Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

देश प्लास्टिक कचरा मुक्त करण्यासाठी युवा मोहीम, ६० लाख टन कचरा जमवला!

October 21, 2021
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Nehru Youth Center Organization

मुक्तपीठ टीम

जग जेवढं पुढारतं तेवढाच कचराही वाढताना दिसतो. मग एखादा देश असो किंवा वस्ती. त्यातही सध्या तर प्लास्टिकचा एक मोठा भस्मासूर पर्यावरणाचा गळा घोटताना दिसतोय. त्यामुळे प्लास्टिक कचरा हटवण्यासाठी नुकतीच एक खास मोहीम राबवण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय तसेच नेहरू युवा केंद्र संघटनेतर्फे देशव्यापी स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाचा भाग म्हणून मुंबईत वांद्रे परिसरातील मुंबई मनपाच्या बगीचा परिसरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेचं लक्ष्य ७५ लाख टन प्लास्टिक कचरा जमवण्याचं आहे, त्यापैकी आतापर्यंत ६० लाख टन प्लास्टिक कचरा जमवल्याचा दावा यांनी केला.

 

या स्वच्छता अभियानात केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव उषा शर्मा, मनपा अधिकारी सुभाष दळवी खास उपस्थित होते. तसेच केंद्रीय राखीव पोलीस दल व राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक तसेच मुंबईतील १५ महाविद्यालयांतील विद्यार्थी स्वयंसेवक सहभागी झाले होते. मुंबईतील २५० स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियानात भाग घेतला.

 

केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या सचिव उषा शर्मा यांनी उपस्थितांना स्वच्छता शपथ देऊन आजच्या कार्यक्रमाची सुरुवात केली.

 

“या अभियानाद्वारे ७५ लाख किलो कचरा, विशेषतः प्लॅस्टिक कचरा संकलित करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य आम्ही निश्चित केले आहे. आणि १८ ऑक्टोबरपर्यंत ६० लाख किलो प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला आहे. असून त्याचे निर्मूलन देखील करण्यात आले आहे हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे,” अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिली.“

 

आजच्या सुटीच्या दिवशी देखील आवडीने या अभियानात भाग घेणाऱ्या स्वयंसेवकांचे प्रयत्न आणि त्यांची उर्जा यांचे कौतुक करत उषा शर्मा म्हणाल्या, “कोणत्याही अभियानाने लोकचळवळीचे रूप घेतल्यानंतरच ते अभियान यशस्वी होते आणि तेच मुंबईत घडताना मला दिसत आहे.” स्वच्छता अभियान हे केवळ एखाद्या परिसराची स्वच्छता करण्याविषयी नसून आपले पर्यावरण स्वच्छ ठेवण्याबाबत नागरिकांमध्ये जाणीव निर्माण करण्याबाबतचे अभियान आहे हे देखील त्यांनी आवर्जून सांगितले.

 

प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठीच्या सोप्या उपाययोजनांबद्दल बोलताना बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे स्वच्छता अभियान राबविण्याच्या विशेष कर्तव्यावर असलेले अधिकारी सुभाष दळवी यांनी सुचविले की प्रत्येकाने स्वतःजवळ पुनर्वापर करता येण्याजोगी कापडी पिशवी बाळगली तर एकदा वापरून फेकून देण्याच्या प्रकारातील प्लॅस्टिकच्या पिशव्यांवरील आपले अवलंबित्व पूर्ण नाहीसे होईल. आपले शहर आणि निवासी परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वसामान्यांच्या सहभागाच्या आवश्यकतेवर देखील त्यांनी भर दिला. “मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतील सुमारे 30,000 सफाई कर्मचारी मुंबई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत. जर मुंबईतील लोकांनी स्वच्छता राखण्यासाठी सक्रीय पाठींबा दिला तर आपण मुंबईला स्वच्छतेचा स्वर्ग बनवू शकू,” असे दळवी यांनी सांगितले.

 

नेहरू युवा केंद्र संघटनेने कचरा निर्मूलन आणि स्वच्छता यासाठी विशेषतः एकदा वापरून फेकून देण्याच्या प्रकारातील प्लॅस्टिकचे संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी 1 ते 31 ऑक्टोबर 2021 या कालावधीत हा देशव्यापी स्वच्छ भारत अभियान कार्यक्रम आयोजित केला आहे. एक महिना कालावधीचा हा कार्यक्रम म्हणजे केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने कचरा संकलन तसेच निर्मूलन, मुख्यतः प्लॅस्टिक कचरा निर्मूलन करण्याच्या उद्देशाने 1 ऑक्टोबर 2021 रोजी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग आहे. अशाच प्रकारचे अभियान काल मुंबईत गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात राबविण्यात आले.

 

या अभियानात 50 हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त साजऱ्या होत असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त हे अभियान हाती घेण्यात आले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये स्वच्छता अभियानाची सुरुवात केली आणि तेव्हापासून, या संदर्भात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. स्वच्छ भारत कार्यक्रम म्हणजे पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या उपक्रमाचा नवे लक्ष्य आणि कटिबद्धतेसह पुढे करण्यात आलेला विस्तार आहे. देशातील युवा वर्ग आणि नागरिकांचे एकत्रित प्रयत्न तसेच सर्व भागधारकांकडून मिळालेला पाठींबा यांच्या बळावर आपल्या नागरिकांचे जगणे अधिक उत्तम स्वरूपाचे करता येऊ शकते. या अभियानाच्या पहिल्या 10 दिवसांमध्येच स्वच्छ भारत कार्यक्रमांच्या आयोजनातून देशभरात 30 लाख किलो कचरा संकलित करण्यात आला हे लक्षात घेण्यासारखे आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: cleanliness drivemuktpeethmumbaiNehru Youth Center Organizationplastic free indiaनेहरू युवा केंद्र संघटनाप्लास्टिक मुक्त भारतबृहन्मुंबई महानगरपालिकभारतमुक्तपीठमुंबई
Previous Post

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर!

Next Post

पहिल्यांदाच दक्षिण ध्रुवावर बाइक राईड, रॉयल एनफील्डवरून दणदणीत राईडिंग!

Next Post
royal enfield

पहिल्यांदाच दक्षिण ध्रुवावर बाइक राईड, रॉयल एनफील्डवरून दणदणीत राईडिंग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!