Friday, May 16, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

राज्यातील उद्योजकांच्या मनातील शंकांचे निरसन करा

भाजपा प्रदेश उद्योग व आयटी आघाडीची मागणी

April 6, 2021
in घडलं-बिघडलं
0
subhash desai, bjp

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा सर्व्हर हॅक झाल्यामुळे उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री, उद्योग मंत्र्यांनी उद्योजकांना आश्वस्त करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश उद्योग आघाडी प्रमुख प्रदीप पेशकार व आयटी सेल प्रमुख सतीश निकम यांनी केली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यावेळी उपस्थित होते.

निकम म्हणाले की, सर्व्हर हॅक होण्याची घटना २१ मार्च रोजी पहाटे अडीच वाजता घडली. मात्र या बाबतची तक्रार १ एप्रिल २०२१ रोजी सायबर सेलकडे नोंदविण्यात आली . एफआयआर नोंदविण्यात १० दिवस उशीर का झाला ? एमआयडीसी या कडून हॅकर्सशी बोलणी चालू होती , असे सांगण्यात आले. या वाटाघाटीत भाग घेण्यासाठी कोणाला अधिकृतपणे सांगण्यात आले होते, याचा खुलासा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून झाला पाहिजे. भारताची ओळख जगातील आयटी महासत्ता असल्याचे मानले जाते.आमच्याकडे आयटी उद्योगातील सर्व प्रकारचे तज्ज्ञ आहेत.आज आम्ही तंत्रज्ञानामध्ये जगाला मार्गदर्शन करीत आहोत.हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमआयडीसीने या तज्ज्ञांची मदत का घेतली नाही , याचाही सरकारने खुलासा करावा. या प्रक्रियेत केंद्र सरकारच्या सायबर सुरक्षा एजन्सींचा सहभाग का नव्हता याबद्दलही राज्य सरकारने स्पष्टीकरण द्यावे.

एमआयडीसीकडे प्रत्येक उद्योगाचा तपशील, व्यवसाय योजना, वित्तीय, बँक तपशील, इमारतीच्या योजना वगैरे बारीकसारीक माहिती असते. ही माहिती हॅकर्स च्या हातात लागली आहे का या शंकेने उद्योग जगतात कमालीची अस्वस्थता आहे. एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी अंबालागान यांनी आपल्या निवेदनात डेटा परत मिळाल्याचे नमूद केले आहे.पण एनक्रिप्टेड डेटाचे काय? आम्ही व आमचे व्यवसाय सुरक्षित आहेत ना अशी शंका उद्योजकांच्या मनात आहे , याचे निरसन करण्यासाठी सरकारकडून अद्याप काहीच पावले टाकण्यात आलेली नाहीत, असे पेशकार यांनी सांगितले. गेल्या सहा महिन्यात सिस्टम हॅक होण्याची ही दुसरी घटना आहे. अशा घटनांमुळे महाराष्ट्रात येण्यास उद्योजक तयार होणार नाहीत , असेही निकम व पेशकार यांनी निदर्शनास आणून दिले.


Tags: BJPchief minister uddhav thackerayउद्योग मंत्रीउद्योग मंत्री सुभाष देसाईमुख्यमंत्री
Previous Post

गुन्हेगारी महत्वाचे : 1) प्रसिद्ध टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्ये अभिनेता म्हणून दिसणार्‍या मिराजला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या अभिनेत्याला चेन स्नॅचिंगच्या प्रकरणात पोलिसांनी पकडले आहे. खरंतर क्रिकेट सट्टेबाजीच्या वाईट व्यसनामुळे हा अभिनेता कर्जात बुडाला आणि मग कर्ज फेडण्यासाठी गुन्हेगारी दुनियेचा मार्ग अवलंबला. 2)उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. चहा नाही तयार केला म्हणून पतीने पत्नीला तलाक दिला आहे.महिलेच्या तक्रारीकडे पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे. पीडितेने कोर्टात अर्ज दाखल करून न्याय देण्याची विनंती केली आहे. 3)अमेरिकेत मिसौरी भारतीय अभियंत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळचा रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय शरीफ रहमान खान असे या तरुणाचे नाव आहे. मैत्रिणीशी असलेल्या एकतर्फी प्रेमामुळे शरीफची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 4) ऑनलाईन लुडो या खेळात वारंवार पराभव होत असल्याने रागाच्या भरात तरुणाने मित्राचीच हत्या केली. मुंबईतील मालाड परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. ही बाब उघडकीस नये म्हणून या मित्रानेच १० हजार रुपये देऊन बोरिवलीतील एका हॉस्पिटलमधून बनवट मृत्यूचा दाखला बनवून घेतला. मयत तरुणाच्या कुटुंबाला नैसर्गिक मृत्यू असल्याचं भासवून अंत्यसंस्कारही करण्यात आले.

Next Post

आंध्रच्या शेतकरी कुटुंबातून देशाचे सरन्यायाधीश…एन. व्ही. रमणांचा प्रवास!

Next Post
n v ramana

आंध्रच्या शेतकरी कुटुंबातून देशाचे सरन्यायाधीश...एन. व्ही. रमणांचा प्रवास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!