Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

आरटीइ कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या खासगी शाळांवर कारवाई न करणे, हा शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा!

December 27, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
RTE कायदा अस्तित्वात येऊन ११ वर्षे झाले तरी महाराष्ट्र सरकारने दंड वसूल करायची प्रक्रियाच का स्थापीत केली नाही?

मुक्तपीठ टीम

बालकांचे मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार ( आरटीइ) कायद्यानुसार विनमान्यता चालणाऱ्या शिक्षण संस्थां हे कायद्यानुसार २५% गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या प्रक्रिये पासून पळवाट काढण्यासाठी मान्यता घेत नाहीत तसेच अशा शाळांवर बृहन्मुंबई शिक्षण विभागा कारवाई करत नाही आणि सरकारचा करोडो रुपयांचा महसूल बुडवते, अशी पुराव्यासहित तक्रार तत्कालीन शिक्षण मंत्री शालेय शिक्षण विभाग व अप्पर मुख्य सचिव शालेय शिक्षण विभाग यांच्याकडे महाराष्ट्र राज्य पालक शिक्षक महासंघाचे” व आप नेते नितीन दळवी आणि महासंघाचे प्रसाद तुळसकर यांनी दिनांक ०३/०३/२०२२ रोजी केली होती.

rti_reply_edu_Dept_21112022 (1)

या तक्रारींवर चौकशी करून अहवाल पाठविण्याचे पत्र शालेय शिक्षण विभागाने दि २४/०३/२०२२ रोजी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक यांना पाठवले होते , शालेय शिक्षण विभागाने पाठविलेल्या पत्रावर मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी दि १९/०४/२०२२ रोजी शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका यांना कारवाई करून अहवाल सादर करण्याचे पत्र पाठवले होते, शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी कारवाई करून मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयास पाठविलेल्या अहवालाची प्रत मिळवण्यासाठी नितीन दळवी यांनी माहितीचा अधिकार दि २५/०८/२०२२ रोजी दाखल केल्यावर, उपसंचालक कार्यालयाने अहवाल न देता कारवाईसाठी शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका याना १९/०४/२०२२ रोजीचेच पत्र परत पाठविले, या वरून असे निदर्शनास येते कि मुंबई विभागीय शिक्षण संचालका कार्यालयास शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी कारवाईचा अहवाल पाठविला नाही तसेच मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने त्यासाठी शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या कार्यालयाशी पाठपुरावा केला नाही, यावरून आरटीइ च्या इतक्या गंभीर प्रकरणावर कारवाई करायचीच नाही असे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगर पालिका यांनी ठरविल्याचे दिसते.

File 76

दरम्यान नितीन दळवी यांना शालेय शिक्षण विभाग तसेच बृहन मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या कडून आलेल्या माहिती नुसार आरटीइ कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या खाजगी शाळा प्रशासनाकडून द्रव्यदंड वसूल काण्याची प्रक्रियाच अजून निर्धारित करण्यात आलेली नाही, आरटीइ कायदा अस्तित्वात येऊन ११ वर्षे होऊनही शासनाने दंड वसूल करण्याची प्रक्रियाच प्रस्थापित न करणे हि बाब धक्कादायक आहे, व यावरून असे सिद्ध होते कि गेल्या ११ वर्षात महाराष्ट्रातील आरटीइ उल्लंघन करणाऱ्या एकही शाळेवर द्रव्यदंडाची कारवाई झालेली नाही.

वरून सर्व प्रकारावरून असे निदर्शनास येते कि पुरावे सादर करूनही शालेय शिक्षण विभाग, मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालय आणि शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका हे सरळ सरळ वर्षानुवर्षे आरटीइ मान्यता नसलेल्या खाजगी शाळांना पाठीशी घालायचे काम करत आहे, तसेच द्रव्य दंडाची प्रक्रिया स्थापन न करता अशा शाळांकडून द्रव्यदंड हि वसूल करत नाही आणि यामुळे शासनाचे महसुली नुकसान होत आहे, नितीन दळवी यांचा आरोप आहे कि आरटीइ कायद्याचे पालन करण्यास राज्य सरकार टाळत आहे तसेच हा महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे.

File 77

नितीन दळवी या विषयावर अजून कारवाई न झाल्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालकांशी भेट घेणारच आहे, गरज पडल्यास शिक्षण मंत्र्यांची हि भेट घेणार आणि RTE कायद्याच्या अंमलबजावणी मध्ये होणाऱ्या या घोटाळ्याबाबत उच्च न्यायालयात लवकरच जनहित याचिका दाखल करणार आहेत.


Tags: aapMaharashtraPrivate schoolsRTE Lawआपआरटीईमहाराष्ट्र
Previous Post

ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांनी नवीन भाडेदराप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये बदल करून घेण्याचे आवाहन

Next Post

कर्ज पात्रतेसाठीचा सिबिल स्कोर ठरवतात कसा? जाणून घ्या ‘या’ टीप्स…

Next Post
CIBIL Score

कर्ज पात्रतेसाठीचा सिबिल स्कोर ठरवतात कसा? जाणून घ्या 'या' टीप्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!