Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home Uncategorized

क्रीडा थोडक्यात: १) विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अवघ्या दोन दिवसांत अहमदाबाद कसोटी जिंकून इतिहास घडविला. भारत-इंग्लंड डे नाइट कसोटीत यजमान भारताने १० विकेट्स राखून सहज विजय मिळवला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात २२वेळा दोन दिवसांत निकाल लागले आहेत. अहमदाबाद कसोटीपूर्वी २१ वेळा सामन्याचा निकाल दोन दिवसांत लागला होता, परंतु भारतासाठी १२ तासांत विजय मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. २) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्याच दिवशी इंग्लंडचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडने ११२ तर भारताने १४५ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा डाव ८१ धावांत आटोपला आणि भारताला ४९ धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (२५) आणि शुबमन गिल (१५) यांनी सहज पूर्ण केले. या पराभवासोबतच इंग्लंडच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली. आतापर्यंत कोणत्याही कसोटी सामन्यात ज्या दिवशी डाव सुरू झाला त्याच दिवशी संघ बाद होणे आणि दोन्ही डावात मिळून २०० धावांचा टप्पाही न ओलांडणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला. ३) पृथ्वी शॉ याने गुरुवारी विजय हजारे करंडक ५० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम नोंदवला. पृथ्वीने १५२ चेंडूंत ३१ चौकार आणि ५ षटकारांच्या साहाय्याने उभारलेल्या नाबाद २२७ धावांच्या खेळीमुळे मुंबईने ४ बाद ४५७ धावांचा विक्रमी डोंगर उभारला. त्यामुळे ड-गटात मुंबईने पुदुचेरीवर २३३ धावांनी दिमाखदार विजय नोंदवला. ४) ४०० बळी घेत भारतीय गोलंदाज अश्विन याने विक्रम आपल्या नावे केला आहे. सर्वात जलद ४०० बळी घेणाऱ्यांमध्ये अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनने ७७ डावांत ४०० बळींचा टप्पा पार केला आहे. तर श्रीलंकेचा फिरकीपटू मुरलीधरन यानं ७२ डावांत पराक्रम केला आहे. आर. हॅडली आणि डेल स्टेन यांनी ८० कसोटीत ४०० बळींचा टप्पा पार केला आहे. तर रंगना हेरथ याने ८४ व्या कसोटीत हा पराक्रम केला आहे.

March 16, 2021
in Uncategorized
0


Previous Post

‘त्या’ शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे का मागितली नक्षलवादी बनण्याची परवानगी?

Next Post

३ लाख शेतकऱ्यांनी भरली ३१२ कोटी रुपयांची थकबाकी

Next Post
mahavitran

३ लाख शेतकऱ्यांनी भरली ३१२ कोटी रुपयांची थकबाकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!