Monday, May 12, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

“चित्ररथातून झळकते महाराष्ट्राची अस्मिता”

February 10, 2022
in घडलं-बिघडलं
0
Mahaashtra Received 12 Awards for chitrarath presentation on republic day

मुक्तपीठ टीम

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला राजपथावरील पथसंचलनात ‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राचा चित्ररथ होता. राज्याच्यावतीने  दरवर्षी असे चित्ररथ उभारले जातात ज्यामधून महाराष्ट्राची अस्मिता ठळकपणे दिसावी. सन १९७१ ते २०२२ या ५१ वर्षाच्या काळात महाराष्ट्राने ३८ वेळा चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्रीय परंपरेचे दर्शन घडविले आहे आणि १२ वेळा उत्कृष्ट चित्ररथासाठीचा पुरस्कारही पटकाविला  आहे.

            

यावर्षीपासून राजपथावरील पथसंचलनात सामील झालेल्या राज्यांच्या चित्ररथाला आणि लष्करी मार्चिंग तुकडीला ऑनलाईन नोंदणीद्वारे मत देऊन जिंकविता येईल, असे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले होते. त्याप्रमाणे प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलन संपल्यानंतर MyGov या पोर्टलवर ऑनलाईन मत नोंदणी सुरू झाली होती. यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाला “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झालेला असून, महाराष्ट्राने चित्ररथाच्या सादरीकरणाच्या इतिहासातही सुवर्ण अक्षराने आपली अमिट छाप सोडली आहे. 

असा होता महाराष्ट्राचा ‘जैव विविधता व राज्य मानके’ चित्ररथ            

चित्ररथाच्या दर्शनी भागातील ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची ८ फूट उंच आणि ६ फूट रूंद पंखांच्या देखण्या प्रतिकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. चित्ररथावर राज्यफुल ‘ताम्हण’चे रंगीत गुच्छ दर्शविण्यात आले. या फुलांवरील छोट्या आकर्षक फुलपाखरांच्या लोभस प्रतिकृतीही उठून दिसत होत्या. चित्ररथावर मोठ्या आकारातील ‘शेकरू’ हा राज्यप्राणी तसेच, युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेले ‘कास पठार’ दर्शविण्यात आले. या पठारावर आढळणारी विविध जैवविविधता दर्शविण्यात आली. ‘हरियाल’ पक्षाची प्रतिकृती, चित्ररथाच्या मागील भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरूची प्रतिकृती आणि राज्यवृक्ष ‘आंबा’ ची प्रतिकृतीही उपस्थितांचे आकर्षण ठरली. माळढोक पक्षी, खेकडा तसेच, मासा, वाघ, आंबोली  झरा, फ्लेमिंगो,  गिधाड, घुबड पक्ष्यांच्या प्रतिकृतींनीही उपस्थितांची मने जिंकली होती.

 

‘मावज’ची ऑनलाईन मोहीम            

महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने देखील या चित्ररथाला ऑनलाईन मतदान करण्यासंदर्भात आवाहन करण्यासाठी सर्व समाजमाध्यमांच्याद्वारे विशेष मोहीम राबवली होती. यामध्ये महाराष्ट्राला सर्वांधिक २३ टक्के मते मिळाली होती.     

आतापर्यंत महाराष्ट्राच्या १२ चित्ररथांना पुरस्कार            

महाराष्ट्राला लाभलेल्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक-सामाजिक, पर्यटन, संत-वारी  परंपरा  आदि विषयांवर चित्ररथ सादर करण्याची संधी मिळालेली आहे. यात राज्याने १२ वेळा पुरस्कार पटकावले आहे. वर्ष १९९३ ते १९९५ पर्यंत सलग तीन वेळा प्रथम पुरस्कार पटकावून विक्रम निर्माण केला आहे. आतापर्यंत महाराष्ट्राला ७ वेळा प्रथम पुरस्कार मिळालेले आहेत. तीन वेळा द्वितीय पुरस्कार व दोन वेळा तृतीय पुरस्कार मिळाला आहे.

            

वर्ष १९८१ आणि २०१८ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेका’वर आधारित चित्ररथाला प्रथम पुरस्कार मिळाला होता. महाराष्ट्रात पोळा या सणाला विशेष महत्व आहे ‘बैलपोळा’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच विषयावर आधारीत वर्ष  १९८३ च्या चित्ररथाला प्रथम पुरस्कार देण्यात आले होते. वर्ष १९९३ मध्ये ‘लोकमान्य  टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष’ या चित्ररथाला, वर्ष १९७४ ला फळाचा राजा ‘हापूस आंबा’ या चित्ररथाला आणि वर्ष १९९५ मध्ये ‘बापू स्मृती’ या चित्ररथाला असे सलग तीनदा प्रथम पुरस्कार मिळाला. ‘पंढरीची वारी’ या चित्ररथाला वर्ष २०१५ मध्ये प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले.

