Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोदी – ठाकरे भेट का महत्वाची? मराठाच नाही ओबीसी राजकीय, पदोन्नती आरक्षणासाठीही केंद्राची साथ आवश्यक!

June 8, 2021
in featured, घडलं-बिघडलं, सरळस्पष्ट
0
Thackeray modi meeting

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील प्रमुख तीन मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मोदी-ठाकरे भेटीनंतर राज्यातील इतर महत्वाच्या प्रश्नांबरोबरच सध्या सर्वात महात्वाचे ठरलेले मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण आणि पदोन्नती आरक्षणाचे प्रश्न सुटण्यासाठी केंद्राची मदत कशी महत्वाची आहे, ते पुन्हा पुढे आले आहे. आरक्षणाचे प्रश्न हे राज्यापुरते मर्यादित नसून देशातील इतर राज्यांमध्ये वेगवेगळ्या जातींसाठी असंतोष धगधगता ठेवणारे ठरले आहेत. फक्त राज्य सरकारच्या पातळीवरच नाही तर केंद्राच्या पातळीवरही प्रयत्न करुन हे प्रश्न सोडवले जाणे शक्य असल्याचे मानले जाते.

 

मराठा आरक्षण रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने १०२व्या घटनादुरुस्तीमुळे आरक्षण ठरवण्याचा अधिकार राज्याला नसून केंद्राला असल्याचे सांगितले होते. केंद्राने त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत राज्यांचे मागासलेल्या जाती ठरवण्याचे अधिकार अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र तसे करेलही. पण सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण बोलले तसे केवळ राज्यांना अधिकार देऊन चालणार नाही. त्याचबरोबर राखीव जागांवरील ५० टक्क्यांची मर्यादाही काढावी लागेल. इंदिरा सहानी प्रकरणातील आरक्षण मर्यादा ५० टक्केच ठेवण्याचा निकालामुळे देशभरातील अनेक राज्यांना त्यामुळे असंतोषाला तोंड द्यावे लागत आहे. केंद्र सरकार संसदेत कायदा करुन तशी मर्यादा वाढवू शकते.

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या मर्यादेवर भाष्य केले. या मर्यादेमुळे केवळ मराठा आरक्षणाच्या मार्गात अडथळे येत नसून ओबीसी म्हणजेच इतर मागासवर्गीय जातींच्या राजकीय आरक्षणालाही धोका निर्माण झाला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळेच महाराष्ट्रात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला रद्द केले गेले आहे. भविष्यात तसाच धोका देशातील इतर राज्यांमध्येही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारला संसदेत खास कायदा करुन इंदिरा साहनी प्रकरणाच्या निकालामुळे लादली गेलेली आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा काढावी लागणार आहे. तरच ओबीसी राजकीय आरक्षण टिकेल आणि मराठा समाजालाही आरक्षणाचा अधिकार मिळू शकेल.

 

राज्यात सध्या पदोन्नतीतील आरक्षणाचा मुद्दाही असंतोष भडकवणारा ठरला आहे. ४ ऑगस्ट २०१७ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने पदोन्नतीतील आरक्षण अवैध ठरवले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्या निकालास अद्याप स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे तेथेही प्रयत्न करण्यासाठी केंद्राची साथ आवश्यक ठरणार आहे. जर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा मुद्दा उचलून धरला तर पुन्हा एकदा संसदेच्या मार्गानेच अनुसुचित जाती जमातींच्या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण पुन्हा देता येईल.

 

एकंदरीतच महाराष्ट्रात सामाजिक असंतोष भडकवणारे ठरलेले हे तीन आरक्षणाचे मुद्दे सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारची साथ आवश्यक आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे सहकारी मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेली भेट महत्वाची मानली जाते आहे.

(पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात ३० मिनिटे वैयक्तिक चर्चाही झाली. त्याचा वेगळा राजकीय अर्थ काढला जाऊ शकतो. त्याबद्दलचं भाष्य नंतर करुया.)


Tags: chief minister uddhav thackerayprime minister narendra modiअशोक चव्हाणउपमुख्यमंत्री अजित पवारपंतप्रधान नरेंद्र मोदीपदोन्नती आरक्षणमराठा आरक्षणमहाराष्ट्र
Previous Post

कोरोना लॉकडाऊनचा फटका, अनलॉक होताच मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेल लॉक!

Next Post

खासदार नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाकडून रद्द, खासदारकी धोक्यात

Next Post
navneet rana

खासदार नवनीत राणांचे जात प्रमाणपत्र न्यायालयाकडून रद्द, खासदारकी धोक्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!