Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

“बिहारमध्ये त्वरित मंजुरी, महाराष्ट्रात आमदार नियुक्तीचा प्रस्ताव सहा महिने राज्यपालांच्या ड्रॉवरमध्येच!”

उच्च न्यायालयानं राज्यपालांना विचारणा केल्यानंतर १२ आमदारांच्या नियुक्त्यांवर राजकारण जोरात!

May 22, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
bhagatsingh koshyari

मुक्तपीठ टीम

आघाडी सरकारने गेले सहा महिने राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रस्ताव राजभवनातच अडकला आहे. बिहारसारख्या राज्यात राज्यपाल दोन दिवसात आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव मंजूर करत असताना महाराष्ट्रात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मात्र तसाच प्रस्ताव रखडवून ठेवला जात आहे. त्यामुळे नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते रतनसोली लुथ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने “त्या १२ आमदारांच्या नावांवर कधी निर्णय घेणार आणि अद्याप निर्णय का घेतला नाही हे स्पष्ट करा”, अशी स्पष्ट विचारणा राज्यपालांकडे केली आहे. त्यामुळे त्या मुद्द्यावर पुन्हा राजकारण तापू लागलं आहे. याचिकाकर्त्यांने बिहारमधील राज्यपाल नितीशकुमार सरकारचा १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रस्ताव त्वरित मंजूर करतात, मग महाराष्ट्रातच का मंजूर होत नाही, असा सवाल केला आहे.

 

राज्य मंत्रिमंडळाने ६ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यपालांकडे १२ आमदारांची नावे पाठवली आहेत, त्यामुळे यावर राज्यापालांनी हो किंवा नाही असा निर्णय घेतला पाहिले. ते शिफारस पत्र नुकते ड्रॉवरमध्ये ठेवून बसू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान आपले निरीक्षण नोंदविले आहे. तसेच न्यायालयाने राज्यपालांनी निर्णय का घेतला नाही याची कारणे प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 

राज्य सरकारबरोबरच्या संघर्षामुळे अडकल्या आमदारांच्या नियुक्ती

• सामाजिक कार्यकर्ते रतनसोली लुथ यांनी यासंबंधी याचिका दाखल केली होती.
• या याचिकेवर न्यायमूर्ती काठावाला आणि न्यायमूर्ती तावडे यांच्या खंडपीठांपुढे सुनावणी सुरु आहे.
• रतनसोली लथु यांच्या याचिकेवर अड. गौरव श्रीवास्तव यांनी बाजू मांडताना युक्तिवाद केला की, राज्य सरकारबरोबरच्या संघर्षामुळेच राज्यपालांनी १२ आमदारांच्या शिफराशीवर अद्याप कोणताच निर्णय घेतला नाही.
• महाराष्ट्र सरकारच्या बाजूने गीता शास्त्री यांनी बाजू मांडली. सुनावणी दरम्यान युक्तीवादा दरम्यान, गीता शास्त्री म्हटल्या की, राज्यपालांनी निर्देश द्यायचे असतील तर त्यांच्या सचिवांनाही प्रतिवादी बनवले पाहिले.
• यावर न्यायालयाने स्पष्टीकरण मागवले असून याचिकेत दुरुस्तीसाठीही मंजुरी दिली आहे.
• कोरोना संकटात गरजूंना मदतीसाठी लोकप्रतिनिधींची मदत होत आहे. राज्यपालांनी १२ आमदारांची नियुक्ती केली नसल्यामुळे लोकांचे नुकसान होत आहे, त्यामुळे आपण याचिका केली, असे रतनसोली लुथ यांनी सांगितले आहे.

 

कार्यकर्ते असून त्यांचा राज्यपाल राज्यपालांनी आमदारांची नियुक्ती न करणे हा घटनेचा भंग – संजय राऊत

• शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे.
• उच्च न्यायालायने विचारलेला प्रश्न आम्हीही विचारत आहोत.
• राज्यपालांनी १२ सदस्यांनी नियुक्ती न करणे हे घटनेचा भंग केल्यासारखे आहे.
• त्यांना घटनेने आमदार नियुक्तीचा अधिकार दिला आहे.
• पण एक वर्ष झाला तरी मंत्रिमंडळाच्या शिफारस पत्राकडे पाहण्यास राज्यपालांना वेळ नाही आहे.
• शिफारस करण्यात आलेले बाराजण साहित्यिक, कलाकार, समाजिक अपमान करत आहात.

 

राज्यपालांनी चुकीचे काही केले नाही – आशिष शेलार

• न्यायालयीन प्रकरणावर काही बोलणार नाही.
• पण, मला जो कायदा माहित आहे त्यानुसार राज्यपालांनी किती दिवसात मंत्रिमंडळ शिफारसींवर निर्णय घ्यायचा असे काही बंधन नाही.
• राज्यपाल विचार करुन निर्णय घेतील.


Tags: bhagat singh kosharibjp ashish shelarMaharashtrasanjay rautरतनसोली लुथसंजय राऊत
Previous Post

लसीकरणाची जाहिरातबाजी जोरात, लसीकरणाचा वेग मात्र झाला निम्मा!

Next Post

“बार्जच्या बेपत्ता कॅप्टनला दोष! राज्य सरकार शापुरजी पालनजींच्या अॅफकॉनला का वाचवते आहे?”

Next Post
cyclone

“बार्जच्या बेपत्ता कॅप्टनला दोष! राज्य सरकार शापुरजी पालनजींच्या अॅफकॉनला का वाचवते आहे?”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!