारे, बियाणे मोफत द्यावेत. वाहून व खरडून गेलेल्या शेतीची तातडीने दुरुस्ती करावी. व्यावसायीकांनाही विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळण्यास सहकार्य मिळत नाही. या व्यावसायिकांना आयकर भरण्यासाठी सवलत वा मुदतवाढ मिळावी. शक्य असल्यास जीएसटी माफ करावा किंवा कर भरण्यासाठी मुदतवाढ वा सवलत द्यावी. या व्यावसायीकांना राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांकडून २ टक्के दराने कर्जपुरवठा मंजुर करावा, मंजुर केलेल्या कर्जावरील व्याजाचा बोजा शक्य असल्यास शासनाने भरावा. टपरीधारकांना वाढीव अर्थसहाय्य मिळावे, दुधाळ जनावरे, मेंढी, बकरी, गाढव, कुक्कुटपालन पक्षी यांच्याकरीता मंजूर केलेल्या प्रति कुटुंब नुकसान भरपाईमध्ये वाढ करावी. मत्सबोटी व जाळीसाठी मंजूर केलेल्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करावी, बाधीत कुटुंबांना कपडे, भांडी, घरगुती वस्तु यासाठी वाढीव सानुग्रह अनुदान मंजूर करावे. घरांच्या पडझडीबाबत शासनाने मंजूर केलेल्या मदतीमध्येही वाढ करावी.

 

महाड व चिपळूण भागातील गंधारी, सावित्री, वशिष्टी नद्यांचे खोलीकरण करणे, नैसर्गिक चक्रीवादळे, अतिवृष्टी, महापूर, डोंगराचे भूस्खलन यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घ्यावी. गंधारी, विशिष्ठी, सावित्री नद्यांच्या खोलीकरण व नदी पात्रात सुधारणा करण्याचे व पूर संरक्षक भिंती बांधण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये पाटबंधारे विभागाअंतर्गत असलेल्या मेरी, जलसंधारण विभागाअंतर्गत असलेल्या नेरी या संस्थांचा सहभाग घ्यावा, अशा मागण्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केल्या आहेत.


Tags: cm uddhav thackerayCongressnana patoleकाँग्रेसतळयेनाना पटोलेमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

आघाडी सरकारचं काम म्हणजे ‘जाऊ तिथं खाऊ!’ – आ. सदाभाऊ खोत

Next Post

मुंबईकरांचा लोकल प्रवास १५ ऑगस्टपासून! पहिल्या टप्प्यात दोन्ही डोस घेतलेल्यांना परवानगी!

Next Post
Mumbai local thackeray

मुंबईकरांचा लोकल प्रवास १५ ऑगस्टपासून! पहिल्या टप्प्यात दोन्ही डोस घेतलेल्यांना परवानगी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!