Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#व्हाअभिव्यक्त! निषेध ‘सिलेक्टिव्ह’ नको…सर्वच विकृतींचा व्हावा!

April 5, 2021
in featured, व्हा अभिव्यक्त!
0
heramb kulkarni

हेरंब कुलकर्णी

आपल्याकडे निषेधसुद्धा सोयीस्कर होत असतात. शरद पवार यांच्याविषयी नीच भाषेत पोस्ट लिहिणाऱ्यावर फक्त ब्लॉक न करता कायदेशीर कारवाई करायला हवी कारण हे प्रकार आता समज देऊन संपत नाहीत. त्याचा आता अतिरेक झाला आहे. पवारांच्या सद्भावनेच्या लाटेत हे विकृत कुठे वाहून गेले ते ही कळले नाही..१९९५ च्या निवडणुकीत सोशल मीडिया नव्हता तेव्हा पवारांच्या कुटुंबातील व्यक्तीविषयी असेच विकृत प्रचार झाले. तेव्हाही या विकृतीवर चर्चा झाली होती. ते व्यथित झाले होते.

पण हे निषेध करण्यातही पुन्हा दोन बाजू आहेत. अशी बदनामी करण्यात भाजप आय टी सेल सर्वात पुढे आहे.’घडलं बिघडलं’ पेज व ‘नथुराम पेज’ ही दोन उदाहरणे आहेत. ही पेज मोठ्या प्रमाणात रिपोर्ट झाली तर बंद होतील.तसा प्रयत्न व्हायला हवा.(मी तो प्रयत्न केला आहे)

पण दुसरी बाजू हीसुद्धा नोंदवली पाहीजे की उजव्या बाजूच्या व्यक्तींवरही असे हल्ले होतात तर त्याचाही निषेध करायला हवा पण अनुभव वेगळा आहे.देवेंद्र फडणवीस हेलिकॉप्टर अपघातात बचावले तेव्हा ‘अरेरे मेला नाही का अशा विकृत पोस्ट आल्या, टरबूज नावाने पेज उघडले गेले, ‘तुझी बायको मागत नाही,आरक्षण मागतो असे लिहीले गेले तेव्हा आज पोस्ट टाकणाऱ्या कितीजणांनी त्यावर लिहीले ? अशी हिंमत आक्रमक कार्यकर्ते असणाऱ्या नेत्यांच्या पत्नीविषयी करतील का ? मुख्यमंत्री यांचा उल्लेख टरबूज असा होत असताना सगळे विचारी लोक गप्प होते हे वास्तव आहे. किमान असे लोक unfriend तरी केले का ? मी यावर पोस्ट टाकली तेव्हा थेट माझी नेहमीप्रमाणे जात निघाली..आयटी सेलचे उदाहरण दिले पण म्हणून आपणही त्या पातळीवर जाण्याचे समर्थन करायचे ?

हे सिलेक्टिव्ह असते का ? आज शिवसेना नेते पवारांच्या विषयावर बोलतील पण नानासाहेब गोरे यांच्या मृत्युनंतर दुसऱ्याच दिवशी ‘ ढोंगीपणाला श्रद्धांजली नाही’ हा अग्रलेख बाळासाहेब ठाकरेंनी लिहिला. यावर किती जण तेव्हा बोलले असतील ? आचार्य अत्रे व बाळासाहेब ठाकरे यांनी हे व्यक्तिगत हल्ले गतिमान केले हे वास्तव आहे.

पुन्हा उजवे समर्थक ही तसेच. दीर्घ आंदोलनाने उद्विग्न होऊन राकेश टिकैत यांनी मृत्यूची भाषा केली. कोणीही संवेदनशील माणूस हलेलं पण शेफाली यांनी माझ्याकडून दोन लिटर रॉकेलं इतकी अमानवी पोस्ट टाकली..फडणवीस यांच्यावरील हल्ल्याने व्यथित होणाऱयांची प्रतिक्रिया काय ? त्या आंदोलनावर मतभेद असू शकतात पण इतक्या क्रूर अमानुष भाषेत लिहणाऱ्याविषयी भाजप समर्थक बोलणार की नाही ?

