Sunday, May 18, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मुंबई, कोल्हापूर, नंदुरबारमध्ये आघाडी-भाजपाचं ठरलं! वाशिम, नागपुरातच का बिघडलं?

November 27, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
mlc elections in maharashtra

मुक्तपीठ टीम

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मुंबई, कोल्हापूर आणि धुळे नंदुरबारची निवडणूक बिनविरोध करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र नागपूर आणि अकोल्यात निवडणूक होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलढाणामध्ये विधान परिषदेच्या जागेसाठी थेट निवडणूक होणार आहे.

या उमेदवारांची बिनविरोध निवड

  • मुंबईत भाजपचे राजहंस सिंह आणि शिवसेनेचे सुनील शिंदे
  • कोल्हापुरात काँग्रेसचे सतेज पाटील
  • धुळे-नंदुरबारमध्ये भाजपचे अमरिश पटेल

अशी झाली सतेज पाटलांची बिनविरोध निवड

  • कोल्हापूर, धुळे-नंदुरबार, अकोला-बुलढाणा-वाशिम, नागपूर या प्रत्येकी एक आणि मुंबईच्या दोन अशा सहा जागांसाठी विधान परिषदेची
  • निवडणूक जाहीर झाली. एकीकडे आरोप-प्रत्यारोप करणारे नेते दुसरीकडे मात्र निवडणुका बिनविरोध होण्यासाठी चर्चा करत आहेत.
  • राज्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची आणि फडणवीस, पाटील यांच्यातही चर्चा सुरु होती.
  • मुंबई आणि धुळे-नंदुरबारच्या बदल्यात काँग्रेसला कोल्हापूरची जागा देण्यावर एकमत झालं.
  • त्यानंतर दुपारी दीड वाजता फडणवीस यांनी भाजप नेते धनंजय महाडिकांना फोन करुन भाजप उमेदवार अमल महाडिक यांचा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला सांगितलं.
  • पक्षादेश आल्यानं अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
  • त्यामुळे कोल्हापुरातून काँग्रेस नेते सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

मुंबईत भाजप आणि शिवसेना उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध जाणार

  • मुंबईतून भाजपने राजहंस सिंह यांना उमेदवारी दिली होती.
  • तर शिवसेनेनं आदित्य ठाकरे यांच्यासाठी जागा सोडणाऱ्या सुनील शिंदे यांना विधान परिषदेसाठी संधी दिली आहे.
  • मात्र, काँग्रेस नेते सुरेश कोपरकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरल्यानं मुंबईत निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
  • मात्र, कोपरकर यांनी काल आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे राजहंस सिंह आणि शिवसेनेचे सुनील शिंदेही विधान परिषदेवर बिनविरोध जाणार आहेत.

धुळे-नंदुरबारमध्ये अमरिश पटेल बिनविरोध

  • धुळे-नंदुरबारमध्ये भाजपनं तगडा उमेदवार दिलाय.
  • भाजपनं अमरिश पटेल यांना रिंगणात उतरवलं आहे. तर काँग्रेसकडून नवख्या गौरव वाणी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
  • मात्र, धनंजय महाडिक यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि धुळे-नंदुरबारच्या बदल्यात भाजपनं काँग्रेसला कोल्हापूरची जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
  • त्यामुळे गौरव वाणी हे देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील हे स्पष्ट झालंय.

नागपुरात बावनकुळे विरुद्ध भोयर

  • अकोला – बुलढाणा – वाशिममध्ये आघाडी व भाजपाला बहुमत नाही.
  • भाजपाकडून नागपुरात बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न असताना काही काँग्रेस नेत्यांमुळे नागपुरात बिनविरोध निवडणूक होऊ शकली नाही.
  • त्यामुळे नागपुरात आता माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांच्यात निवडणूक होणार आहे.
  • तर अकोला – बुलढाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपाच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नाही.
  • अकोला – बुलढाणा – वाशिम मतदारसंघातून शिवसेनेचे गोपीकिशन बजोरिया हे विद्यमान आमदार निवडणूक रिंगणात आहेत.
  • त्यांच्याविरोधात भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तेथेही शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना होणार आहे.

 

निकाल स्पष्ट तिथं ठरलं, अटीतटीची तिथं बिघडलं!

  • मुंबई मनपातील २ जागा, कोल्हापूर, नंदूरबार या चार जागी निकाल स्पष्ट असल्यानं तिथं आघाडी भाजपाचं झटकन ठरलं. तर नागपूर, अकोला-वाशिम-बुलडाण्यात अटीतटीची शक्यता असल्यानं तसंच राहिलं.

Tags: akolaBJPCongressDhuleKolhapurMVAnagpurShivsenaअकोलाकाँग्रेसकोल्हापूरधुळेनंदुरबारनागपूरभाजपामहाविकास आघाडीविधान परिषदविधान परिषद निवडणूकशिवसेना
Previous Post

हिवाळी अधिवेशन नागपूरला न होणे ही निंदनीय बाब – डॉ. आशिष देशमुख

Next Post

नव्या व्हेरिएंटची जगभरात वाढती भीती, मात्र, राज्यात सतत १० दिवस नवे रुग्ण हजाराखाली!

Next Post
MCR maharashtra corona report 22-11-21

नव्या व्हेरिएंटची जगभरात वाढती भीती, मात्र, राज्यात सतत १० दिवस नवे रुग्ण हजाराखाली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!