Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संसदेत कृषी कायदे मागे घेतल्यानंतरच शेतकरी आंदोलनावर निर्णय! राहुल गांधी, ममता बॅनर्जी, केजरीवाल, अमरिंदर…प्रतिक्रियांचा पूर!

November 19, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
farmest law

मुक्तपीठ टीम

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तीन नवे कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. काही शेतकरी संघटनांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे, मात्र शेतकरी आंदोलन तात्काळ मागे घेणार नाहीत, संसदेत तसा निर्णय झाल्यानंतरच पुढचे पाऊल उचलतील. केंद्र सरकारच्या या निर्णयावर राजकीय पक्षांचे नेते आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

शेतकरी आंदोलन लगेच परतणार नाही – टिकैत

  • शेतकरी आंदोलन तात्काळ मागे घेणार नाही, संसदेत कृषीविषयक कायदे रद्द होतील त्या दिवसाची वाट पाहू. एमएसपीसोबतच शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नांवरही सरकारने चर्चा करावी.
  • काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. राहुल गांधी यांनी ट्विट केले की, “देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अहंकाराचे मस्तक झुकवले. अन्यायाविरुद्धच्या या विजयाबद्दल अभिनंदन!”
  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, कृषी कायद्याला इतके दिवस विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा हा विजय आहे. आंदोलनात ७००हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू, शेतकऱ्यांच्या त्रासाची जबाबदारी कोण घेणार? याला केंद्र जबाबदार आहे. हे मुद्दे आम्ही संसदेत मांडणार आहोत.

 

प्रत्येक शेतकऱ्याचे हार्दिक अभिनंदन – ममता बॅनर्जी

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सरकारच्या या निर्णयावर ट्विट केले आहे. ममता बॅनर्जी यांनी ट्विट केले की, “हा शेतकऱ्यांचा विजय आहे. या लढ्यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे अभिनंदन. प्रत्येक शेतकऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.”

 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आनंद व्यक्त केला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून लिहिले, “आज प्रकाश दिवसाच्या दिवशी, किती छान बातमी आहे. तिन्ही कायदे रद्द करण्यात आले. ७०० हून अधिक शेतकरी शहीद झाले. त्यांचे हौतात्म्य अमर राहील. या देशातील शेतकर्‍यांनी जीव धोक्यात घालून शेतकर्‍यांना कसे वाचवले होते ते येणार्‍या पिढ्या लक्षात ठेवतील. माझ्या देशातील शेतकऱ्यांना माझा सलाम. केंद्र सरकारला तीन काळे कायदे मागे घेण्यास भाग पाडल्याबद्दल देशातील शेतकऱ्यांचे अभिनंदन. अन्यायाविरुद्धचा हा लोकशाहीचा विजय आहे, शेतकऱ्यांचाच नाही.”

 

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट केले की, “गुरु नानक जयंतीच्या पवित्र प्रसंगी, प्रत्येक पंजाबींच्या मागण्या मान्य केल्याबद्दल आणि कृषीविषयक तीन कायदे रद्द केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार. केंद्र सरकार यापुढेही शेतीच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करत राहील, असा मला विश्वास असल्याचेही ते म्हणाले.”

 

त्याचवेळी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिद्धू यांनी हा शेतकरी संघटनांचा विजय असल्याचे म्हटले असले तरी आजही ते पंजाब सरकारला सल्ला द्यायला चुकले नाहीत. काळे कायदे रद्द करणे हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल असल्याचे सिद्धू यांनी ट्विट केले आहे. किसान मोर्चाच्या सत्याग्रहाला ऐतिहासिक यश मिळाले आहे. त्यांच्या त्यागामुळे लाभ मिळाला आहे. रोड मॅपद्वारे पंजाबमधील शेतीचे पुनरुज्जीवन करणे ही पंजाब सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे.

 

काँग्रेसचे महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली की, पंतप्रधानांनी वादग्रस्त कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याचं आम्ही स्वागत करतो. पण उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या निवडणुका पाहून तर ही खेळी केली नाही ना? आज कायदे मागे घेतले उद्या सत्तेत आल्यावर पुन्हा हे कायदे आणले तर जाणार नाही ना? केवळ निवडणुकीत फायदा मिळवण्यासाठीचा हा फंडा तर नाही ना? असे सवाल करतानाच निवडणुकी आधी महागाई कमी करायची, काही निर्णय घ्यायचे आणि सत्तेत आल्यावर पुन्हा तेच निर्णय राबवायचे ही मोदी सरकारची खेळी राहिली आहे, त्यामुळे आमचा भाजपवर विश्वास नाही, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.


Tags: Bangal CM Mamata BanerjeeChief Minister Capt. Amarinder SinghCongress leader Rahul GandhiFarmers ActMaharashtra Congress Minister Vijay VadettiwarmuktpeethPM Narendra modiPunjab Congress President Navjyot Sidhurakesh tikaitThree agricultural lawsकाँग्रेस नेते राहुल गांधीतीन कृषी कायदापंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिद्धूपंतप्रधान नरेंद्र मोदीबंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जीमहाराष्ट्र काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवारमुक्तपीठमुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंगराकेश टिकैतशेतकरी आंदोलनशेतकरी कायदा
Previous Post

“फेडरेशन ऑफ ऑर्गन ॲन्डबॉडी डोनेशन”च्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड

Next Post

मुंबईतील ईर्ला भागातील मोठ्या मॉलला आग, काचा फोडून अग्निशमन दलाची आगीशी झुंज!

Next Post
primee mall

मुंबईतील ईर्ला भागातील मोठ्या मॉलला आग, काचा फोडून अग्निशमन दलाची आगीशी झुंज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!