अमित शहा यांच्याविषयी व्यक्तिगत प्रेम नाही असलाच तर राग आहे पण त्याना कोरोना झाला तेव्ह उलट आनंद व्यक्त करणाऱ्या पोस्ट आल्या . आज व्यथित झालेल्या कितीजणांनी प्रतिवाद केला ? आपण बोललो तर आपल्याला भाजपचे समजतील या भीतीने अनेकजण गप्प राहतात. आणि भाजप भक्तांना ते बोलण्याचा अधिकार नाही कारण सोनिया यांच्या आजारावरून अशाच असभ्य comment तेव्हा आल्या होत्या.आणि ममतांच्या आजारावर यांचे तेच सुरू आहे

एखादी व्यक्ती मृत्यू झाल्यावर किमान एक आठवडा तरी त्यांचेवर टीका करू नये पण इकडे मृत्यू झाल्यावर ज्या comment येतात त्यावरही सर्व विचारसरणीचे लोक तुटून पडत नाहीत असे जाणवते..अपर्णा रामतीर्थकर यांच्या विचारांचे कोणीच समर्थन करणार नाही पण त्यांचा मृत्यू झाल्यावर दोन तासात त्यांची खिल्ली उडवणे सुरू झाले..अशावेळी त्यांच्या नातेवाईकांना काय वाटेल हे मनातही येत नसेल का ?

तेव्हा शरद पवार यांच्यावर ज्यांनी विकृत लिहीले त्यांच्यावर निषेध नाहीतर गुन्हेच दाखल करावेत पण भाजप आयटी सेल नीच उद्योग करतो तरीही तिकडच्या नेत्यांवर होणाऱ्या असभ्य हल्ल्यांवर ही बोलायला हवे…
हे सगळेच सिलेक्टिव्ह होत चालले आहे त्यामुळे स्तर घसरत चालला आहे …आणि असे लिहीले की पुन्हा ट्रोलिंग जात काढणे हे होत राहते.

नेते गप्प राहतात त्यामुळे समर्थक माजले आहेत. एक प्रसंग आठवतो…१९८१ च्या आसपास भाजपाच्या एका राष्ट्रीय अधिवेशनात रेड्डी नावाचे नेत्याने इंदिरा गांधी शूर्पणखा आहेत व अटल बिहारी यांनी त्यांचे निवडणुकीत नाक व कान कापावे अशी भाषा वापरली. सभागृहात टाळ्या वाजल्या पण अटल बिहारी यांनी रेड्डीच्या हातातला माईक कडून घेतला. अशी भाषा पुन्हा आपल्या व्यासपीठावर चालणार नाही असे बजावले. दुर्दैवाने वीस वर्षांनी त्याच पक्षाने आयटी सेल स्थापन करून विरोधकांवर त्यापेक्षाही खोल वार केले व विरोधी पक्षाचे नेते समर्थकही सोशल मीडियावर समोरच्या सापळ्यात सापडून तेच करत आहेत त्यामुळे या मारामारीत एकूणच राजकारणाचा आणि माणुसकी जास्त तर खाली खाली जात आहे.

heramb kulkarni

(शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक आणि कार्यकर्ते असणारे हेरंब कुलकर्णी समाजातील दुर्लक्षित घटकांच्या समस्या थेट जाणून घेतात, अनुभवतात आणि सोप्या शब्दांमध्ये मांडतात. त्याबरोबरच त्यांचे संवेदनशील व्यक्तिमत्व काव्यक्षेत्रातही प्रसिद्ध आहे.  संपर्क – ८२०८५८९१९५ )

 


Tags: भाजपव्हा अभिव्यक्तशरद पवारहेरंब कुलकर्णी
Previous Post

कठोर निर्बंधांना पाठिंबा देतानाच भाजपाचे सरकारला पाच प्रश्न

Next Post

’यू’ आकारात वेढून रॉकेट लाँचरनेही घातपात…तरीही नक्षलवाद्यांशी लढले जवान!

Next Post
naxal

’यू’ आकारात वेढून रॉकेट लाँचरनेही घातपात...तरीही नक्षलवाद्यांशी लढले जवान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!