Friday, May 16, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

कोरोना संकटात अनाथ झालेल्या मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्यासाठी ‘जिजाऊ’चा पुढाकार

May 22, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
Nilesh Sambare

मुक्तपीठ टीम

कोरोना संकटात अनाथ झालेल्या शेकडो लहान मुलांच्या भविष्याची नवी समस्या समोर ठाकली आहे. त्यांना दत्तक घेण्यासाठी समाजमाध्यमांवर काही संशयास्पद आवाहनंही पसरू लागली. अखेर राज्य सरकारच्या महिला आणि बाल कल्याण विभागानं हस्तक्षेप करीत अशा प्रकारे थेट दत्तक घेता येत नसल्याचे स्पष्ट केले. कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यासाठी तातडीनं जनजागरणाची पावलं उचलली. एकीकडे पुण्याच्या कामाच्या नावाखाली होणारे असे वेगळे प्रकार आणि त्याचवेळी पालघर जिल्ह्यातील एक संस्था मात्र सरकारी नियम अटी पाळण्याची हमी देत अनाथ मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्यासाठी पुढे आली आहे. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या निलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून पालघर आणि ठाणे ग्रामीण जिल्ह्यांमधील कोरोना अनाथ मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्याची तयारी दाखवली आहे.

 

कोरोनाची दुसरी लाट ही महाराष्ट्रासाठी महासंकटकारी ठरली आहे. या लाटेत शहरी आणि ग्रामीण भागातील अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यातही वाईट भाग असा की काही कुटुंबामध्ये तर आई-वडिल दोन्ही मोठी माणसं कोरोनाचे बळी ठरले. त्यामुळे घरातील लहान मुलं अनाथ झाली. पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही अशी अनेक मुले अनाथ झालीत.

 

हेही वाचा: पालघरच्या ग्रामीण भागात कोरोना उपचारांसाठी ‘जिजाऊ’ची साथ

 

कोरोना संकटात अनाथ झालेल्या या मुलांविषयी निलेश सांबरे यांना माहिती मिळताच त्यांनी त्यांचे भविष्य उज्जल घडवण्यासाठी त्यांची महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतची जबाबदारी घेण्याचे ठरविले. त्यासाठीच त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी कोरोनाच्या भीषण अशा दुसऱ्या लाटेशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र समर्थपणे मुकाबला करीत आहे. महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून ते जी जबाबदारी पार पाडत आहात, त्यातून प्रेरणा घेऊन ‘जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था, झडपोली, पालघर’ या संस्थेमार्फतत्या कार्यात खारीचा वाटा उचलण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

 

कोरोनाच्या भीषणतेत अनेक मुलं अनाथ झाली आहेत. दोन्ही पालकांना गमवावे लागलेल्या अशा अनाथ मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्याची तयारी जिजाऊ संस्थेतर्फे त्यांनी तयारी दर्शवली आहे. संस्थेच्या शाळांमध्ये या मुलांच्या चांगल्या शिक्षणाची व्यवस्था करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यासाठी शासकीय नियमांनुसार आवश्यक त्या नियम अटींची पूर्तता करण्याची तयारीही दर्शवली आहे.

 

हेही वाचा: भिवंडीतील कोरोना जंबो रुग्णालय सर्व वैद्यकीय सुविधा पुरवून पूर्ण क्षमतेनं चालवण्याची मागणी

 

जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे उपक्रम

• ही संस्था पालघर आणि ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कार्यरत आहे.
• गेली १२ वर्षे ही संस्था शिक्षण, महिला सक्षमीकरण, आरोग्य, रोजगार, शेती या पाच क्षेत्रांमध्ये मोफत सेवा पुरवत आहे.
• पालघरच्या आदिवासी आणि ग्रामीण भागात या संस्थेच्या सीबीएसई बोर्डाच्या पाच शाळा आहेत. तसेच एक दृष्टीहीनांची निवासी शाळाही आहे.
• या सर्व शाळा विद्यार्थ्यांसाठी मोफत पण दर्जेदार शिक्षण देतात.
• या शाळांसोबतच संस्थेचे सर्व सुविधायुक्त रुग्णालयही आहे.

 

लिंक क्लिक करा आणि वाचा:

स्वकमाईतून समाजसेवा….समाजातील प्रत्येकाला न्याय देण्याचा ‘जिजाऊ’ वसा!

स्वकमाईतून समाजसेवा….समाजातील प्रत्येकाला न्याय देण्याचा ‘जिजाऊ’ वसा!


Tags: chief minister uddhav thackeraycoronajijauJijau Educational and Social Institutionsnilesh sambareनिलेश सांबरे
Previous Post

“संचालक भरती प्रक्रियेत ऊर्जामंत्र्यांचा हस्तक्षेप सुरूच”

Next Post

गरजूंना मोफत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर देण्यासाठी सलमान खानची हेल्पलाईन

Next Post
salman khan

गरजूंना मोफत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर देण्यासाठी सलमान खानची हेल्पलाईन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!