Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

अखेर नाशिकमधील साहित्य संमेलन पुढे ढकलले, आता मे महिन्यात!

March 7, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
akhil bhartiy sahitya sammelan

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नाशिकमध्ये २६ ते २८ मार्च दरम्यान नियोजित करण्यात आलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनपुढे ढकलण्याचा निर्णय अखिल भारतीय साहित्य महामंडळाने घेतला आहे. सध्याची परिस्थिती पाहता या काळात संमेलन आयोजित केल्यास विपरीत परिणामी होऊ शकतात. त्यामुळे मार्च ऐवजी मे मध्ये हे संमेलन होणार असल्याची घोषणा साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी रोजी एका पत्रकान्वये केली.

नाशिक येथे २६ ते २८ मार्च या कालावधी ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. मात्र करोनामुळे हे संमेलन स्थगित करण्यात आलं आहे. राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढतो आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये होणारे साहित्य संमेलन पुढे ढकलावे अथवा ऑनलाईन पद्धतीने घ्यावे अशी मागणी साहित्यिकांमधून व नाशिककरांकडूनही होत होती. या संमेलनासाठीची जवळपास सर्व तयारी झाली होती. अनेक साहित्यिकांना निमंत्रणे पाठवण्यात आली होती.या चर्चेनंतर साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यात सध्या मुंबई पुणे, ठाणे आणि विदर्भ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करोनाचा प्रसार वाढतो आहे.नाशिकमध्ये सध्या कोरोनाची फारशी चिंता नसली तरीही बाहेरुन येणाऱ्या साहित्यिकांकडून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे. यासाठी आयोजकांनी सावध भूमिका घेऊन संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

“संमेलनाची जोरदार तयारी आणि निधी संकलन सुरू असताना कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढला आहे. साहित्य महामंडळाने व नाशिकच्या स्वागत मंडळाने कोरोना कमी होण्याची वाट पाहिली. पण, कुठेही कमी होण्याची चिन्ह दिसत नाही आहेत. उलट रुग्णसंख्येत वाढत होत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन अध्यक्ष ठाले यांनी उपाध्याक्षांसह पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. नाशिकमधून येणाऱ्या रसिकांच्या आणि संपूर्ण देशातून येणाऱ्या लेखक-कवींच्या सुरक्षिततेचा विचार करून २६, २७ व २८ मार्च रोजी होणारे साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला,” अशी माहिती मंडळाने दिली आहे.

हा निर्णय घेताना नाशिकचे पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, लोकहितवादी मंडळाचे पदाधिकारी, साहित्य संमेलनाचे पदाधिकारी या सर्वांनी मिळून बैठकीत हा निर्णय घेतला आहे. साहित्य संमेलन पुढे ढकलले असले तरीही संमेलनाचे नियोजन बैठका सुरु राहणार आहे. त्यात कुठलाही खंड पडणार नाही. संमेलनाच्या कार्यालयात विशेष दक्षता घेण्यात येत आहे.


Tags: ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनकोरोनाछगन भुजबळ
Previous Post

#मुक्तपीठ रविवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post

गुन्हे महत्त्वाचे- 1) मुंबईत एका अभिनेत्रीने तिच्यावर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.टीव्ही अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी फआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. 2) रचिपळूण तालुक्यातील सावर्डे आबीट गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका आईनेच आपल्या नवजात एक महिन्याच्या बाळाचा जीव घेतला आहे. दुसऱ्यांदा सुद्धा मुलगी झाली या रागातून एका महिन्याच्या मुलीला पाण्याच्या बादलीमध्ये बुडवून या निर्दयी आईने तिची हत्या केली. 3)कोचींग क्लासेसहून आपल्या घरी चाललेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तीन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली.मुलीने आरडाओरड केल्यानंतर त्या मुलीचे वडील व मामा धावून आले. त्यावेळी पालोदकरने चाकूचा धाक दाखवून पळ काढला होता. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी खुलताबाद येथून तिघांना अटक केली. 4)सेल्फी फोटो व्हायरल करण्याची आणि आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार करण्यात आला. जुने नाशिक परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल केला आहे. संशयित १७ वर्षीय मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 5)मुंबईतून गेल्या दोन वर्षांत जवळपास पाच हजार वाहने बेपत्ता झाली असून त्यातील तीन हजार वाहनांचा अद्यापही शोध लागलेला नाही. देशभरात घडलेल्या अतिरेकी हल्ल्यापासून अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये चोरीच्या वाहनांचा वापर झाला आहे.

Next Post

गुन्हे महत्त्वाचे- 1) मुंबईत एका अभिनेत्रीने तिच्यावर बलात्कार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.टीव्ही अभिनेत्रीने दिलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचं आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी फआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. 2) रचिपळूण तालुक्यातील सावर्डे आबीट गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका आईनेच आपल्या नवजात एक महिन्याच्या बाळाचा जीव घेतला आहे. दुसऱ्यांदा सुद्धा मुलगी झाली या रागातून एका महिन्याच्या मुलीला पाण्याच्या बादलीमध्ये बुडवून या निर्दयी आईने तिची हत्या केली. 3)कोचींग क्लासेसहून आपल्या घरी चाललेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तीन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली.मुलीने आरडाओरड केल्यानंतर त्या मुलीचे वडील व मामा धावून आले. त्यावेळी पालोदकरने चाकूचा धाक दाखवून पळ काढला होता. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी खुलताबाद येथून तिघांना अटक केली. 4)सेल्फी फोटो व्हायरल करण्याची आणि आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी बलात्कार करण्यात आला. जुने नाशिक परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल केला आहे. संशयित १७ वर्षीय मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 5)मुंबईतून गेल्या दोन वर्षांत जवळपास पाच हजार वाहने बेपत्ता झाली असून त्यातील तीन हजार वाहनांचा अद्यापही शोध लागलेला नाही. देशभरात घडलेल्या अतिरेकी हल्ल्यापासून अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये चोरीच्या वाहनांचा वापर झाला आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!