Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“अन्नदात्याचं ऋण फेडण्यासाठी बंदमध्ये सहभागी व्हा”!

शिवसेनेचं 'सामना'मधून आवाहन

October 11, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
maharashtra band

मुक्तपीठ टीम

लखीमपूरमधील शेतकरी हत्याकांडप्रकरणी ११ ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदचा पुकार केला आहे. यासाठी शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे, असं आवाहन करण्यात आले आहे. तसेच भाजपाच्या एकमेव वरुण गांधी यांनी या लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांड प्रकरणी निषेध केल्याबद्दल त्यांचे सामनातून अभिनंदन करण्यात आले आहेत.

 

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा ‘महाराष्ट्र बंद’

  • आज मध्यरात्रीपासून ‘महाराष्ट्र बंद’ला सुरुवात झाली आहे.
  • देशभरात नवरात्री जागवल्या जात आहेत.
  • कोरोना काळात धार्मिक उत्सव, सण साजरे करण्यावर कठोर निर्बंध सुरू आहेत, पण शेतकऱ्यांवरील अन्यायावर कोणतेच निर्बंध दिसत नाहीत.
  • बेबंद, बेफामपणे शेतकऱ्यांना चिरडणे-भरडणे आणि ठार मारणे सुरूच आहे.
  • हा जुलूम आहे, दडपशाही आहे.
  • लखीमपूर खेरीत मंत्रिपुत्राने चार शेतकऱ्यांना चिरडून मारले.
  • या निर्घृण हत्येचा साधा निषेध केंद्रातल्या मोदी सरकारने केला नाही.
  • उलट शेतकऱ्यांना ठार करणाऱ्या गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न केला.
  • याविरोधात देशभरात संतापाच्या ठिणग्या उडत आहेत.
  • लोकांच्या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’चा पुकार केला आहे.
  • शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससह तमाम विरोधी पक्षांनी आजच्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे.
  • शेतकऱ्यांच्या सांडलेल्या रक्ताला, बलिदानाला मानवंदना देण्यासाठीच या बंदचा पुकारा आहे.
  • त्यामुळे इतर राज्यांनीही या बंदचे अनुकरण केलेच पाहिजे.

 

दोन वर्षापासून तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघर्ष करतोय

  • लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांवरील हल्ला हा देशातील शेतकऱ्यांवरील हल्ला आहे.
  • ‘जय जवान, जय किसान’ हा ज्या देशाचा आत्मा आहे, तो आत्माच नष्ट करण्याचा हा प्रकार आहे.
  • दोन वर्षापासून तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघर्ष करतो आहे.
  • गाझीपूरच्या सीमेवर तो ऊन, वारा, पावसात बसला आहे.
  • या काळात चारशेवर आंदोलक शेतकऱ्यांचे बलिदान झाले.
  • या सगळय़ांवर कडी म्हणजे लखीमपूर खेरीची भयंकर घटना.
  • लखीमपूर खेरी भागाचे खासदार अजय मिश्रा हे आज केंद्रात गृहराज्यमंत्री झाले आहेत.
  • त्यांच्या मतदारसंघात नऊ साखर कारखाने आहेत. त्या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसेच बुडवले तेव्हा गरीब शेतकरी भाजपा खासदारांच्या दारात उभे राहिले.
  • शेतकऱ्यांचे काहीएक ऐकून न घेता उलट शेतकऱ्यांनाच धमकावले गेले.
  • तरीही शेतकरी आंदोलनास उतरला, तेव्हा मंत्रिपुत्राने त्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार केले.

 

भाजपाच्या किती नेत्यांनी लखीमपूर शेतकरी हत्याकांड प्रकरणी घटनेचा धिक्कार केला?

  • उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने विरोधी पक्षांना घटनास्थळी पोहोचू दिले नाही.
  • प्रियंका गांधींना तर अटक केली, अपराधी मंत्रिपुत्रास अटक केलीच नाही.
  • प्रकरण हाताबाहेर गेले तेव्हा शेतकऱ्यांचे खून करणाऱ्या मंत्रिपुत्रास सन्मानाने बोलावून अटक केली.
  • अशी या देशातील कायदा-सुव्यवस्थेची कर्मकहाणी.
  • शेतकऱ्यांचे कोणी ऐकायला तयार नाही.
  • पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा, देशाचे कृषिमंत्री यावर साध्या संवेदना व्यक्त करू शकले नाहीत.
  • कृषिमंत्र्यांनी तरी तत्काळ लखीमपूर खेरीत पोहोचायला हवे होते.
  • ते गेले नाहीच.
  • उलट तेथे जाणाऱ्यांना रोखून ठेवले.
  • भारतीय जनता पक्षाच्या किती नेत्यांनी लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांना चिरडून मारलेल्या घटनेचा धिक्कार केला?
  • भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी हे एकमेव अपवाद.
  • त्यांनी लखीमपूर घटनेचा निषेध केला.
  • शेतकऱ्यांशी असे निर्घृणपणे वागता येणार नाही, असे सांगण्याची हिंमत दाखवली.
  • तेव्हा श्री. गांधी आणि त्यांच्या आई मनेका गांधी या दोघांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळून शिक्षा केली गेली.

 

हिंदू विरुद्ध शीख असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न

  • लखीमपुर खेरीमध्ये हिंसाचार घडल्यानंतर हिंदू विरुद्ध शीख असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, असाही आरोप वरुण गांधी यांनी आता केला आहे.
  • तसे असेल तर ते गंभीर आहे.
  • हिंदू आणि शीख एकच आहेत.
  • त्यांच्यात फूट पाडण्याचा आणि देशाच्या धार्मिक-राष्ट्रीय सलोख्याला चूड लावण्याचा प्रयत्न देशाला आता परवडणारा नाही.
  • श्री. वरुण गांधी हेसुद्धा इंदिरा गांधींचे नातू व संजय गांधींचे पुत्र आहेत.
  • लखीमपुर खेरीचा भयंकर प्रकार पाहून त्यांचे रक्त तापले व त्यांनी मत व्यक्त केले, पण इतर खासदारांच्या रक्तात बर्फाचे थंड पाणी सळसळत आहे काय?
  • शेतकऱ्यांच्या हत्या, त्यांच्या रक्ताचे पाट पाहून सत्ताधारी मंडळींचे रक्त थंडच पडले असेल तर देशाला वाचविण्यासाठी नवे स्वातंत्र्य आंदोलन उभारावे लागेल.
  • वरुण गांधी यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वच शेतकरी संघटनांनी केला पाहिजे.
  • एक मर्द निपजला व त्याने शेतकऱ्यांच्या अन्यायाचा निषेध केला आणि त्याची राजकीय किंमत चुकवावी लागली तरी पर्वा केली नाही.
    त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाची बाजू उघडपणे घेतली.
  • शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली, यात त्यांचे काय चुकले?
  • वरुण गांधी हे धाडसाने बोलले.
  • इतरांची मने या प्रश्नी निदान आतल्या आत खदखदत असतील.

 

प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे!

  • लखीमपूरमधील शेतकरी हत्याकांडाबाबत जे असंख्य लोक वरुण गांधी यांच्याप्रमाणे आपल्या भावना बिनधास्तपणे व्यक्त करू शकले नाहीत, अशा सगळय़ांसाठी हा आजचा ‘महाराष्ट्र बंद’ आहे.
  • शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्र राज्य ठामपणे उभे आहे.
  • बांधावर जाऊन शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवायचा, पण चार शेतकऱ्यांना भाजपच्याच मंत्रिपुत्राने चिरडून मारले त्या कृत्याचा साधा निषेधही करायचा नाही, अशी राज्याच्या विरोधी पक्षाच्या वागण्याची तऱ्हा आहे.
  • सरकारविरोधी आवाज उठवणाऱ्या, न्यायासाठी झगडणाऱ्या, देशासाठी बलिदान देणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा ‘महाराष्ट्र बंद’ आहे.
  • राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे!

Tags: lakhimpurMaharashtra bandMVAVarun Gandhiमहाराष्ट्र बंदमहाविकास आघाडीलखीमपूर शेतकरी हत्याकांडवरुण गांधी
Previous Post

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात २५५ जागांसाठी भरती

Next Post

कोळसा टंचाईचा फटका महाराष्ट्रालाही…मुंबईला मात्र दिलासा!

Next Post
coal shortage

कोळसा टंचाईचा फटका महाराष्ट्रालाही...मुंबईला मात्र दिलासा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!