Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

#व्हाअभिव्यक्त! सर्व प्रकारच्या आंदोलनांची हत्यारे मोडीत काढली आहेत का?

March 8, 2021
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
Farmer Women protest

हेरंब कुलकर्णी

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला १००दिवस पूर्ण होत आहेत. १०० दिवस सतत आंदोलन करूनही सरकार ती कोंडी फोडत नसेल तर अत्यंत वेदनादायक आहे. यानिमित्ताने लोकशाहीतील आंदोलने हे सरकारांनी निकालात काढले आहे का ? असा प्रश्न उपस्थित होतो. व सर्व आंदोलनाचे हत्यार बोथट होते आहे का ? यावर चर्चा करायला हवी.

१) सरकार कदाचित असे म्हणेल की आंदोलक हेकट पणा करत आहेत परंतु लहान मुलाने कितीही हट्ट केला तो कितीही चुकीचा असला तरी त्याची समजूत घालून त्याला शांत करणे हे आई-वडिलांचे काम असते. तीच भूमिका सरकार व जनता यांची असते. सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावणे,आंदोलकांना पंतप्रधानांनी सन्मानाने बोलावून चर्चा करणे अशा काही गोष्टी केल्या तर आंदोलक नक्कीच ऐकतील. आंदोलकांना ही आंदोलनाचा त्रास नको असतो त्यामुळे तेही आंदोलन संपवण्यासाठी उत्सुक असतात परंतु १०० दिवस व अनेकांचा मृत्यू होऊनही आंदोलन सरकारसाठी दखलपात्र ठरत नसेल तर आपल्या छोट्या आंदोलनाचे काय होईल याने सर्व कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे

२) भाजपेतर पक्ष ही काही ठिकाणी असेच वागतात.महाराष्ट्रातील पुरोगामी सरकारने विना अनुदानित शिक्षकांचे आंदोलन ज्याप्रकारे दुर्लक्षित केले आहे व संगणक कर्मचाऱ्यांना रात्रीतून लाठीमार करून हाकलून लावले ते ही धक्कादायक आहे.सत्तेचा स्वभाव एकच असतो का ?

३) याच्या पुढची अवस्था उपोषणाची आहे. गंगाकिनारी११२ दिवस उपोषणाला जी डी अग्रवाल यांचा मृत्यू झाला तरी सरकारने दखल घेतली नाही. त्यामुळे आमरण उपोषण हे ही हत्यार सरकारांनी मोडीत काढले आहे असेच म्हणावे लागते.अण्णा हजारेंच्या उपोषणाची दखल काँग्रेस सरकारने घेतली होती पण या सरकारने दिल्लीतील उपोषणाची जी उपेक्षा केली ती वेदनादायक होती.पत्र उत्तरेही दिली नाही .मेधा पाटकर यांचेही प्राण धोक्यात आले तेव्हाच मध्यप्रदेश सरकारने लक्ष दिले.हे भयकंपित करणारे आहे.

४) मृत्यू झाल्यानंतर अनेकदा नातेवाईक ते प्रेत ताब्यात घेत नाहीत व चौकशीची आरोपी अटकेची मागणी करतात. यामध्ये नातेवाईकांची शोकसंतप्त भावना समजून घ्यायची असते. अनेक ठिकाणी प्रशासन मागणी चूक असेल तरी त्यांची समजूत घालते, त्यांचे सांत्वन करते व नातेवाईक नंतर प्रेत ताब्यात घेतात.हाथरसच्या घटनेत या आंदोलनाच्या पद्धतीलाच भीषण धक्का बसला. नातेवाईक प्रेत ताब्यात घेत नाही तर रात्रीच्या वेळी ते प्रेत जाळून टाकायचे यातून शोकसंतप्त नातेवाईक जी भावना व्यक्त करायचे तीच चिरडून टाकली जाते आहे.

५) जनहित याचिका हा प्रकारही बाद होतो आहे.त्यानंतर अनेक जनहित याचिका ना शेरेबाजी करून करून निकालात काढल्या गेल्या..(सहाव्या वेतन आयोगाच्या विरोधात वेळी मी व असीम सरोदे, त्यांच्या भगिनी अशी आम्ही याचिका दाखल केली होती.त्यावेळी न्यायालयाने राष्ट्रपतींच्या आदेशाने जीआर निघतो तुम्ही राष्ट्रपती पेक्षा शहाणे आहेत का असा शेरा मारून ती निकालात काढली होती.) व आता तर याचिका करणार्यांना चुकीचे वाटले तर दंड होतो आहे यातील चुकीच्या व्यक्तींना जरब बसली पाहीजे परंतु जनहित याचिका कडेच संशयाने बघणे याप्रकारामुळे न्यायालयात जाण्याच्या मार्गावर ही मर्यादा येत आहेत.

६)माहितीचा अधिकार हे महत्त्वाचे शस्त्र शासनावर अंकुश ठेवणारे होते परंतु सरकारने दुरुस्त्या करून व अनेक अटी घालून हा कायदाही बोथट करून टाकला आहे. अधिकारी अगदी बिनधास्त झाले आहेत सरळ अपिलात जा असे उद्दामपणे कार्यकर्त्यांना बोलतात

७) सोशल मीडियावर विरोध करण्याचे व्यासपीठ होते पण नवीन सुधारणा व दिशा प्रकरणातील कारवाई देशद्रोह या आरोपाची टांगती तलवार यामुळे सोशल मीडिया हे आंदोलनाचे हत्यारही सरकार बोथट करत आहे.

१००दिवसाच्या आंदोलनानंतर कोणत्याही सामाजिक प्रश्नांवर संवेदनशील असणाऱ्या व्यक्ती अस्वस्थ व्हाव्यात अशीच स्थिती आहे.. तुम्ही स्वतःला कितीही पणाला लावले तरी सत्ता नावाची गोष्ट त्याची दखल घेणार नाही हा संदेश हताश करणारा आहे . त्यामुळे यंत्रणेकडूनची मुस्कटदाबी वाढतच जाईल अशी स्थिती आहे

heramb kulkarni

(शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आणि कार्यकर्ते असणारे हेरंब कुलकर्णी समाजातील दुर्लक्षित घटकांच्या समस्या थेट जाणून घेतात, अनुभवतात आणि सोप्या शब्दांमध्ये मांडतात. त्याबरोबरच त्यांचे संवेदनशील व्यक्तिमत्व काव्यक्षेत्रातही प्रसिद्ध आहे.  संपर्क – ८२०८५८९१९५ )


Tags: Heramb KulkarniMovementVha Abhivyaktव्हा अभिव्यक्तहेरंब कुलकर्णी
Previous Post

स्त्रियांच्या सृजनशक्तीमधून चित्रपट लेखिका घडवणार नेटफ्लिक्स

Next Post

दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्या कार्तिकेयन यांचा सत्कार

Next Post
yashomati thakur

दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखर सर करणाऱ्या गिर्यारोहक काम्या कार्तिकेयन यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!