Monday, May 19, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

मुंबई गाजवून आयपीएस शिवदीप लांडे पुन्हा बिहारात परतले! कामगिरी समीर वानखेडेंपेक्षा मोठी!! कशी ते वाचा…

November 27, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
shivdeep lande

मुक्तपीठ टीम

भारतीय पोलीस सेवा दलातील अधिकारी शिवदीप लांडे पुन्हा एकदा बिहार पोलिसांच्या सेवेत परतणार आहेत. सुपर कॉप म्हणून ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ५ वर्षांच्या प्रतिनियुक्तीच्या कालावधीसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत दाखल झाले होते. आता त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी संपत आल्यानं ते लवकरचं बिहार पोलीस दलात रुजू होतील. शिवदीप लांडे यांची कामगिरी समीर वानखेडेंपेक्षा मोठी आहे.

 

शिवदीप लांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहीले, ‘महाराष्ट्रामधील माझ्या कार्यकाळाचे पाच वर्ष पूर्ण झाले. मी डीआयजी (दहशतवाद विरोधी पथक, एटीएस मुंबई) म्हणून माझा कार्यभार सोपवत आहे. मी आता ‘आपल्या बिहार’मध्ये सेवा करण्यासाठी परत येत आहे. ‘ एका अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रातील एटीएस म्हणून शिवदीप लांडे यांचा शुक्रवार हा शेवटचा कामाचा दिवस होता आणि ते १ डिसेंबरपासून बिहार पोलिसात रुजू होतील.

 

शिवदीप लांडे यांचा कार्यकाळ

  • शिवदीप लांडे हे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
  • अँटिलिया, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटके असलेली एसयूव्ही आणि नंतर उद्योगपती मनसुख हिरण यांचा संशयास्पद मृत्यू या प्रकरणाचा त्यांनी तपास केला होता.
  • तेजस्वी आणि दबंग आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे महाराष्ट्रातील शिवसेना नेते विजय शिवतारे यांचे जावई आहेत.
  • त्यांची कन्या डॉ.ममता शिवतारे या शिवदीप लांडे यांच्या पत्नी आहेत.
  • जानेवारी २०१५ मध्ये, पाटणा येथील डाक बंगला चौकात इन्स्पेक्टर सर्वचंदला फिल्मी स्टाईलमध्ये ओढणी घालून पकडल्याच्या प्रकरणात शिवदीप चर्चेत आले होते.

मुंबईही गाजवली! एनसीबीच्या वानखेडेंनी छोटे ड्रग पेडलर, तर लांडेंनी मोठे सप्लायर पकडले!

  • समीर वानखेडे यांनी ज्यावेळी एनसीबीमध्ये प्रवेश केला तेव्हा शिवदीप लांडे यांची त्याचवेळी DIG मध्ये पदोन्नती झाली आणि त्यांचे सप्टेंबर, २०२० मध्ये एएनसीमध्ये महाराष्ट्र एटीएसमध्ये ट्रान्सफर झाले होते.
  • त्यापूर्वी त्यांनी मुंबईत ५०० हून अधिक आरोपींना अटक केले होते आणि हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते.
  • एटीएसमध्ये असतानाही त्यांनी ड्रग्जचा एक मोठी केस शोधून काढली होती, ज्याचे कनेक्शन हिमाचल प्रदेशशी होता.
  • लांडे यांनी केतन पारीखचा साथीदार निरंजन शहा याला दिल्लीतून अटक केली होती.
  • सुशांत सिंगच्या मृत्यूनंतर समीर वानखेडेंना एनसीबीमध्ये आणण्यात आले होते.
  • या काळात त्याने रिया चक्रवर्तीला अटक केल्यापासून, आर्यन खानला पकडले आणि अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना चौकशीसाठी बोलावले, त्यामुळे ते मुख्यतः चर्चेत आले.
  • परंतु मुंबई पोलिसातील अनेक अधिकारी असा दावा करतात की समीर वानखेडेंनी छोटे ड्रग पेडलर पकडले तर तर लांडेंनी मोठे सप्लायर पकडले.
  • याचा अर्थ ते पेडलर्सपेक्षा ड्रग माफियांपर्यंत पोहोचले. त्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये छापे टाकले, जिथून चरस मुंबईला जायचा.
    त्यांची टीम आंध्र प्रदेशातील त्या भागात पोहोचली जिथून मुंबईला भांग पुरवठा केला जात होता.
  • त्यांच्याकडून एका प्रकरणात एक हजार कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.

Tags: biharMaharashtraShivdeep Landeबिहार पोलीस दलमहाराष्ट्रशिवदीप लांडे
Previous Post

मुंबईत मतदार नोंदणीसाठी शनिवार व रविवारी विशेष मोहीम

Next Post

राज्यातील २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित

Next Post
maharashtra state election commission

राज्यातील २७ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!