Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

सरकारी मुहूर्त काहीही असू द्या, कारखाने सुरु होणार ‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदेनंतरच! राजू शेट्टी

September 30, 2021
in featured, सरकारी बातम्या
0
raju shetty

मुक्तपीठ टीम

मंत्री समितीने १५ ऑक्टोंबर पासून कारखाने सुरु करण्याचे आदेश दिले असले तरी पश्चिम महाराष्ट्रात मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची साखर परिषद झाल्याशिवाय ऊसाचे गाळप सुरु होत नाही असं शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारला सुनावलं आहे. स्वाभिमानी शेतरकरी संघटना दरवर्षी ऊस परिषद आयोजित करते. ऊस उत्पादक शेतकरी आणि इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ही परिषद घेतली जाते. यंदा ही परिषद १९ ऑक्टोबरला जयसिंगपूर येथे होणार आहे. याचा अर्थ बहुसंख्य साखर कारखाने १९ ऑक्टोबरनंतरच सुरु होतील.

 

ऊस परिषदेत ऊस उत्पादक शेतकरी आणि पूरग्र्स्तांचे मुद्दे

  • स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद ही जयसिंगपूर येथे पार पडणार आहे.
  • १९ ऑक्टोंबरला या परिषदेला सुरवात होणार आहे.
  • यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तर प्रश्न असणार आहेतच शिवाय पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही वेळेत मदत देण्याची मागणी करण्यात येणार आहे.
  • सरकारने त्वरीत मदत नाही केली तर एकाही मंत्र्याची दिवाळी गोड होऊ देणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

 

राजू शेट्टींचा इशारा…अन्यथा आंदोलन!

  • स्वाभिमानीच्या ऊस परिषदेमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर इतर शेतकऱ्यांच्या प्रश्नाही हाताळले जाणार आहेत.
  • सध्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
  • त्यामुळे दिवाळीपूर्वीच सरकारने मदत करणे आवश्यक आहे.
  • साखर कारखानदारांना यंदा चांगले दिवस आहेत. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांची थकीत एफआरपी रक्कम देणे आवश्यक आहे.
  • अन्यथा आंदोलन उभे केले जाणार.

 

आराधना शक्तिस्थळांची’ हे आंदोलन उभे केले जाणार

  • एफआरपीची रक्कम ही शेतकऱ्यांना एकदम मिळणे आवश्यक आहे. तसा नियमही आहे.
  • मात्र, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि कारखानदार मिळून शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा देण्याचे धोरण ठरवतात हे चुकीचे आहे.
  • यांच्यातील वाटाघाटीमध्ये शेतकऱ्यांचे मात्र, आर्थिक नुकसान होत आहे.
  • १४ दिवसांच्या आतमध्ये एफआरपी रक्कम देणे बंधनकारक असताना कारखाने वर्षानुवर्षे शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा वापरत आहे.
  • एफआरपी रक्कम ही एकरकमी देणे हा नियम आहे.
  • या रकमेतील तुकडे केले तर नवरात्रीपासून ‘जागर एफआरपीचा, आराधना शक्तिस्थळांची’ हे आंदोलन उभे केले जाणार आहे.
  • राज्यातील विविध ठिकाणची शक्ति स्थळांची आराधना करुन दसऱ्याला जेजुरी येथे मेळाव्याद्वारे आंदोलनाची सांगता होणार आहे.

Tags: raju shettysugar cane conferenceswabhimani shetkari sanghadnaराजू शेट्टीसाखर परिषदस्वाभिमानी शेतकरी संघटना
Previous Post

“पंचनामे होत राहतील…आधी मदत द्या! ओला दुष्काळ जाहीर करा!”: राज ठाकरे

Next Post

अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी 9 व 10 ऑक्टोबरला परीक्षा

Next Post
Uday samant

अतिवृष्टीमुळे सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी 9 व 10 ऑक्टोबरला परीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!