Thursday, May 15, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मागास जाती ठरवण्याचा अधिकार पुन्हा राज्यांना मिळणार! मराठा समाजालाही फायदा होण्याची शक्यता!!

मराठा समाजासह अनेक जातींच्या आरक्षणाच्या मार्गातील मोठा अडथळा दूर होणार

August 4, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
vidhan bhavan

मुक्तपीठ टीम

मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने ५ मे रोजी दिलेल्या निकालामुळे मागास प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार केंद्राने राज्यांकडून काढून घेतल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र, आता केंद्र सरकार मागास प्रवर्गाच्या आरक्षणाचे राज्यांना दिलेले अधिकार त्यांना पुन्हा देण्यासाठी कायदा करण्याचा विचार करत आहे. त्यासाठी १०२व्या घटनादुरुस्तीत आवश्यक ते बदल केले जाण्याची शक्यता आहे. संसदेच्या या पावसाळी अधिवेशनात संसदेत याबद्दलचे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मराठा समाजासह देशभरातील अनेक जातींच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

 

राज्यांना अधिकार पुन्हा देण्यासाठी कायद्याचा मार्ग

  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.
  • न्यायालयाने १०२व्या घटनादुरुस्तीनंतर झालेल्या बदलांवर भाष्य केले.
  • राज्यांना सामाजिक आणि आर्थिक आधारावर मागास प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार नाही.
  • अशी यादी फक्त केंद्रच बनवू शकते.
  • तीच यादी वैध असेल.
  • न्यायालयाच्या या निर्णयानंतर एक नवा वाद निर्माण झाला होता.

 

आरक्षण ठरवण्याच्या अधिकारांचा वाद

  • सध्या केंद्र आणि राज्यांमधील ओबीसींची यादी वेगळी आहे.
  • अशा अनेक जातींना राज्यांच्या यादीत ठेवण्यात आले आहे, जे केंद्रीय यादीत नाहीत.
  • केंद्र आरक्षणाबाबत संवेदनशील आहे, कारण याबद्दल कोणताही निर्णय समाजात असंतोष माजवू शकतो.
  • कारण राज्यांच्या यादीच्या आधारे अशा अनेक मागास जाती आहेत, ज्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळत आहे आणि राज्यातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळतो.
  • अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अंमलबजावणीमुळे या जातींचे नुकसान होऊ शकते.
  • आरक्षणासारख्या संवेदनशील प्रकरणात केंद्र सरकार कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही.
  • हेच कारण आहे की सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच हे स्पष्ट केले होते की ते त्याच्याशी सहमत नाही.
  • राज्यांना त्यांचे मागास जाती ठरवण्याचे अधिकार परत देण्यात येतील.

 

सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर आता कायद्याचा तोडगा

  • केंद्र सरकारने मराठा आरक्षणावरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आरक्षण अधिकार राज्यांना नसल्याच्या निकालाविरोधात पुनर्विचार याचिकाही दाखल केली होती.
  • ती न्यायालयाने फेटाळली.
  • यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे.
  • सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवीन मंत्री वीरेंद्र कुमार यांनी आधी अधिकाऱ्यांशी या विषयावर चर्चा केली.
  • वीरेंद्रकुमारांनी त्यानंतर कायदेतज्ज्ञ सल्लामसलत केली.
  • पंतप्रधानांची मंजुरी घेतल्यानंतर १०२ व्या घटनादुरुस्तीतील सुधारणांना अंतिम स्वरूप देण्यात आले.
  • सध्या ओबीसींच्या केंद्रीय यादीमध्ये सुमारे २६०० जातींचा समावेश आहे.
  • या सुधारणांनंतर आणखी काही जातींचा समावेश करण्याचा मार्ग मोकळा होईल.

Tags: 102th constitutional amendment१०२वी घटनादुरुस्तीMaratha Reservationprime minister narendra modiकेंद्र सरकारमराठा आरक्षणवीरेंद्र कुमारसर्वोच्च न्यायालय
Previous Post

केंद्रीय विद्यालयांच्या प्रवेशांमधील खासदारांचा १० जागांचा कोटा रद्द!

Next Post

तलवार घेऊन न्यूज चॅनल कार्यालयात तरुण घुसला, प्रचंड तोडफोड

Next Post
stanger

तलवार घेऊन न्यूज चॅनल कार्यालयात तरुण घुसला, प्रचंड तोडफोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!