            

महाराष्ट्राने स्वातंत्र्य संग्रामात कशा प्रकारे भाग घेतला होता यावर आधारीत वर्ष १९८६ च्या चित्ररथाला दुसरे पारितोषिक मिळाले होते. वर्ष १९८८ मध्ये ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटला’ या चित्ररथाला दुसरे पारितोषिक मिळाले. वर्ष १००९ मध्ये राज्यातील ‘धनगर’ समाजाची संस्कृती दर्शविणाऱ्या चित्ररथाने दुसरे पारितोषिक पटकाविले. तर वर्ष २००७ मध्ये ‘जेजुरीचा खंडेराया’ या चित्ररथास तिसरा पुरस्कार मिळाला. वर्ष २०१७ मध्ये लोकमान्य टिळकांच्या योगदानावर आधारित ‘बाळ गंगाधर टिळक’ या चित्ररथाला तिसरा क्रमांक मिळालेला होता.

राज्याच्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन चित्ररथातून दिसते            

महाराष्ट्राने सर्वात प्रथम सन १९७१ मध्ये ‘वारली दिंडी’ या विषयावर चित्ररथ सादर केला होता.  त्यानंतर दोन वर्षांनी १९७३ साली ‘भारत छोडो आंदोलन’ ही संकल्पना घेऊन या आंदोलनातील महत्वाच्या प्रसंगांचे चित्ररूप राजपथावर सादर केले होते.

            

राज्य निर्मितीपासून अवघ्या १४ वर्षात राज्यामध्ये विविध मोठे उद्योगधंदे स्थापित झाले १९७४ च्या चित्ररथामध्ये याच उद्योगधंद्यांचे प्रतिबिंब राजपथावर दिसले. पुढे १९७८ मध्ये ‘विविधतेत समानता’ असा चित्ररथ राजपथावर झळकला. तर वर्ष १९७९ मध्ये ‘बाल विकास’ या विषयावर चित्ररथाच्या माध्यमातून बालविकासाचे धोरण दर्शविले.

            

महाराष्ट्रामधील भौगोलिक भागानुरूप विविध सण साजरे केले जातात, असाच विषय धरून १९८० ‘ महाराष्ट्रातील सण ’ असा  चित्ररथ साकारण्यात आला.  सन १९८२ मध्ये राज्यातील समृद्ध  ‘लोककला’ विषयावरील चित्ररथाने राजपथावरील प्रेक्षकांची मने जिंकली.

                                    

लोकमान्य टिळकांवर आधारित विविध विषयांवर ४ वेळा  चित्ररथ            

भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे भारतीय स्वातंत्र चळवळीत विशेष महत्व आहे. लोकमान्य टिळकांवर आधारीत चित्ररथ राजपथावर वेगवेगळ्या विषयाला धरून उभारण्यात आले. प्रथम सन १९८४ आणि नंतर सन २०१७ मध्ये लोकमान्य टिळकांची सिंहगर्जना ‘स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध अधिकार आहे ’ या घोषणेवर आधारीत  चित्ररथ उभारण्यात आला. या चित्ररथाला दोनही वेळा द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वर्ष १९८८ मध्ये ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासिक खटला’ तर वर्ष १९९३ मध्ये ‘लोकमान्य  टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे शताब्दी वर्ष’ विषयावर चित्ररथ  होता.

            

वर्ष १९८६ हे स्वातंत्र्याच्या  चाळीशी चे वर्ष होते, या निमित्ताने ‘स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे योगदान’ असा चित्ररथ राजपथावर सादर करण्यात आला. सन १९९० मध्ये  पुन्हा एकदा ‘लोककला’ या विषयावर चित्ररथ राजपथावर दर्शविण्यात आला. वर्ष  १९९१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शताब्दी वर्षानिमित्ताने चित्ररथ उभारण्यात आला. ‘वारली तारपा नृत्य’ असा चित्ररथ सण १९९२ मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात दिसला.

‘हापूस’ आंबा            

आंब्यांचा राजा ‘हापूस आंबा’ या संकल्पनेवर सन १९९४ मध्ये चित्ररथ  साकारण्यात आला. महात्मा गांधीजीच्या  १२५ व्या जयंती वर्षामध्ये राज्याने वर्ष १९९६ ला ‘बापु स्मृती’ असा चित्ररथ बनविला. वर्ष १९९७ ला चित्रपट सृष्टीने शंभरी पूर्ण केली होती. याची आठवण म्हणुन ‘चित्रपट सृष्टीचे शंभर वर्ष ’ अशा संकल्पनेवर चित्ररथ साकारण्यात आला.

