Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“वादळग्रस्त कोकणवासीयांची शिवसेनेच्या सरकारकडून उपेक्षा”

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांची टीका

May 22, 2021
in घडलं-बिघडलं
0
madhav bhandari

मुक्तपीठ टीम

 

कोकणात वादळामुळे झालेल्या नुकसानीची सरकारी यंत्रणांकडून चुकीची माहिती दिली गेल्यामुळे कोकणवासीयांना शासनाकडून भरीव भरपाई मिळणार नाही. ज्या कोकणाने शिवसेनेला भरभरून साथ दिली त्याच कोकणच्या जनतेची शिवसेनेच्या सरकारने केलेली उपेक्षा निषेधार्ह आहे , असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी शनिवारी केले. रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांशी ऑनलाईन संवाद साधताना भांडारी बोलत होते. रत्नागिरी जिल्हा भाजपा अध्यक्ष दीपक पटवर्धन या वेळी उपस्थित होते.

 

भांडारी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कोकणचा धावता दौरा केला. या दौऱ्यात शासकीय यंत्रणेकडून मुख्यमंत्र्यांना वादळामुळे झालेल्या नुकसानीची चुकीची माहिती दिल्याचे दिसत आहे. नुकसानीचा शासकीय यंत्रणेचा अहवाल कोकणवासीयांची क्रूर थट्टा करणारा आहे. अशा माहितीवर विसंबून सरकारकडून भरपाईची रक्कम जाहीर केली जाणार असेल तर वादळग्रस्तांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या वादळामुळे नुकसान झालेल्या शेतीच्या क्षेत्राच्या आकडेवारीत मोठी विसंगती आहे. अशा चुकीच्या माहितीवर विसंबून राहून राज्य सरकारने नुकसान भरपाईची रक्कम ठरवू नये.

 

वादळाने कोकणातील आंबे, काजू आणि मासळीचा हंगाम वाया गेला आहे. या नुकसानीचे वास्तव चित्र शासकीय यंत्रणेने तयार केलेल्या अहवालात दिसण्याची शक्यता नाही. वर्षभरापूर्वी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्यांना आघाडी सरकारकडून अद्याप भरपाई मिळाली नसल्याचे भांडारी यांनी निदर्शनास आणून दिले.

 

दोन वर्षांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसानंतर उद्धव ठाकरे यांनी, ‘पंचनामे वगैरे बाजूला राहू द्या, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ५० हजारांची भरपाई द्या’ अशी मागणी केली होती. मात्र सत्तेवर येताच उद्धव ठाकरे,’ कोकणातील नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर भरपाई जाहीर करू, ‘ असे बोलू लागले आहेत. सत्तेवर येताच उद्धव ठाकरे यांची संवेदनशिलता संपली का, असा सवालही भांडारी यांनी केला.

 

यावेळी भांडारी यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी नुकसानीबाबत सादर केलेल्या अहवालातील विसंगती उघड केली.

 


Tags: BJPchief minister uddhav thackerayKonkanmadhav bhandariShivsenaकोकण दौराभाजपा अध्यक्ष दीपक पटवर्धनमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

कोरोना संकटाचा ताण…मुंबई पोलिसांच्या मिम्सचा विरंगुळा…पाहिलात?

Next Post

म्युकरमायकोसिसवरील अ‍ॅम्फोटेरिसिन बी औषधाचे केंद्राकडून वाटप, महाराष्ट्राला ५ हजार २९० कुप्या

Next Post
sadanand gowda

म्युकरमायकोसिसवरील अ‍ॅम्फोटेरिसिन बी औषधाचे केंद्राकडून वाटप, महाराष्ट्राला ५ हजार २९० कुप्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!