Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

राज ठाकरेंनी मागणी केलेल्या लोकसंख्या नियंत्रण कायद्याची आता देशभर का होऊ लागली चर्चा?

लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर मोदी सरकारची काय आहे अधिकृत भूमिका?

June 2, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Pralhad Singh Patel

मुक्तपीठ टीम

गेल्या काही दिवसांपासून लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारला लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याचे आवाहन केले होते. आता त्याच मुद्द्यावर देशात चर्चा सुरु झाली आहे. मोदी सरकार देशात लोकसंख्या नियंत्रण कायदा आणू शकते, असं मत केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी मांडलं आहे. त्यामुळे संसदेत संबंधित मंत्र्यांनी तशा कायद्याची आवश्यकता नाही, असं मत मांडलं असूनही पुन्हा लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर चर्चा सुरु झाली आहे.

लोकसंख्या नियंत्रणासाठी लवकरच कायदा आणणार!

  • २०२१ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या सुमारे १ अब्ज ३४ कोटी आहे आणि येत्या २०२७ पर्यंत भारत चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होणार, असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केला आहे.
  • यामुळे आता लोकसंख्या हे भारतासमोर खुप मोठे आव्हान आहे.
  • त्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असून लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आवश्यक असल्याचं मत सातत्यानं मांडलं जातं.
  • मात्र, याविषयी बोलताना केंद्रीय मंत्र्यांनी नकारात्मक मत मांडलं होतं.
  • दुसरे केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी मात्र, मजबुतीनं निर्णय घेणारं मोदी सरकारच असा कायदा करू शकते, असा दावा केला.
    त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

मोदी सरकारने संसदेत काय मांडली होती भूमिका?

  • लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत देशात यापूर्वीही वाद झाले आहेत.
  • २०१९च्या जुलैमध्ये, भाजप खासदार राकेश सिन्हा यांनी लोकसंख्या नियंत्रणाशी संबंधित खाजगी सदस्य विधेयक राज्यसभेत मांडले.
  • या विधेयकात दोन अपत्यांचा नियम लागू करण्याची आणि उल्लंघन केल्यास दंडात्मक तरतूद करण्याची मागणी करण्यात आली होती.
  • यावर २ एप्रिल २०२२ रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत या विधेयकाची गरज नसल्याचे सांगितले होते.
  • विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना ते म्हणाले होते की, लोकांवर दबाव टाकण्याऐवजी सरकार त्यांना लोकसंख्या नियंत्रणाबाबत यशस्वीपणे जागरूक करत आहे.
  • यासोबतच यासाठी आरोग्य अभियानही राबवले जात आहे.
  • त्यामुळे भाजपा खासदाराने मांडलेले लोकसंख्या नियंत्रणासाठीचे खासगी विधेयक रद्द झाले होते.

देशभरात एकूण प्रजनन दर कमी होतोय!

  • नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे रिपोर्टनुसार, देशभरात एकूण प्रजनन दर कमी होत आहे.
  • ही परिस्थिती भारतातील अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
  • म्हणजे एकूण लोकसंख्या स्थिर झाली आहे.
  • त्याच वेळी, बिहार, उत्तर प्रदेश सारख्या काही राज्यांमध्ये, एकूण प्रजनन दर २.१ पेक्षा जास्त आहे परंतु, येत्या काही दिवसांत एकूण प्रजनन दर २.१ पर्यंत पोहोचू शकतो.

लोकसंख्या नियंत्रणाबाबत संविधानात काय?

  • केंद्र आणि राज्यांना लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदे करण्याची मुभा संविधानाने दिली आहे.
  • काही राज्यांमध्ये लोकसंख्या नियंत्रणाबाबत कायदेही करण्यात आले आहेत.
  • ज्या राज्यांमध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करण्यात आला आहे, त्या राज्यांमध्ये असुरक्षित गर्भपात वाढल्याचे दिसून आले आहे.
  • त्याचबरोबर सरकारी सेवा मिळविण्यासाठी लोकांनी पत्नीला घटस्फोट दिला आहे.
  • मात्र, अद्याप कोणत्याही सरकारने याबाबतचा अहवाल जाहीर केलेला नाही.

Tags: IndiaPopulation Control LawPrahlad Singh PatelRaj Thackerayराज ठाकरेलोकसंख्या नियंत्रण कायदा
Previous Post

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: टीव्ही 9 मराठीचं क्रमांक एकचं स्थान धोक्यात? झी २४ तास अवघ्या ०.५ ने मागे!

Next Post

स्वस्त धान्य दुकानात स्वस्त धान्याव्यतिरिक्त अन्य वस्तूही विकण्यास परवानगी

Next Post
Permission to sell cheaper food in grocery stores

स्वस्त धान्य दुकानात स्वस्त धान्याव्यतिरिक्त अन्य वस्तूही विकण्यास परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!