Wednesday, June 4, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जनतेचा लॉकडाऊनला विरोधच, विप नेते प्रवीण दरेकरांचा दावा

April 3, 2021
in घडलं-बिघडलं
0
pravin darekar

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्र्यांनी वाढत्या करोनाच्या बाबतीत ठोस उपाययोजना सांगण्याऐवजी पुन्हा एकदा ‘प्रबोधनात्मक’ संवाद साधला. एका बाजूला इतर राज्याचं मला सांगू नका असं बोलत असताना जगभराची आकडेवारी देण्यामागील त्यांचं प्रयोजन कळलं नाही. आरोग्य सुविधा वाढवल्या असं मुख्यमंत्री सांगत असतील तर मग अनेक ठिकाणी रुग्णांना बेड्स का मिळत नाहीत, व्हेंटिलेटर्स, औषधं का मिळत नाहीत, कोरोना रुग्णाला ऑक्सिजन सिलिंडर घेऊन रुग्णालयाबाहेर का उभं राहावं लागतं व त्यात त्याचा मृत्यू का होतो, याच उत्तर दुर्दैवाने या संवादातून मिळालं नाही. मुख्यमंत्री जनतेलाच प्रश्न विचारतात की डॉक्टर कुठून आणणार, नर्सेस कुठून आणणार. परंतु जे कार्यरत आहेत त्यांची काळजी सरकारकडून घेतली जात नाही, त्यांचे पगार वेळेत दिले जात नाहीत. मुख्यमंत्री यांनी निर्णय घ्यायचे असतात, पण तेच रुग्णवाढ कशी थांबवायची, असा प्रश्न जनतेला विचारत आहेत. अशा प्रकारे ही सर्व वक्तव्य हताशपणाची वाटली. नियोजन, समन्वय आणि नियंत्रण करण्याचे काम मुख्यमंत्र्यांचे असते. त्या ऐवजी त्यांनी माहिती सादर करण्याचे काम केले आहे. या संवादातुन त्यांनी कुठल्याही उपाययोजना सांगितल्या नाहीत किंवा कोणतेही ठोस निर्णयही जाहीर केले नाहीत. वाढत्या रूग्ण संख्येबाबत मुख्यमंत्र्यांनी कृती केली पाहिजे, अशी खोचक टिका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या संवादाबाबत त्यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली होती, त्यात ते बोलत होते.

 

काल मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधकांवर राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. त्याबाबत दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्री स्वत:च शेरेबाजी करून विरोधकांवर टीका करत होते. हे राजकारण नाही का? कोरोना येऊन सव्वा वर्ष झाले, या सव्वा वर्षात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांबरोबर केवळ एकदाच संवाद साधला. हा एक अपवाद सोडला तर मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत विरोधकांशी कधीही चर्चा केली नाही.

 

लॉकडाऊन संदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की, कालच्या संवादात मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत जनतेचा अंदाज घेताना दिसले. पण महाराष्ट्रातील जनतेचा लॉकडाऊनला विरोध आहे. लॉकडाऊन काळात लोकांना काय मदत करणार हे मुख्यमंत्र्यांनी सांगितले नाही. राज्यातील आरोग्य यंत्रणा फोल ठरली आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी असं मुख्यमंत्री म्हणत आहेत. पण त्यांच्या कुटुंबालाही ते सुरक्षित ठेवू शकले नाहीत. कारण सरकार संभ्रमावस्थेत आहे, असे दरेकर यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्रांनी जनतेसाठी रस्त्यावर उतरण्याचा सल्ला विरोधकांना दिला होता, त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी आमची काळजी करू नये. आम्ही रस्त्यावर उतरूच. पण तुम्ही मातोश्रीत बसून होतात त्याकाळातही आम्ही रस्त्यावर उतरून काम करत होतो, आजही करीत आहोत आणि पुढेही करणार आहोत. परंतु, भरमसाठ रुग्णवाढ होत असताना, मृत्यू होत असताना, नियोजनाचा अभाव असताना विरोधी पक्षाने बोलायचे नाही, अशी अपेक्षा असेल तर ते होणार नाही. कारण, जबाबदारी जर सरकारकडून पार पाडली जात नसेल तर विरोधी पक्षाची जबाबदारी आम्ही पार पाडत राहू.

 

काल मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्याचे कौतुक करून केंद्रावर टीका केली होती. त्याबाबत विचारले असता दरेकर म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी केद्राकडे बोट दाखवणे योग्य नाही. कारण, पंतप्रधान मोदींनी देशात लॉकडाऊन केल्यानंतर प्रत्येक घटकातील नागरिकांची काळजी घेतली होती, त्यांच्यासाठी काही न काही उपाययोजना केल्या होत्या. केंद्र सरकारने वीस लाख कोटींचं पॅकेज दिल होतं. मात्र महाराष्ट्र सरकारने एक पैसा नागरिकांना दिलेला नाही. राज्य सरकार म्हणुन आलेलं अपयश लपवण्यासाठी केंद्रावर टीका करून दूर पळण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्य सरकरकडून केला जात आहे.


Tags: chief minister uddhav thackeraylockdownजितेंद्र आव्हाडमुख्यमंत्री उद्धव ठाकरेविरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्व व विचारांना आदर्श मानूनच कोरोनाविरुद्धच्या लढाईत कर्तव्ये पार पाडणार

Next Post

साखर कारखान्यांवर वाढत आहे शेतकऱ्यांच्या थकबाकीचे ओझे

Next Post
sugar

साखर कारखान्यांवर वाढत आहे शेतकऱ्यांच्या थकबाकीचे ओझे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!