Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home चांगल्या बातम्या सरकारी बातम्या

“लातूर शहरात भूमिगत वीजवाहिन्यांची कामे पाच वर्षात पूर्ण करणार”

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊतांची माहिती

June 30, 2021
in सरकारी बातम्या
0
nitin raut

मुक्तपीठ टीम

लातूर शहरातील भूमिगत वीजवाहिन्यांची कामे पाच वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन करावे, अशा स्पष्ट सूचना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या. लातूर जिल्ह्यातील ऊर्जा विभागाच्या कामांची आढावा बैठक वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत ऊर्जामंत्र्यांनी या सूचना दिल्या.

 

मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्रशांत बडगेरी, एमएसईबी सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे, संचालक (प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण मंत्रालयातून तर महापारेषणचे संचालक (प्रकल्प) व्ही. थंगपंडियन, औरंगाबाद विभागाचे सह व्यवस्थापकीय संचालक भुजंग खंदारे, लातूरचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आदी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

यावेळी ऊर्जामंत्री डॉ. राऊत आणि देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील रेणापूर, अती उच्च दाब (ईएचव्ही) उपकेंद्र, नवीन विद्युत उपकेंद्र (सबस्टेशन) उभारणी, नवीन रोहित्रांची कामे तसेच नादुरुस्त रोहित्रांच्या बदल्यात द्यायची रोहित्रे, औसा- रेणापूर सौरऊर्जा प्रकल्प उभारणी, लातूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सौरऊर्जा प्रकल्पास मान्यता देणे आदी बाबींच्या अनुषंगाने या बैठकीत आढावा घेतला.

 

लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत सध्या काही भागातच भूमिगत वीजवाहिन्यांची कामे झाली असून महानगरपालिकेच्या संपूर्ण हद्दीत ही कामे पूर्ण व्हावीत अशी मागणी पालक मंत्री देशमुख यांनी डॉ. राऊत यांच्याकडे केली. त्याअनुषंगाने तात्काळ व्यवहार्यता तपासून आणि केंद्र शासनाच्या प्रस्तावित योजनांमध्ये समावेश करुन ही कामे येत्या पाच वर्षात टप्प्याटप्प्यांतर्गत पूर्ण होतील असे नियोजन करावे, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिले.

 

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हाती घ्यायची कामे पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींनी सूचवल्याप्रमाणे प्राधान्यक्रमाने हाती घ्यावीत. याबाबत तक्रारी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. नागरिकांच्या वीजपुरवठा, रोहित्रे आदींबाबतच्या तक्रारी अधिकाऱ्यांनी तातडीने सोडवाव्यात. लातूर जिल्ह्यात विद्युत रोहित्रे नादुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे दिसत असून त्याची कारणे शोधून तात्काळ उपाययोजना कराव्यात, आदी निर्देश डॉ. राऊत यांनी दिले.

 

महानिर्मितीकडून शिंदाळा-लोहारा (ता. औसा) येथे उभारण्यात येणाऱ्या ६० मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्प उभारणीचाही आढावा यावेळी घेण्यात आला. या प्रकल्पासाठी १७४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात आली असून प्रकल्पासाठी माती तपासणी, प्रकल्प आरेखन आदी तयार केले असून लवकरच प्रकल्पाचे सादरीकरण ऊर्जामंत्री डॉ. राऊत आणि पालकमंत्री देशमुख यांच्यासमोर करण्यात येईल. त्यानुसार प्रकल्प उभारणीला तात्काळ सुरूवात करण्यात येईल, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. लातूर महानगरपालिकेच्या वीजेच्या थकबाकीच्या अनुषंगानेही बैठकीत चर्चा झाली.

 


Tags: amit deshmukhEnergy Minister Dr. Nitin Rautअमित देशमुखऊर्जामंत्री नितीन राऊतमहानिर्मितीलातूर महानगरपालिका
Previous Post

“खाटिक समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात कार्यवाही करणार”: धनंजय मुंडे

Next Post

अजित पवार, अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीसाठी अमित शाह यांना भाजपाचे पत्र

Next Post
chandrakant patil

अजित पवार, अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीसाठी अमित शाह यांना भाजपाचे पत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!