Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मोदी सरकारचा रिझर्व्ह बँकेला प्रश्न: आटोक्यात का येत नाही महागाई?

October 13, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
RBI

मुक्तपीठ टीम

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या सर्व प्रयत्नांनंतरही, महागाई सलग ९व्या महिन्यात समाधानकारक पातळीच्या वर आहे. यामुळे मोदी सरकारने आरबीआयला महागाई आटोक्यात का येत नाही? असा प्रश्न केला आहे. आरबीआयला यावरून आता केंद्र सरकारला अहवाल द्यावा लागेल आणि त्याचे कारण सविस्तर सांगावे लागेल. महागाई निर्धारित मर्यादेत का ठेवता आली नाही आणि ती आटोक्यात आणण्यासाठी कोणती पावले उचलली जात आहेत, हे या अहवालात स्पष्ट करावे लागणार आहे. २०१६ मध्ये चलनविषयक धोरण आराखडा अंमलात आल्यानंतर ही पहिलीच वेळ असेल, आरबीआयला अहवालाद्वारे सरकारला त्यांच्या पावलांची माहिती द्यावी लागेल. येथे, नॅशनल स्टॅटिस्टिकल मिनिस्ट्री (NSO) नुसार, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये फक्त ६ वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत.

किरकोळ महागाई आटोक्यात आणण्याची जबाबदारी!!

किरकोळ महागाई दर २ टक्क्यांच्या फरकासह ४ टक्के राखण्याची जबाबदारी आरबीआयकडे सोपवण्यात आली आहे.

नियम काय सांगतो?

रिझव्‍‌र्ह बँक कायद्यानुसार, सलग तीन तिमाहीत चलनवाढीचे उद्दिष्ट गाठले नाही, तर आरबीआयने केंद्र सरकारला अहवाल देणे आवश्यक आहे.

किरकोळ चलनवाढीचा दर सप्टेंबरमध्ये पाच महिन्यांच्या वर, खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याचा परिणाम

  • खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्यामुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई ७.४१ टक्क्यांवर पोहोचली.
  • यंदाच्या एप्रिलपासूनचा हा पाच महिन्यांचा उच्चांक आहे.
  • त्यावेळी किरकोळ किमतींवर आधारित महागाई (CPI) ७.७९ टक्के होती.
  • राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये सलग ९व्या महिन्यात किरकोळ महागाईचा दर आरबीआयच्या ६ टक्क्यांच्या वरच्या मर्यादेच्या वर राहिला.
  • ऑगस्टमध्ये ते ७ टक्के आणि गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ४.३५ टक्के होते.
  • ऑगस्टमधील ७.६२ टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये खाद्यपदार्थांची महागाई ८.६० टक्क्यांवर पोहोचली.
  • केंद्र सरकारने आरबीआयला किरकोळ महागाई २ ते ६ टक्क्यांच्या दरम्यान ठेवण्याचे लक्ष्य दिले आहे.

किरकोळ महागाई: या वस्तूंच्या किमती वाढल्या

  • सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई ७.४१ टक्क्यांवर पोहोचली, जी अपेक्षेपेक्षा जास्त होती.
  • तज्ज्ञांनी कमाल किरकोळ महागाई ७.३० टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला होता.
  • नॅशनल स्टॅटिस्टिकल मिनिस्ट्री (NSO) नुसार, ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये फक्त ६वस्तूंच्या किमती कमी झाल्या आहेत.
  • त्याचबरोबर इतर सर्व वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे.
  • यामुळे सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई अपेक्षेपेक्षा जास्त होती.

तृणधान्ये, भाजीपाला, डाळी, दूध यासह अन्य वस्तू महागल्या 

उत्पादन         सप्टेंबर         ऑगस्ट
तृणधान्ये          ११.५३%       ९.५७%
मांस-मासे        २.५५%         ०.९८%
दूध                 ७.१३%          ६.३९%
भाजी              १८.०५%        १३.२३%
डाळ              ३.०५%           २.५२%
मसाले           १६.८८%          १४.९०%
अन्न-पेय         ८.४१%              ७.५%
फॅब्रिक          ९.९०%             ९.५८%
पादत्राणे         १२.३०%           ११.८५%
गृहनिर्माण      ४.५७%              ४.०६%
अंडी –         -१.७९%             -४.५७%
आरोग्य          ५.५२%              ५.४३%
तेल-चरबी, इंधन-वीज, फळे, साखर यातील महागाई ऑगस्टच्या तुलनेत कमी झाली आहे.

या राज्यांमध्ये सर्वाधिक महागाई

  • आकडेवारीनुसार, पश्चिम बंगाल, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमध्ये किरकोळ महागाईचा दर सर्वाधिक होता. या राज्यांमध्ये हा दर ८.०६ टक्के ते ९.४४ टक्के इतका होता.
  • दिल्ली, हिमाचल प्रदेश, ओडिशा, कर्नाटक आणि बिहार ही सर्वात कमी महागाई असलेली राज्ये होती. येथे महागाई ४.०३% ते ६.३८% दरम्यान होती.
  • उत्तर प्रदेशात हा दर ७.७९ टक्के होता. हरियाणा ७.९५ टक्के, उत्तराखंड ७.२७ टक्के आणि पंजाब ५.६० टक्के नोंदवले गेले.

Tags: inflationModi govtRBIआरबीआयमहागाईमोदी सरकार
Previous Post

महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून अभिनंदन

Next Post

ऊसतोड मजूरांकडील गोवंशीय पशुधनाचे लम्पी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक

Next Post
radhakrishna-vikhe-patil

ऊसतोड मजूरांकडील गोवंशीय पशुधनाचे लम्पी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!