Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

शिवसेना आमदार दहशतीखाली? संजय राऊत X एकनाथ शिंदे दावे-प्रतिदावे

June 22, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Eknath Shinde vs Shivsena

मुक्तपीठ टीम

सोमवार रात्रीपासून महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेचे बंडखोर नेते एखनाथ शिंदे यांच्यामुळे भूकंप आला आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ४० आमदार असल्याचा दावाही केला आहे. मात्र हे आमदार स्वत:च्या मर्जीने सूरतला गेलेत का असा प्रश्न निर्माण झाला होता कारण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आमदारांना सूरतमध्ये मारहाण झाल्याचा आरोप केला होता. तसेच शिवसेना आमदारांना कशा पद्धतीने गुजरातला नेलं, याचा पहिला प्रसंग समोर आला. परंतु एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांनी संजय राऊतांचा आरोप फेटाळून लावला आहे.

संजय राऊतांनी काय आरोप केले?

आमदार नितीन देशमुख हे सुरत येथे भाजपा तावडीत आहेत मुंबईतून त्यांचे अपहरण केले. सोमवारी रात्री त्यांनी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना गुजरात पोलीस व गुंडांनी बेदम मारहाण केली.मुंबईतील गुंड तेथे आहेत. तसेच पुढे त्यांनी गुजरातच्या भूमीवर हिंसा ? असा प्रश्न विचारत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरात मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग केलं आहे.

आमदार नितीन देशमुख हे सुरत येथे भाजपा तावडीत आहेत मुंबईतून त्यांचे अपहरण केले. सोमवारी रात्री त्यांनी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना गुजरात पोलीस व गुंडांनी बेदम मारहाण केली.मुंबईतील गुंड तेथे
आहेत
गुजरातच्या भूमीवर हिंसा ? @AmitShah4BJP @CMOGuj

— Sanjay Raut (@rautsanjay61) June 21, 2022

कैलास पाटील यांच्यासोबत घडलेला प्रसंग!

  • विधान परिषद निवडणूक संपल्यावर एकनाथ शिंदे यांनी आपल्याला जेवायला बोलाविले आहे, असं सांगून आमदार कैलास पाटील यांना एका खासगी गाडीतून मुंबई बाहेर नेण्यात आले.
  • ठाण्यापासून सुमारे ४० किमी पुढे गाडी गेल्यानंतर काहीतरी गडबड आहे, हे कैलास पाटील यांच्या लक्षात आलं.
  • मात्र जसंही आपली दिशाभूल केली गेलीय, असं त्यांना कळालं.
  • त्याच क्षणी त्यांनी मला लघुशंकेला थांबायचं आहे, असं त्यांनी गाडीच्या ड्रायव्हराला सांगितलं.
  • त्यानंतर ते गाडीतून उतरले.
  • अंधाराचा फायदा घेऊन ते तिथून पसार झाले.
  • जीव धोक्यात घालून कैलास पाटील यांनी संबंधित सर्वांनाच गुंगारा देत रात्रीच्या अंधारात गुजरात महाराष्ट्र बॉर्डर जवळीत एका अज्ञात ठिकाणाहून भर पावसात ४ किमी पायी आले.
  • त्यानंतर मिळेल त्या गाडीने त्यांनी मुंबई गाठली.
  • पायी चालत, तसेच त्यानंतर दुचाकीवर एका व्यक्तीकडून त्यांनी लिफ्ट घेतली.
  • आणि नंतर ट्रकने दहिसरला पोहोचले.
  • कैलास पाटील यांनी रातोरात मुंबई गाठली.
  • खुद्द आमदार कैलास पाटील यांनी हा किस्सा शिवसेना नेतृत्वाला सांगितला.

एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांनी संजय राऊतांचा आरोप फेटाळून लावला!

  • सगळेजण आनंदात आहेत, कुणालाही मारहाण, जबरदस्ती करण्यात आलेली नाही.
  • आमदारांच्या मनात अनेक वर्षांपासून खदखद आहे, असं शिंदे यांनी म्हटलं.
  • आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं की, आम्ही सर्वजण सोबत आहोत.
  • आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर नाराजी आहे, असं ते म्हणाले.
  • हे सर्व आमदार आहेत.
  • त्यांना मारुन मुकटून कसं ठेवतील.
  • आमदार छोटा माणूस नसतो की त्याला मारुन बसवू शकू.
  • आम्ही आमच्या मर्जीनं आणि एकदिलानं इथं आहोतं.
  • आमदार नितीन देशमुख यांची तब्येत व्यवस्थित आहे, असंही शिरसाट यांनी सांगितलं.

Tags: Eknath Shindegujratsanjay rautShivsenaShivsena MLAsएकनाथ शिंदेगुजरातशिवसेनाशिवसेना आमदारसंजय राऊत
Previous Post

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी म्हणजे मतदारांशी विश्वासघात! – आप

Next Post

अवयवदानाची लोकचळवळ व्हायला हवी – आरोग्य मंत्री राजेश टोपे

Next Post
Organ DOnation in Ashadhi Wari

अवयवदानाची लोकचळवळ व्हायला हवी - आरोग्य मंत्री राजेश टोपे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!