            

वर्ष  १९९६ मध्ये  ‘महिला व बालविकास ’ अशा महत्वपूर्ण विषयावर चित्ररथ तयार करण्यात आला. वर्ष १९९९ ‘मुंबई देशाची आर्थिक राजधानी ’ दर्शविणारा चित्ररथ राजपथावर झळकला. राज्याची ओळख ठळकपणे दर्शविणारे ‘साखर कारखाने’ यावर आधारित २०००१ मध्ये चित्ररथ साकारण्यात आला. गोकुळ अष्टमीला दही हंडी फोडणारे गोविंदा यांच्यावर ‘गोविंदा आला ’ अशी संकल्पना घेऊन २००२ ला चित्ररथ दर्शविण्यात आला. सण २००३ मध्ये  ‘आदिवासी वारली  चित्रकला’ असा आदिवासी जीवनावर आधारित चित्ररथ  आकारण्यात आला.

‘मुंबईचा डबेवाला’            

महाराष्ट्राचा स्थापत्य ठेवा असलेल्या अजिंठा लेणी यावर आधारित सण २००४ ला ‘अजिंठा लेणींमधील काही लेणींची भीत्तीचित्रे चित्ररथात दर्शविण्यात आली. महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या  ‘ग्रामस्वच्छता अभियान’ योजनेवर आधारीत चित्ररथ सण २००६ मध्ये साकारण्यात आला.  राज्यामध्ये भरणारी महत्वाची धार्मिक जत्रा ‘जेजुरीचा खंडेराया’ या संकल्पनेचा चित्ररथ वर्ष २००७ मध्ये चित्ररथ दर्शविण्यात आला. पुढे २००९ ला ‘धनगर’ असा विषय घेऊन चित्ररथ उभारण्यात आला. वर्ष २०१० ला जगाचे लक्ष वेधणारा ‘ मुंबईचा डबेवाला’ या संकल्पनेवरील चित्ररथ साकारण्यात आला.

‘पंढरीची वारी’            

महाराष्ट्राचे नृत्य ‘लावणी ’ यावर चित्ररथ २०११ मध्ये दर्शविण्यात आला, या चित्ररथाला  प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. वर्ष २०२१ मध्ये वेरूळ लेणीमधील ‘कैलास मंदीर’ या विषयावरील चित्ररथ उभारण्यात आला होता. सण २०१४ मध्ये कोकणातील मच्छीमारी समुहातील असणारा महत्वपूर्ण  सण ‘ नारळी पोर्णिमा’ या विषयावर चित्ररथ साकारण्यात आला. वर्ष २०१५ मध्ये राज्याची शतकांची परंपरा  ‘पंढरीची वारी’ या वारीच्या विषयावर आधारित चित्ररथाने राजपथावर भक्तीमय वातावरण निर्माण केले. सन २०१९ मध्ये महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त ‘भारत छोडो’ आंदोलनवर आधारित चित्ररथ साकारण्यात आला. वर्ष २०२१ मध्ये ‘ वारकरी संत परंपरेवर ’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ होता.

            

महाराष्ट्राचा भूभाग प्राचीन तसेच आधुनिक इतिहासाचा महत्वाचा प्रदेश आहे. राज्याच्या निर्मितीपूर्वीही  भारतीय स्वातंत्र्य लढ्यात या भूभागातून येणाऱ्या विचारवंत नेतृत्वाने देशाला दिशा दिलेली होती. राज्य निर्मितीनंतरही आ‍धुनिक महाराष्ट्र, शिक्ष‍ित  महाराष्ट्र, स्त्री-पुरूष समानता पाळणारा महाराष्ट्र, राज्यातील लोकांचे जीवनमान उंचावेल अशी धोरणे राबविण्याचा राज्याचा मानस सदैव असतो आणि त्याचे प्रतिबिंब चित्ररथात दिसून येते.

 

(अंजु निमसरकर या नवी दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रात माहिती अधिकारी आहेत.)

संपर्क  Anjuykamble15@gmail.com    9899114130

 


Tags: Anju NimsarkarMaharashtramumbaiअंजु निमसरकरजैव विविधता व राज्य मानकेमहाराष्ट्र
Previous Post

देशात गेल्या तीन वर्षात बेरोजगारीमुळे ९ हजार आत्महत्या! तर कर्जामुळे १६ हजारांनी जीवन संपवलं!

Next Post

चांद्रयान-३ चे प्रक्षेपण यावर्षीच! ऑगस्टमध्ये चंद्रावर भारतीय स्वारी!!

Next Post
चांद्रयान-३ चे प्रक्षेपण यावर्षीच! ऑगस्टमध्ये चंद्रावर भारतीय स्वारी!!

चांद्रयान-३ चे प्रक्षेपण यावर्षीच! ऑगस्टमध्ये चंद्रावर भारतीय स्वारी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!