Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

ऐतिहासिक जलस्त्रोत संवर्धनासाठी तरुणांची महाराष्ट्र बारव मोहीम

May 19, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
Barav Mohim

मुक्तपीठ टीम

 

आजची तरुणाई म्हणजे केवळ लेटेस्ट ट्रेंडची फॅशन मिरवत भन्नाट वेगानं बाइक, कार पळवणं, वाट्टेल तसं जगणं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं चुकतंय. आजची तरुणाई उरात जपते तेच मराठीपण, फक्त अभिमानच बाळगत नाही आपल्या ऐतिहासिक वारशाचा तर त्याच्या संवर्धनासाठीही धडपडते. आता मुंबईचा रोहन अशोक काळे आणि त्याच्यासोबतच्या लोणावळ्याचा मनोज सिनकर या दोन तरूणांचेच पाहा. त्यांचा श्वास आणि ध्यास सध्या एकच आहे. तो आहे, ऐतिहासिक पाणी पुरवठ्याचा आपल्या मातीतील देखणा इतिहास संवर्धनाचा. त्यासाठीच त्यांची महाराष्ट्र बारव मोहीम अथक, निरंतर सुरु आहे.

 

हे तरुण महाराष्ट्रातील पांडवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन आणि आहिल्याबाई होळकर यांच्या काळातील बारवांचा शोध घेत आहेत. त्यांनी गुजरात आणि राजस्थानातील स्वच्छ आणि सुंदर बारव पाहिल्या. त्यानंतर महाराष्ट्रातील बारव शोधण्याचा आणि संवर्धनाचा ध्यास त्यांनी घेतला. यासाठी ते नोकरीत १ वर्षाचा ब्रेक घेऊन बारव शोधण्यासाठी ते दोघं गावं पालथी घालत आहेत. महाराष्ट्रातील दुर्लक्षित बारवांचा शोध घेऊन ते लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

बारव म्हणजे पायऱ्यांच्या बावड्या म्हणजेच विहीरी. नैसर्गिक झऱ्यांभोवती या बारव सुंदर देखणं दगडी स्थापत्यातून उभारल्या आहेत. त्यामागचा उद्देश प्रत्येक गाव पाणी पुरवठ्याच्याबाबतीत स्वावलंबी असावं हा होता. काळाच्या ओघात दुर्लक्ष झालं किंवा केलं गेलं आणि बारव खरोखरच धुळ खात पडल्या. त्यांचे शुद्ध पाण्याचे नैसर्गिक जलस्त्रोत बुजण्याची वेळ आली. पाणी दुषित झाले. ते अधिकच दुर्लक्षित झाले. या दोन तरुणांनी मात्र आतापर्यंत कोकणातील १०४, पश्चिम महाराष्ट्रातील १८० आणि इतर ठिकाणी असलेल्या बारवां भेट दिली आहे. ते त्यांची नोंदणी www.indianstepwells.com या आपल्या अधिकृत वेबसाइटवर करत आहेत. त्यामुळे सरकार दरबारी दखल घेतली जाईल आणि हा देखणा आणि लोकोपयोगी ऐतिहासिक ठेवा पुन्हा एकदा लोकांच्या उपयोगी येईल. पाणी स्वावलंबनाचे सुराज्य पुन्हा गावोगावी अवतरेल. रोहन काळे आणि त्याचा सहकारी मनोज सिनकरच्या महाराष्ट्र बारव मोहिमेला मुक्तपीठच्या शुभेच्छा.

 

महाराष्ट्र बारव मोहिमे अंतर्गत मोटरसायकलवर ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरत आहेत. रोहन काळे या मुंबईकराने आतापर्यंत शेकडो बारवांचा शोध घेतलेला आहे. महाराष्ट्रातील अनेक बारवांचा वापर वारकरी वारीदरम्यान करीत असतात. रोहन याने असे सांगितले की, “महाराष्ट्र बारव मोहिमे अंतर्गत संवर्धनासाठी लोकांनी आपले जलस्त्रोताचे जतन करावे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे.”

 

मागील लॉकडाउननंतर महाराष्ट्रभरातील साधारण ३५० हून अधिक बारवांची या दोघं मित्रांनी पाहणी केली. “जल हेच जीवन” या संकल्पनेतून बारवांचे महत्त्व लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ही मोहीम एकाच वेळी दीडशे ते दोनशे ठिकाणी पार पाडता येणार असून याची पूर्व तयारी करण्यात येणार आहे. साफसफाई करून तेथे दिवे लावून रांगोळी, फुलांनी सजवून कार्यक्रम आयेजित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सध्या रोहन या बारवांची रीतसर नोंदणी करण्यासाठी मराठवाडा आणि विदर्भ दौरा करत आहे.

 

आतापर्यंत या दोघांनी अनेक गावांत झाडा-झुडपांत लुप्त पावलेल्या जवळपास २०० बारव शोधल्या आहेत. त्याच्या संवर्धनासाठी ग्रामस्थांना ते आवाहन करत आहेत. या बारवांना पर्यटन स्थळे म्हणून विकसित करण्याच्या प्रयत्नात आहेत..

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Maharashtramumbaiआहिल्याबाई होळकरजल हेच जीवनमहाराष्ट्र बारव मोहिमरोहन अशोक काळे
Previous Post

तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात ६ हजार घरांचे नुकसान

Next Post

कोरोना संकटात एव्हरेस्टवर २०२१ची पहिली भारतीय गिर्यारोहक

Next Post
Tashi Yangjom

कोरोना संकटात एव्हरेस्टवर २०२१ची पहिली भारतीय गिर्यारोहक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!