Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठा आरक्षणावरील महाराष्ट्राच्या रणनीतीचा फायदा, इतर राज्यांकडून ५०% + आरक्षणाचे समर्थन

महाराष्ट्राच्या मराठा आरक्षण कायद्याला केंद्राचेही समर्थन

March 24, 2021
in featured, कायदा-पोलीस
0
maratha reservation (2)

मुक्तपीठ टीम

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत महाराष्ट्र सरकारच्या रणनीतीचा फायदा होऊ लागला आहे. ५० टक्के आरक्षण मर्यादेच्या मुद्द्यावर इतर राज्यांनाही बाजू मांडण्यास सांगाव्यात यासाठी महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयात मागणी केली होती. त्यानुसार आतापर्यंत पाच राज्यांनी महाराष्ट्राच्या ५० टक्क्यांवर आरक्षण नेण्याच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. केंद्र सरकारनेही महाराष्ट्राचा मराठा आरक्षण कायदा योग्य असल्याचे न्यायालयात सांगितले आहे.

महाराष्ट्रासह बिहार, झारखंड, कर्नाटक, पंजाब, राजस्थान, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश या सर्व राज्यांनी आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात लेखी बाजू मांडली आहे. त्यांनी खंडपीठासमोर युक्तिवाद करताना, ५०% मर्यादेवरील आरक्षणाचे समर्थन केले आहे. बदललेल्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीचा विचार करता इंदिरा साहनी यांच्या प्रकरणातील आरक्षण मर्यादेच्या निकालावर ११ न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठाने पुनर्विचार करावा अशी मागणी या राज्यांनी केली आहे.

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी झारखंड राज्याची बाजू मांडताना सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना आरक्षणाचे प्रमाण ठरवण्याची मोकळीक देण्याची मागणी केली. ते म्हणाले आरक्षणाचे प्रमाण किती असावे ते राज्यांना ठरवू द्यावे न्यायालयांनी ठरवू नये.

बिहार आणि राजस्थान यांनी असा युक्तिवाद केला की राज्यांमध्ये मागासवर्गीयांची संख्या गेल्या अनेक वर्षांत वाढली आहे आणि त्या समाजातील लोकांच्या उत्थानासाठी ५०% आरक्षण पुरेसे नव्हते आणि ते वाढविले जावे. राजस्थानतर्फे उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील मनीष सिंघवी म्हणाले की, गेल्या २६ वर्षांत ओबीसीची संख्या दुपटीने वाढली आहे.

बिहारचे बाजू मांडणारे वकील मनीष कुमार यांनी खंडपीठाला सांगितले की ओबीसीची संख्या १९९३ मध्ये १२९ वरून राज्यात १७४ झाली आहे.

केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. ते म्हणाले की, केंद्राकडे अटर्नी जनरल यांनी खंडपीठासमोर जे सांगितले त्यात भर घालण्यासारखे काही नव्हते. १०२ व्या घटना दुरुस्तीने मागास प्रवर्ग निश्चित करून यासंदर्भातील कायदा लागू करण्याचा राज्यांचा अधिकार हिरावला गेलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा आरक्षण देणाऱ्या कायद्याबबातही ते म्हणाले, “केंद्राला वाटते की हा एक वैध कायदा आहे.”


Tags: Maratha Reservationstate governmentSupreme Courtमराठा आरक्षणसर्वोच्च न्यायालय
Previous Post

#मुक्तपीठ बुधवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

असं कसं घडलं? आज स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल!

Next Post
Petroleum-price-Medium

असं कसं घडलं? आज स्वस्त झालं पेट्रोल-डिझेल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!